Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

राहुल गांधींना नक्की करायचंय तरी काय?

 राहुल गांधींना नक्की करायचंय तरी काय? उत्तरप्रदेशमधील काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय जतीन प्रसाद यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. तसे पाहता ते मनाने कधीच काँग्रेसमध्ये नव्हते. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका, २०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. तेव्हाच २०१९ मध्ये ते मनाने भाजपमध्ये दाखल झाले होते पण प्रियंका गांधींच्या मध्यस्थीमुळे थांबले होते. त्यांनतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती तिथे काँग्रेसला सपशेल अपयश आले. त्यानंतर मात्र आता आपण काँग्रेसमध्ये थांबण्यासारखे काहीही राहिले नाही असा ठाम निश्चिय करून आता होऊ घातलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपकडे जाण्यासाठी उड्डाण भरले आहे. त्यामुळे राजस्थानातील युवा आणि प्रभावी नेते सचिन पायलट यांच्या बंडाला पुन्हा एकदा आकाश प्राप्त झाले आहे. जतीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण नेते असून तेथील ब्राह्मण लोकसंख्या १३% इतकी आहे आणि जतीन प्रसाद गेली तीन वर्षे ब्राह्मण संघटन करत होते. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपच...

नेहरू समजून घेताना......!

 [12/11, 19:37] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 #1 सध्या नेहरू मोठे की वल्लभभाई पटेल, असा वाद हेतुत: निर्माण केला जात आहे. पटेलांनी नेहरुंचे मोठेपण मान्य केले होते, तरीही पटेल पंतप्रधान झाले असते तर, असा सवाल केला जातो आहे.   रामगढच्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने वसाहतीचे स्वराज्य झिडकारून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. हा ठराव का झाला, असा प्रश्न तेव्हाच्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनाही पडला. या ठरावाचा मसुदा तयार करणारे होते पंडित जवाहरलाल नेहरू. मात्र वल्लभभाई, राजेंद्र प्रसाद आणि राजाजी हे पुन्हा सत्ताग्रहण करण्याचा आग्रह धरत होते. पटेल यांचा विजय झाला असता तर नेहरू बाहेर पडतील या भीतीने गांधीजींनी सत्ताग्रहणाचा निर्णय लांबणीवर टाकला. याचा अर्थ नेहरू हे सत्तेसाठी हपापलेले होते, असा जो प्रचार केला जातो तो किती खोडसाळपणाचा आहे, हेच इथे स्पष्ट होते. _ _ _ _ _ _ _ _ _ _  अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या.  https://bit.ly/3klKsUj [13/11, 08:07] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...* 🌺🌺🌺🌺🌺🌺 #2 *विवेका...

लालफितीच्या कारभाराची गोष्ट!

  लालफितीच्या कारभाराची गोष्ट! आज खुप दिवसांनी तपन सिन्हा दिग्दर्शित "एक डॉक्टर की मौत" हा अत्यंत सकस आणि वास्तवदर्शी सिनेमा पाहिला. हिंदी चित्रपट क्षेत्रातील मैलाचा दगड ठरावा इतका नितांत सुंदर सिनेमा तपन सिन्हा यांच्या लेखनातून आणि दिग्दर्शनातून १९९० च्या दशकात मोठ्या पडद्यावर अवतरला. हिंदी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत ताकदीच्या  पटकथाकार आणि दिग्दर्शकांमध्ये तपन सिन्हा यांचा समावेश होतो. रामपद चौधरी यांच्या गाजलेल्या 'अभिमन्यू' या कादंबरीवर या चित्रपटाचे कथानक बेतलेले आहे.  रामपद चौधरी आणि तपन सिन्हा हे दोघेही काळाच्या पुढचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यातही तपन सिन्हा यांचे प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली चित्रपटात सृष्टीतील योगदान अत्यंत मोलाचे समजले जाते. त्यांच्या या योगदानाचे मोजमाप करताना सत्यजित रे आणि मृणाल सेन यांच्याशी त्यांची तुलना केली जाते यातच सर्वकाही आले.  चित्रपट लेखन आणि दिग्दर्शनातील ११ राष्ट्रीय पूरस्कार आणि सर्व मानाचे पुरस्कार नावावर असलेल्या तपन सिन्हा यांना काळाच्या पुढचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते ते 'एक डॉक्टर की मौत...