Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

माणगांव परिषद: बहिष्कृतांचे रणशिंग- उत्तम कांबळे

  Home   आमच्याविषयी   संपर्क   ▼ Thursday, 25 June 2020 माणगाव परिषद : बहिष्कृतांचे रणशिंग - उत्तम कांबळे 'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद ’  हा उत्तम कांबळे यांचा ग्रंथ ‘ लोकवाङ् ‌ मय गृह ’ तर्फे लवकरच वाचकांच्या भेटीसाठी येत आहे. एका ऐतिहासिक परिषदेच्या शंभर वर्षे मागे जाऊन तिला अस्वस्थ शतकाशी जोडणारा हा ग्रंथ अतिशय महत्त्वपूर्ण आणि समाजक्रांती घडवणार्‍या असंख्य संदर्भांशी जोडला गेला आहे. ग्रंथासाठी लेखकाने लिहिलेल्या दीर्घ मनोगताचा हा सारांश. . माणगाव येथे झालेल्या (२१ ,  २२ मार्च १९२० )  बहिष्कृत वर्गाच्या पहिल्या परिषदेमुळे अस्पृश्यतेतून मुक्त होण्यासाठी लढाईचं पहिलं मैदान तयार झालं. सामाजिक युद्धासाठी पहिला बिगुल वाजला तो माणगावातच. अस्पृश्यांना नवा , तडफदार ,  संघर्षशील ,  त्यागी ,  ज्ञानी नेता लाभला तो माणगावातच. युद्...

आणीबाणी आणि दलितहीत

आणीबाणीकडे बघायचा एक दलित दृष्टिकोनही आहे. त्याबद्दल चर्चा होत नसते. पण आणीबाणी दलितांसाठी एक मुक्तीचा मार्ग होता. तो त्यांचासाठी सुवर्णकाळ होता. दलित खर्या अर्थाने सामाजिक राजकीय नी आर्थिक स्वातंत्र्यचा अनुभव घेऊ लागले होते. दलितांना मिशा वाढवून फिरण सुद्धा ज्या देशात बंदी होती त्या देशात ते मिशा वाढवून अभिमानाने कोणतीही भिती वा तमा न बाळगता फिरू लागले होते. त्यांना आता गावातल्या धनदांडग्यांची, जमिनदारांची, जातपंचायतीची कसलीही भिती वाटतं नव्हती. कारण आणीबाणीचा काळात व्यवस्था एकदम शिस्तीत काम करत होती. प्रस्थापित वर्ग इंदिरा गांधीना घाबरत होता. दलितांवरचे अत्याचार अचानक कमी झाले होते. एवढचं नाही तर त्याकाळात इंदिरा गांधीनी दलित अदिवासी हिताचे अनेक निर्णय घेतले होते.इ इंदिरा गांधीं विरोधी गट हा इंदिराजींचा राजकीय आणीबाणीला विरोध करत असताना त्यांचा सामाजिक व आर्थिक निती काय होत्या? दलित वंचितांसाठी निती काय होत्या याकडे मात्र दुर्लक्ष करतात. इंदिरा गांधी विरोधी गट मुख्यतः आरक्षण नी बँकांचा राष्ट्रीयकरणा विरोधात होता. तो गट प्रस्थापित उद्योगपतींचा बटिक होता. काँग्रेस मध्ये फुट पडण्यास ...

वैचारिक पंढरीची वारी

********** 🚩 *|| वैचारिक पंढरीची वारी ||* 🚩 *। आप आपल्या घरी ।* 🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁 संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना महामारीची वर्तमान स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, देहू आणि आळंदीहून पंढरपूर ठिकाणी पायीवारी जाणार नाही हा वैचारिक निर्णय घेणार्या सर्व वारकरी संप्रदायाचे अभिनंदन••••• पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते. हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आणि वैभवशाली परंपरा जपणार्‍या वारीत टाळ, मृदंग गर्जत आणि मुखी पांडुरंगाचे नाव घेत, नाचत लाखो वारकरी सहभागी होतात. आषाढी वारीचा हा आनंद सोहळा बहुजनांच्या आयुष्यांला धन्य धन्य झाल्याचा अनुभव देतो पंढरीची वारी, संताच्या दिंड्या, ज्ञानदेव व तुकाराम पालख्या ह्या सोहळ्याची सुरवात नेमकी कोणत्या काळात झाली तसेच वारी, दिंड्या, पालख्याचा आरंभ कोणी केला या सारख्या प्रश्नात न पडता आपण सरळसरळ पाहणार आहोत••••• पंढरपूरला जाणार्या दिंड्या किंवा वारीचा गाभा हा नक्कीच समाजभिमुख आहे आणि वारीचा *संदेश जित...