Skip to main content

आइन्स्टाइन आणि देव

*(सतराव्या शतकातील बरूच डी स्पिनोझा या तत्त्वज्ञ विचारवंताच्या मूळ इंग्रजीत लिहिलेल्या 'देव संकल्पने' चा भावानुवाद.)*

आईन्स्टाईन अमेरिकेतील कित्येक विद्यापीठांमध्ये विविध परिषदांना जात असत, तेव्हा विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत. त्यात वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे *"तुमचा देवावर विश्वास आहे का?"*
यावर त्यांचे नेहमीचे उत्तर असायचे *"माझा स्पिनोझाच्या देवावर विश्वास आहे."*

बरूच डी स्पिनोझा हे पोर्तुगीज मूळ असलेले एक डच तत्त्वज्ञ होते. ते आणि रेनी डेकार्टस हे दोघे त्या काळातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवादी विचारवंत मानले जात. स्पिनोझा यांचा जन्म सतराव्या शतकात ॲम्स्टरडॅम येथे झाला. त्यांचे वडील एक यशस्वी व्यावसायिक होते, पण ते फारसे श्रीमंत नव्हते. स्पिनोझा यांनी जी देव संकल्पना मांडली तिथे स्वरूप खालीलप्रमाणे सांगता येईल...

*देव असता तर मानवाला म्हणाला असता, "हे उठसूठ प्रार्थना करणं आणि पश्चात्तापदग्ध होऊन आपली छाती बडवणं आता पुरे झालं... थांबवा ते आता. या जगात तुम्ही मनसोक्त हिंडा, नाचा, गा, मजा करा. गरजू लोकांनां मदत करा. मी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटा, एवढंच मला अपेक्षित आहे."*

*"त्या उदास काळोख्या आणि थंडगार मंदिरात जाणं आधी बंद करा. खरंतर ती तुम्हीच बांधलेली आहेत, आणि त्याला तुम्ही म्हणता की ही देवाची घर आहेत! माझी घरं असतात डोंगरदऱ्यांत, रानावनांत, नदी-नाल्यांवर, समुद्रकिनाऱ्यांवर! तिथे राहतो मी आणि तिथे राहून तुमच्यावरच प्रेम व्यक्त करतो मी. आपल्या हीनदीन आणि दुःखी आयुष्यासाठी मला दोष देणं सोडून द्या आता. 'तुम्ही पापी आहात' असलं काही कधीच सांगितलेलं नाही मी तुम्हाला. सतत मला घाबरून जगणं सोडून द्या आता. मी काही तुमचा न्यायनिवाडा करत नाही की तुमच्यावर टीकाही करत नाही की तुमच्यावर कधी संतापतही नाही. मला कशाचाही त्रास होत नाही. मी शिक्षा वगैरेही देत नाही. कारण मी म्हणजे शुद्ध प्रेम आहे."*

*"येता-जाता माझ्यासमोर क्षमायाचना करणे बंद करा एकदम. क्षमा मागण्यासारखं काही नसतं. मी तुमची निर्मिती केली आहे असं जर तुम्ही मानत असाल तर तुमच्यामध्ये जे जे आहे ते ते मीच तर दिलेलं आहे तुम्हाला. आनंद, दुःख, गरजा, मर्यादा, विसंगती... हे सारं काही मीच दिलेलं असेल आणि यातून तुमच्या हातून काही घडलं तर मी तुम्हाला दोषी कसा ठरवू? तुम्ही जसे आहात त्यासाठी मी तुम्हाला शिक्षा का म्हणून करू? आपल्या लेकरांच्या चुकांसाठी त्यांना मारता-झोडता यावे म्हणून एखादी भयंकर जागा मी तयार केली आहे असं खरंच वाटतं का तुम्हाला? कोणता देव करेल असं?"*

*"ईश्वरी आदेश, दैवी नियम, कायदे वगैरे काहीही नसतं. काढून टाका डोक्यातून तुमच्या ते. तुम्हाला ताब्यात ठेवण्यासाठी तुमच्याकडून हवं ते करून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लुप्त्या आहेत त्या. त्यांच्यामुळे तुमच्यात अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी हाच माझे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्यांचा हेतू असतो."*

*"तुम्ही आपल्या बांधवांना योग्य तो मान द्या. जे स्वतःच्या बाबतीत होऊ नये असं वाटतं तुम्हाला तेच दुसऱ्याच्या बाबतीतही करू नका. मी फक्त एवढेच सांगेन की, आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्या. तुमची सदसद्विवेकबुद्धी हीच तुमची एकमेव मार्गदर्शक असू द्या. स्वतःशी प्रामाणिक रहा. कारण अस्तित्वात असलेली एकमेव गोष्ट गोष्ट म्हणजे हे आयुष्य. ती इथं आहे आणि आत्ता या क्षणाला आहे. मी तुम्हाला पूर्ण मुक्त बनवलेलं आहे. तुमच्यासाठी कसली बक्षीसंही नाहीत आणि शिक्षाही नाहीत. कसली पापही नाहीत आणि कसली पुण्येही नाहीत. कोणी तुमच्या कृत्याचा हिशोब मांडत नाही की तुमच्या बर्‍यावाईटाची नोंदही करून ठेवत नाही. आपल्या आयुष्याचा स्वर्ग बनवायचा की नरक करायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे."*

*"हे आयुष्य संपल्यावर पुढे काय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही; पण एकच सांगतो की, या आयुष्यात नंतर पुढे काहीच नाही असं समजून जगा. अस्तित्वात राहण्याची, प्रेम करण्याची, आनंद लुटण्याची ही एकमेव संधी आहे असे समजून जागा. नंतर काहीच जर नसेल तर मी तुम्हाला दिलेल्या संधीचे सोने तुम्ही करायला नको का? आणि नंतर काही असेल तर मी तुम्हाला तुम्ही योग्य वागलात की अयोग्य असलं काहीही विचारणार नाही. मी एवढंच विचारीन: आवडलं ना तुम्हाला आयुष्य? मजा आली की नाही? केव्हा सर्वात जास्त मजा आली? काय काय शिकलात?"*

*"... तर माझ्यावर विश्वास वगैरे ठेवू नका. विश्वास ठेवणे म्हणजे मानणं, तर्क करणे. कल्पना करणे. मला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला अजिबात नको आहे. तुम्ही माझा स्वाद घ्यावा, माझी अनुभूती घ्यावी असं मला वाटतं. प्रिय व्यक्तीच्या ओठांवर ओठ ठेवताना, आपल्या चिमुकल्या बाळाशी खेळताना, आपल्या कुत्र्याचे लाड करताना, समुद्राच्या लाटांमध्ये डुंबताना मला अनुभवा तुम्ही."*

*"माझ्यावर स्तुतिसुमने उधळून माझी खुशामत करणे बंद करा. कसला आत्मकेंद्री आणि अहंमन्य देव समजता तुम्ही मला? तुमच्या भजन स्तोस्त्रांनी किटून गेलेत माझे कान... त्या चिकट प्रशंसाशब्दांनी पार वैतागून गेलोय मी. तुम्हाला माझ्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायचीच असेल तर काळजी घ्या आपल्या आरोग्याची, काळजी घ्या आपल्या नातेसंबंधाची, काळजी घ्या भोवतालच्या जगाची. आनंदित रहा, आनंद व्यक्त करा. माझी प्रशंसा करण्याचा... मला प्रसन्न करण्याचा हाच एक योग्य मार्ग आहे."*

*"एक गोष्ट खात्रीची आहे, ती म्हणजे तुम्ही इथे आहात... जिवंत आहात आणि हे जग विविध विस्मयकारक गोष्टींनी ओसंडतंय. आणखी कसले चमत्कार हवेत तुम्हाला? कशासाठी इतक्या अपेक्षा?"*

*"मला कधीही आपल्या बाहेर शोधू नका. मिळणारच नाही कधी मी. आपल्या अंतर्यामी शोधा मला तुम्ही. तिथे मात्र माझी स्पंदने तुम्हाला निश्चितपणे जाणवतील."*

*- बरूच डी स्पिनोझा.*
अनुवाद: अनामिक

🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...