Skip to main content

गुंडांच्या नेतृत्वाखालील भांडवली जग

गुंडांच्या नेतृत्वाखालील भांडवली जग

     बॉब गेल्डॉफ हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आणि वंशाने आयरिश असलेला गीतकार आणि गायक आहे. युवा पिढीचा प्रतिनिधी म्हणून तो वक्ता आणि विचारवंत म्हणूनही तितकाच लोकप्रिय आहे. 23 ऑक्टोबर 2019 रोजी लंडनमध्ये झालेल्या जागतिक युवा नेत्यांच्या शिबिराला संबोधित करताना त्याने जगातील प्रमुख नेत्यांवर टीका करताना त्याने दोन अत्यंत महत्वाची वाक्ये उच्चरली. तो म्हणाला,   "आपण एका अश्या जगात राहतोय जिथे आपल्याला असे वाटतेय की आपण जागतिक नेतृत्व करणाऱ्या निवडक नेत्याच्या जगात राहतोय पण प्रत्यक्षात असे नाही. आपण अश्या जगात राहतोय जे जग आंतरराष्ट्रीय गुंडांकडून नियंत्रित केले जात आहे."
         हे सगळे आता सांगण्याचे कारण म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय गुंडांची पोलखोल करणाऱ्या एका गुप्तहेराचा नवीन वर्षाच्या सुरुवातीला या गुंडांच्या टोळीने करूण अंत केला. या पाच देशातीलच एका देशात तो आपल्या देशाच्या अध्यक्षापासून वाचण्यासाठी आश्रित म्हणून राहत होता. त्याला या देशात चांगली नोकरी होती शिवाय या देशाने त्याला चांगले संरक्षणही देऊ केले होते. त्यामुळे त्याच्या जवळ जाऊन मारणे शक्य नव्हते म्हणून त्याला मारण्यासाठी artificial sneak spy चा वापर करण्यात आला. त्यातून साप चावल्याप्रमाणे त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला. पण साप चावल्याची कोणतीच लक्षणे त्याच्या अंगावर आणि शरीरातही दिसून आले नाहीत. पण त्याची जीभ मात्र पूर्ण निळी पडली होती. शरीरातील सर्व रक्त गोठले होते. गोरापान असलेला त्याचा देह कोळश्यासारखा काळा पडला होता. नक्की कशाने त्याचा मृत्यू झाला याचा अजूनही उलगडा झालेला नाही. त्याला पुरविण्यात आलेली सुरक्षा ही त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला असलेल्या सुरक्षेच्या समकक्ष होती. तरीही ती भेदण्यात त्याच्या शत्रूला कसे काय यश आले? हा प्रश्न निर्माण झाला. त्यावर उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेत शोधपत्रकारिता करणारा एक धाडसी पत्रकार पुढे आला त्याने सर्व सुरक्षा भेदून या पत्रकाराने जिथे हा गुप्तहेर राहत होता त्याठिकाणी महत्प्रयासाने प्रवेश मिळविला आणि त्याला त्या गुप्तहेराच्या सुटकेसमध्ये काही महत्वाची माहिती सापडली. ती माहिती सापडल्यानंतर त्याला या गुप्तहेराच्या खुनाचा उलगडा झाला. त्याला या खुनाच्या पाठीमागे त्याच्या देशाच्या अध्यक्षासह आणखी काही देशांचे राष्ट्रप्रमुख असल्याचे लक्षात आले. त्यात आणखी कोणत्या देशाचे प्रमुख आहेत हे शोधण्यासाठी हा पत्रकार त्या त्या देशातील त्या गुप्तहेराचे गुप्तहेर मित्र आणि शोध पत्रकार (यांची माहिती त्याला त्या गुप्तहेराच्या सुटकेस मध्ये सापडली) यांना भेटण्यासाठी सुरवात केली आणि त्याचा शोध ज्या देशात आल्यावर संपला तो देश म्हणजे भारत!  
भारतात आल्यानंतर त्याला या गुप्तहेराचा खुनाचा संपूर्ण उलगडा झाला. असे काय कळाले त्याला या सगळ्या गाठीभेटीतून?
        आज जगाच्या पाठीवर विविध देशात घडणारी अनेक चांगली वाईट कृत्ये, अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी, गुंड, त्यांच्या संघटना, त्यांचे व्यवसाय, गुंतवणुकी या सगळ्या घटना एकमेकांशी निगडित असून त्या सगळ्या पूर्वनियोजित असतात. या सगळयांचे एक आंतरराष्ट्रीय संघटन असून जगभरातील विविध देशात घडणारी आतंकवादी कृत्ये, आर्थिक गैरव्यवहार, युद्धे आणि बरेच काही अगोदरच ठरविलेले असते आणि या संघटनेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, सहसचिव आणि खजिनदार हे जगातील सर्वात मोठ्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांचे प्रमुख असतात. काहीही झाले तरी या प्रमुखांना हे पद स्वीकारावेच लागते. जर त्यातील कोणीही या पदातील एखादे पद स्वीकारण्यास नकार दिला तर त्याचे सरकार आंतरराष्ट्रीय कट करून पाडले जाते. समजा हा कट करूनही त्यांचे सरकार पडले नाही तर त्या देशावर युध्द लादणे किंवा त्या राष्ट्रप्रमुखाचा खुनही केला जाऊ शकतो. यातील महत्वाची बाब म्हणजे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था सतत बदलत असते. २००९-१० मध्ये जगातील एक नवीनच देश या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे २०१४-१५ पर्यत हा देश पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून पुढे आल्यास त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखास सहसचिव किंवा खजिनदार पद स्वीकारण्यास राजी करण्याचे।प्रयत्न चालू होते त्याला या राष्ट्रप्रमुखांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यासाठी २०१४-१५ मध्ये पराभव स्वीकारावा लागला तरी चालेल अशी ठाम भूमिका या राष्ट्रप्रमुखांनी घेतली. त्यानंतर या  देशात झालेली आंदोलने, मोर्चे आणि अंतर्गत उलथापालथ यांची एक केस स्टडी या गुप्तहेराने तयार केली होती जी तो उघड करणार होता. यात कटात तो ज्या देशाचा नागरिक होता त्या देशाचा, ज्या देशात तो वास्तव्यास होता त्या देशाचा राष्ट्रप्रमुख यांचाही सहभाग होता. 
क्रमशः

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...