Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

नेहरूंमुळेच कश्मीर भारतात...!

 *नेहरूंमुळेच काश्मीर भारतात* भारताच्या या पहिल्या पंतप्रधानांच्या नावाचा नुसता गजर २०१४ सालच्या निवडणुकांपासून चालू आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या काही समस्या निर्माण झाल्या, त्यास पंडित जवाहरलाल नेहरू हेच जबाबदार आहेत, असा धोशा २०१४ च्या निवडणूक प्रचारापासून लावण्यात आला आहे. मग ते अर्थकारण असो, राजकारण असो वा देशातील इतर कोणतेही क्षेत्र असो. थोडक्यात, नेहरूंमुळे देशाची आज ही ‘स्थिती’ झाली आहे आणि ती सुधारायची असल्यास ‘काँग्रेसमुक्त भारत’ हवा, अशी ही भूमिका आहे. ... आणि देशापुढची आजची सर्वात मोठी समस्या ही दहशतवादाची आहे. हा दहशतवाद पाकपुरस्कृत आहे. पाक हे डावपेच खेळत आहे, ते काश्मीर त्याला न मिळाल्यामुळे आणि *हा घोळ घातला गेला, तो नेहरूंच्या धोरणात्मक चुकांमुळे, अशी टीकेची झोड उठविली जात आली आहे. ही भूमिका काही नवीन नाही.* गेल्या ६५ वर्षांत अधूनमधून ती मांडली जात आली होती. किंबहुना देश एकसंध न राहता त्याची फाळणी झाली, त्यासही नेहरूच जबाबदार होते, अशी भूमिका घेतली जात आली आहे. *मात्र २०१४ च्या निवडणूक प्रचारापासून ही भूमिका प्रचाराद्वारे पद्धतशीररीत्या पसरवली जाऊ लागली आहे.*...

उतरलेला उत्तररंग

उतरलेला उत्तररंग......! गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जातीने पुढाकार घेऊन जम्मू-कश्मीरमधील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना फोन केले आणि पुढच्या आठवड्यात राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली आहे तेव्हा आपण सर्वांनी उपस्थित राहून आपली मते (मागण्या नव्हे!) मांडावीत असे आवाहन केले आणि त्यानुसार २४ जूनला ही बैठक पार पडली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मोदींनी सर्वांची मते शांतपणे ऐकून घेतली. पण कोणालाही कोणतेही आश्वासन दिले नाही की जम्मू-कश्मीरबाबत कोणताही ठोस कृती कार्यक्रम जाहीर केला नाही. मुळात सखोल विचार करता सरकारने अद्याप याविषयावर काहीच ठोस ठरविलेले दिसत नाही की निर्णयही घेतलेला दिसत नाही. मग अचानक ही बैठक का बोलाविली? आणि याने काय साध्य झाले? किंवा ही अशी बैठक घेण्याची त्यांच्यावर वेळ का आली? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.  मुळात मोदी काय किंवा शहा किंवा केंद्रसरकार काय? कलम ३७० आणि ३५अ  रद्द करणे असो की जम्मू-कश्मीरचे त्रिभाजन असो. मोदी-शहा आणि सरकारने आतातायीप...

द फक इट लिस्ट..........

 द फक इट लिस्ट............ आई वडील आणि मुले यांच्यातील नाते कसे आहे हे सगळ्यात जास्त चांगले कोणाला माहीत असेल तर ते त्या मुलांना. अर्थात पालकांनाही ते माहीत असते पण त्यात एक पक्षपतीपणा किंवा गैरसमज असतो. जसे की आम्ही आमच्या मुलांसाठी जे काही करतो ते इतर कुठलेच पालक करत नाहीत, आमच्या मुलांना आम्ही कधीही काहीच कमी पडू देत नाही, आमच्या मुलांना आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, आम्हांला जे मिळाले नाही ते आम्ही आमच्या मुलांना द्यायचा पुरेपूर प्रयत्न केला, आम्ही आमच्या मुलांना चांगली शिस्त लावली, आम्ही त्यांच्या निर्णयाला विरोध करतो म्हणजे आम्ही त्यांचे शत्रू नाही, मुलांना समज असली तरी अनुभव नसतो त्यामुळे त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय यातला फरक कळत नाही, मुलांना वाईट सांगत लागू नये म्हणून त्यांना रागावलो किंवा शिक्षा केली तर त्याचा मुलांनी एवढा बाऊ कशाला करायला हवा, अशी आणि यासारखी अनेक मते आणि समज पालकांनी करून घेतलेले असतात. अश्या वेळेस पालक म्हणून याकडे पाहणारे अनेक लोक 'हो हे बरोबरच आहे!' असे म्हणून समर्थनही करताना दिसतात. बऱ्याचवेळा पालक फारच कडक शिस्तीचे आणि दुराग्रही असती...