Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

देशातील दलित-आदिवासी अत्याचाराचा आलेख चढाच!

देशातील दलित-आदिवासी अत्याचाराचा आलेख चढाच! प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "जग हे वास्तव्यासाठी अत्यंत धोकादायक ठिकाण आहे आणि त्याला कारण जगात वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत हे नसून  स्वतःला चांगले म्हणवणारे लोक त्याविरुद्ध काहीच करत नाहीत हे आहे".  आईन्स्टाईन यांनी सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्यासमोर हे वैश्विक सत्य मांडले होते. हे सत्य मांडताना त्यांनी वाईटपणापेक्षा चांगुलपणाला अधिक दोष दिलेला दिसतो. काळ जसा पुढे जाईल तसे हे बदलत जाईल असा युक्तिवाद थेट त्यांच्या वक्तव्यातून आला नसला तरी काळानुसार माणसाचे विचार आणि कृती यात सकारात्मक बदल होईल असा आशावाद आईन्स्टाईन यांच्या व्यक्तव्यातून शोधता येईल. आईन्स्टाईन यांचा काळ तर आताच्या परिस्थितीपेक्षा जास्त भयानक, दहशतीचा आणि दडपशाहीचा असणार यात शंका वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे या प्रवृत्तींची अस्त्रे काळ, देश, प्रांत, खंड यानुसार वेगवेगळी असणार पण त्याचे परिणाम मात्र जगभर सारखेच असणार हेही तितकेच खरे! ही अस्त्रे काय आहेत हे पाहिले तर पाश्चिमात्य देशातील वर्ण आणि वर्गवाद, मुस्लिम राष्ट्राती...

कृष्णाचा खरा इतिहास

 खरा इतिहास श्रीकृष्ण हा ऐतिहासिक पुरुष होता.होय बरोबर वाचलत, देव नाही ऐतिहासिक पुरुष.कृष्णाची तुलना केलीच तर ती फक्त शिवाजी महाराजांबरोबर होऊ शकते .कृष्णाचा इतिहास हा त्याच्या कपोलकल्पित चमत्कारांपेक्षाही अधिक रंजक आहे.नरहर कुरुंदकर यांनी व्यासांचे शिल्प या पुस्तकात कृष्णाचे ऐतिहासिक पुरुष म्हणून विवेचन केले आहे.कृष्णाची खरी ओळख व्हावी म्हणून हा त्यातील निवडक भाग खाली मांडला आहे.एका सामान्य मंत्र्याचा मुलगा ते राष्ट्रनिर्माता हा कृष्णाचा प्रवास थक्क करणारा आहे.हा इतिहास वाचल्यावर आपलं किती अज्ञान दूर झालं ही भावना मलातरी आली होती. यादवांचे गणतंत्र आहे. ते कलोपजीवी, पशुप्रधान गणतंत्र आहे. हे मुद्दे आपण नीट लक्षात घेतले पाहिजेत. पशुप्रधान याचा अर्थ असा की, गोधन हे त्यांचे मुख्य धन. त्यामुळे गाईची विक्री, बैलाची विक्री, दुधाची विक्री हा मुख्य उद्योग. शेती अनुषंगाने आलीच. हे जे पशुप्रधान, गोपालप्रधान अशा प्रकारचे यादवांचे गणतंत्र आहे; त्याच्यात भोज, अंधक असे छोटे-छोटे गट आहेत. या गटांचे मिळून हे गणतंत्र आहे. हे जे गणतंत्र श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेले आहे, त्याचा एक नेता कंस आहे...

उमाजी नाईक

 *🌹🌹|| आद्यक्रांतीविर नरवीर उमाजी नाईक जयंती.||🌹🌹*   मंगळवार दि. ०७ सप्टेंबर २०२१          सशस्त्र क्रांतीचे पाहिले जनक स्वतंत्र भारताचे आद्यक्रांतीविर पुरंदरचे वीर वाघ, गरिबांचा वाली जनतेला ज्यांनी लुबाडले छळले त्यांचे कर्दनकाळ इंग्रना सलग चौदा वर्षे सळोकीपळो करून सोडणारे आणि सर्व प्रथम इंग्रजांविरुद्ध स्वराज्यासाठी क्रांती करून बंड पुकारणारे क्रांती घडवणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर वाघ आद्यक्रांतीविर नरवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा प्रथमतः मुजरा.            श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन इंग्रज सरकारच्या विरुद्ध बंड करून स्वतःचे स्वराज्य निर्माण करणारे आद्यक्रांतीविर नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी रामवंशी बेडर समाजात लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला.            नरवीर राजे उमाजी नाईक यांचं कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या स्वंराक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी प्राप्त झाली....