देशातील दलित-आदिवासी अत्याचाराचा आलेख चढाच! प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "जग हे वास्तव्यासाठी अत्यंत धोकादायक ठिकाण आहे आणि त्याला कारण जगात वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत हे नसून स्वतःला चांगले म्हणवणारे लोक त्याविरुद्ध काहीच करत नाहीत हे आहे". आईन्स्टाईन यांनी सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी आपल्यासमोर हे वैश्विक सत्य मांडले होते. हे सत्य मांडताना त्यांनी वाईटपणापेक्षा चांगुलपणाला अधिक दोष दिलेला दिसतो. काळ जसा पुढे जाईल तसे हे बदलत जाईल असा युक्तिवाद थेट त्यांच्या वक्तव्यातून आला नसला तरी काळानुसार माणसाचे विचार आणि कृती यात सकारात्मक बदल होईल असा आशावाद आईन्स्टाईन यांच्या व्यक्तव्यातून शोधता येईल. आईन्स्टाईन यांचा काळ तर आताच्या परिस्थितीपेक्षा जास्त भयानक, दहशतीचा आणि दडपशाहीचा असणार यात शंका वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे या प्रवृत्तींची अस्त्रे काळ, देश, प्रांत, खंड यानुसार वेगवेगळी असणार पण त्याचे परिणाम मात्र जगभर सारखेच असणार हेही तितकेच खरे! ही अस्त्रे काय आहेत हे पाहिले तर पाश्चिमात्य देशातील वर्ण आणि वर्गवाद, मुस्लिम राष्ट्राती...