Skip to main content

Posts

Showing posts from August, 2019

राज्यघटना मसुदा समितीबाबत.........

✍️🙏भारतीय संविधानाबद्दल ....👇👇 📚🎯पं. नेहरू, डॉ. राजेंदप्रसाद, वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन मौलाना आझाद, एम. गोपालस्वामी अय्यंगार, कृष्णस्वामी अय्यंगार, टी. टी. कृष्णम्माचारी, के. एम. मुन्शी, पंडित गोिवद वल्लभ पंत, जे. बी. कृपालानी, बी. जी. खेर, सी. राजगोपालचारी, बॅ. जयकर या व्यक्ती आल्या... घटना समितीत बहुसंख्य सदस्य हे काँग्रेस पक्षाचे होते. तरीही शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुस्लीम लीगचे नेते महंमद सादुल्ला,  महासभेचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी तसेच सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि रेणूका रे या प्रथितयश महिला सभासदांचा घटना समितीत समावेश होता.. ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथील संविधान सभागृहात (सध्याचा सेंट्रल हॉल) सुरू झाले. ते २३ डिसेंबर १९४६ पर्यंत चालले. पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी पहिले दोन दिवस डॉ. सच्चिदानंद सिन्हा होते. ११ डिसेंबर १९४६ नंतर डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटनासमितीचे अध्यक्ष झाले. मसुदा समिती:- २९ ऑगस्ट १९४७ साली घटनेची मसुदा समिती (Drafting Comm...

गीत-धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...?

संपवीला देह जरी, संपणार नाही मती... धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...? आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली तुका मारुनिया त्याची खबर दडविली.... त्या तुकाच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...? आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते नाव इतिहासातूनी लुप्त केले होते त्याच चार्वाकाचे तुम्हा वारस आज दावु किती? धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...? भिकूंच्या शिराला दिल्या मोहरा शंभर कसा रक्ताने भिजविला अहिंसेचा तो संगर... गळे चिरूनी धम्माचे संपली का सांगा नीती...? धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...? सत्यासाठी सॉक्रेटिस विष प्याला होता कोपर्निकसवरती पोप चा रोष आला होता मार्टिन ल्युथर धर्मद्रोही ठरला होता सत्यासाठी ग्यालिलिओ तुरुंगात सडला होता... बघा उजेडाची फुले धडका मरणाला देती... धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...? सत्य चिरडूनि इथे धर्म वाढलाय फुल्यांसाठी मारेकरी त्यांनी धाडलाय... गांधीजींचा धर्मांधांनी खून पाडलाय गोळ्या झेलूनिया पाश निपचित पडलाय... न्यायासाठी भोतमांगे रोज रडलाय... र...

कविता- कुठे आहेस सांग

कुठे आहेस सांग मला, कधी यायचा धावून. वाट तुझी बघण्यात, होतं नव्हतं गेलं वाहून. आई माझी म्हणायची, सकाळ संध्याकाळ तेल वात लावत जा. अधून मधून संकष्टीला, दुर्वांची जुडी वाहत जा. तेल-वात, दुर्वांची जुडी सगळं झालं करून, खरं सांग कुठं आहेस, सगळं तमाशा पाहून. वाट तुझी बघण्यात.......... घर गेलं, दार गेलं. गोठ्यातलं जनावर दावणीलाच मेलं, आभाळ फाटलं, चूल विझली. पाहतोस कसा शांत राहुन. वाट तुझी बघण्यात............ धान गेलं, रान गेलं, उभं पीक सडून गेलं. कुढाची झोपडी पडून गेली. डोळे भरून येतात हे सगळं पाहून. वाट तुझी बघण्यात.......... सत्ताधारी येतात, विरोधक येतात, मदतीचं गाजर दाखवून फोटो काढून जातात. पोकळ बोलून असं काय दुःखं दूर होतात. जीव द्यायचा विचार येतो पुन्हा राहून राहून. वाट तुझी बघण्यात................ पुन्हा पुन्हा वाटतं, खरंच तू आहेस का? लोभ नाही फार, पोटापूरतं मिळू दे. दुःख आमचं अधूनमधून तुलाही कळू दे. आता तरी येशील का सांग आमच्यासाठी धावून? वाट तुझी बघण्यात.......... ©के.राहुल 9096242452.

कलम ३७० आणि सत्यपरिस्थिती!

कलम   ३७०   रद्द   करण्याचा   निर्णय :  आवश्यकता ,  राजकारण   आणि   परिणाम . डॉ .  राहूल   सदाशिव   खरात , सहाय्यक   प्राध्यापक ,  मु . सा . काकडे   महाविद्यालय ,  सोमेश्वरनगर , ईमेल - srass229@gmail.com,  मो . ९०९६२४२४५२ . प्रस्तावना :             भारताचे   गृहमंत्री   अमित   शहा   यांनी   दि . ६ऑगस्ट   २०१९   रोजी   राज्यसभेत   जम्मू   आणि   काश्मीर   या   राज्यासाठी   लागू   असलेले  " कलम   ३७० "  आणि  " कलम   ३५अ "  रद्द   झाल्याची   घोषणा   केली .  त्यासाठी   ५७   पानांची   राष्ट्रपतींच्या   सहीची   ऑर्डर ,  २७३ (Presidential order, 273)  त्यांनी   राज्यसभेत   सादर   केली   आणि   पाठोपाठ   कलम  ' ३५अ '  रद्द   झाल्याची   अधिसूचना   निर्गमित   ...