Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

नेहरुवाद : आयडिया ऑफ इंडिया ! - श्रीरंजन आवटे

  -------------------------------------------- *नेहरुवाद : आयडिया ऑफ इंडिया !* ------------------------------------------- भाग -1 अलीकडच्या काही वर्षात सर्व प्रश्नांचं मूळ नेहरुंमध्येच आहे, असं बिंबवण्यासाठी पराकाष्ठा सुरु आहे; मात्र या अपप्रचाराच्या तोफेतूनही नेहरुंचे बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि समग्र जीवनदृष्टी याच बाबी अधोरेखित होत राहतात. त्यामुळेच त्यांच्या काळाहूनही आज नेहरुंचे संदर्भमूल्य अधिक जाणवते  आहे.  विसाव्या शतकाच्या मध्यावर विशेषतः दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्या. यातील बहुतांश राष्ट्रांमध्ये एकाधिकारशाही, लष्करशाही निर्माण झाली. लोकशाही हेलकावे खाऊ लागली. या राष्ट्रांच्या स्वातंत्र्योत्तर राजकीय प्रवासाच्या आलेखावर नजर टाकली असता भारताचे वेगळेपण ठळकरित्या लक्षात येते.  या अभूतपूर्व वेगळेपणात नेहरुंचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ९ वर्षे तुरुंगात असलेला माणूस स्वतंत्र भारताचा १७ वर्षे पंतप्रधान होता. त्यामुळे नेहरु हा स्वातंत्र्यपूर्व भारताला स्वातंत्र्योत्तर भारताशी जोडणारा पूल होता. या भक्कम पुलाम...

माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा.

माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा.....भाग १ प्रत्येक नात्यात म्हणजे अगदी मैत्रीत, नवरा-बायकोत, आई-मुलीत, भाव-बहिणीच्या नात्यात... अगदी कोणत्याही नात्यात एकमेकांसाठी आदर, एकमेकांसाठी प्रेम,एकमेकांची जाणीव,  एकमेकांसाठी space, एकमेकांप्रती जबाबदारीची जाण, आणि ती प्रत्यक्षात क्रुतीपुर्ण देणं घेणं, empathy अशा क्षमता लागतात.... त्या दोन्ही बाजूंनी असतील तर नात फुलत,टिकत आणि खर खर बहरत....  कोणतीही दोन माणस एकत्र आली की वाद संवाद, मतभेद हे होत राहतात... चुका होतात....पण एकमेकांशी बोलत सामोपचाराने हे छोटे छोटे विसंवाद संपवता आले तर चांगलं आहे..... एकमेकांना माफ करत , एकमेकांची माफी मागत जी नाती आनंदी वातावरणात परिपक्व होत जातात...mature होतात.... ती एकमेकांना ओझ होत नाहीत हे आहे forgive and forget Self actualization काही माणसं समोरचा कसा ही असला तरी नात्यात comfortable रहातात....समोरच्या माणसाला आहे तसा खरोखर स्वीकारतात....आणि स्वतः ला त्रास करून न घेता समोरच्या माणसाला योग्य पद्धतीने हाताळतात ....  forgive and forget इथे ही होताना दिसत... माणूस मनातून जे...

संत रवीदासांचे क्रांतिकारक विचार!

  संत रवीदासांचे क्रांतिकारक विचार! प्रस्तावना: भारतीय प्रमुख संतांमध्ये ज्या संतांचे नाव अग्रभागी घेतले जाते त्यामध्ये संत रवीदासांचे नाव अग्रभागी आहे. जन्माने दलित असलेल्या रविदास यांची जन्मतारीख निश्चितपणे सांगता येत नसली तरी त्यांचा जन्म साधारण 1450 मध्ये झाला असा त्यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि तज्ञांचा कयास आहे. रघुराम आणि  घुरबिनिया या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या रवीदासांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसीच्या जवळ असलेल्या श्री गोवर्धन या गावी झाला. हे ठिकाण सध्या त्यांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते. रवीदासांच्या वडिलांचा चामडे कमविण्याचा व्यवसाय होता आणि ते मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून बनविले जात असे. या व्यवसायाकडे हीन नजरेतून पाहिले जात असल्यामुळे त्यांची, त्यांच्या परिवाराची आणि हा व्यवसाय करणाऱ्या चमार (अर्थातच चांभार) या जातीची अस्पृश्य जातीत गणना केली जात असे.  शूद्र म्हणून गणले जात असले तरी जन्मापासूनच रावीदासांचा स्वभाव, वर्तन आणि समज आध्यात्मिक विचारांच्या जवळ जाणारे होते. त्यामुळे अगदी लहानवयातच ते उत्तरप्रदेशातील भक्ती चळवळीच्या  प्रभावाखाल...