Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

वर्ण वर्चस्वाचे संघर्षमय चित्रण :काला कलीकरण

वर्ण वर्चस्वाचे संघर्षमय चित्रण : काला कलीकरण  बदलत्या काळात विशेषतः जागतिकीकरणामुळे जगातील प्रत्येक देशातील जातीय, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक समिकरणे बदलतात असे म्हटले जाते. हे बदल 1991 नंतरच्या खाऊजा धोरणानंतर भारतातही झपाट्याने घडून आले.  पण त्या बदलांना अंगिकरताना जातीच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली आपण ज्या चुकीच्या प्रथा, परंपरा, जातीय आणि धार्मिक सत्ताकेंद्रे  सांभाळण्याचा आटापिटा केला त्यातून देशाचे आणि समाजाचे नुकसानच झाले. रजनीकांतचा "काला" यावरच प्रकाश टाकतो.  त्यामुळे त्याच्या चांगल्यावाईट बाजूवर प्रकाश टाकणे आवश्यक ठरते. रजनीकांतचा कोणताही चित्रपट म्हटले की तो सबकुछ रजनीकांत असतो.  तसाच हाही चित्रपट असणार असे गृहीत धरून चित्रपटगृहात  जाणाऱ्या प्रेक्षकांना रजनीकांत आणि नानाच्या जुगालबंदीची मेजवानीच अनुभवायला मिळते.  परिंदानंतर नानाने साकारलेला हा खलनायक अत्यंत खतरनाक आहे. थंड डोक्याने आपला कार्यभाग साधणारा, देशप्रेमाचे ढोंग करून स्वहित पाहणारा, जातीने वागणारा, अपमानाने पेटून उठणारा नाना जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा रजनीपेक्षा...

कविता : वटसवित्रीचा खेळ

वटसावित्रीचा खेळ......... मारू नको फेऱ्या आता, श्वास माझा गुदमरतोय. सांगू कसे तुला आता, मी आतल्या आत तडफडतोय. दोरे गुंडाळून का कधी, जोडी नक्की होते? करून असले उपद्व्याप, अंधश्रद्धा मात्र पक्की होते. सात जन्माची सोबत म्हणे, खरं सांग याला काही अर्थ आहे? नसेल नात्यात आपुलकी, माणूस जन्मच व्यर्थ आहे. पाखरं सुद्धा संसार करतात, पण आरक्षण नसते कुणाचे. सात जन्मी तोच नवरा, खेळ सगळे मनाचे. शिकली सावरलेली तू, अपराध निराक्षरांचा क्षम्य आहे. वट सावित्रीची कल्पना, गॊष्टीसाठी रम्य आहे. विज्ञानाच्या युगातली, सुपर वूमन ना ग तू. अंधश्रद्धा जोपासल्या तर, होते बर का छि थू. अडाणी बाया- बापाड्यांना, शहाणं करणं हे तर तुझं खरं काम सॊडून खरा स्त्रीधर्म, मुखात मात्र सदा राम. घ्यावा मोकळा श्वास, मला सुद्धा वाटते. काची दोऱ्याची धार तुझ्या, साल माझी कापते. कारायचीयच ना तुला वट सावित्री, अजून एक झाड लाव. जोडीने कर संगोपन, वाढेल माझा भाव. निक्षून सांग साऱ्यांना, वट सवित्रीचा खेळ म्हणजे थोतांड आहे सारे. हिच योग्य वेळ आहे, जाग्या साऱ्या व्हा रे. ©के.राहुल ९०९६२४२४५२

नित्याचे विस्मरण

काळ साधारण स्वातंत्र्यानंतरचा आहे. मागासवर्गीय राजकारण हा जरी केंद्रबिंदू असला तरी देशहित अंतिम मानणाऱ्या आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांना कडाडून विरोध करण्याची क्षमता असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. याच बाबासाहेबांना नेहरुंना त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर अनिच्छेनेच केंद्रीय मंत्रिमंडळात सामील करावे लागले. त्यांचे शक्य तेवढे खच्चीकरण करण्यासाठी त्यांना तुलनेने कमी महत्वाचे कायदा खाते देण्यात आले. कर्तृत्ववान माणसाला काहीही जबाबदारी दिली तरी त्या माणसाच्या कर्तृत्वाने मोठी क्रांती घडून येते.  बाबासाहेबांनी यात मोलाची भर टाकताना अनेक कायदयाची विधेयके तयार केली आणि संसदेच्या पटलावर मांडली त्यातील अनेक विधेयके पारित झाली आणि त्यांचे कायदा मध्ये रूपांतर झाले पण दोन विधेयके नेहरू आणि मंडळींनी संसदेच्या पटलावर मांडू दिलीत नाहीत आणि त्याचा निषेध म्हणून बाबासाहेबांनी तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ती दोन विधेयके म्हणजे हिंदू कोड बिल आणि आणि ओबीसींना आरक्षणासाठी आयोगाची स्थापना. हि दोन्ही विधेयके अनुक्रमे पुरुष वर्चस्वविरोधी आणि सवर्णहीत विरोधी आहेत  म्हणू...

जातीय वर्चस्वाचा सरकारी निर्णय

केंद्रसरकारने प्रशासकीय नियुक्त्यांसाठी खाजगी क्षेत्रातील हुशार लोकांना थेट नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी UPSC परीक्षेला फाटा देण्याचे ठरविले आहे हा निर्णय अनेक अंगांनी परिणामकारक असून त्याचे विश्लेषण करणे महत्वाचे आहे. महत्वाची यासाठी कि सरकारने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात आणि बऱ्याचदा ते अल्पकाळात दिसून न येता दीर्घ काळात दिसून येतात. त्यामुळे अशावेळेस प्रश्न उरतो तो म्हणजे सरकारने घेतलेला निर्णय चांगला कि वाईट याचाच. भारतात UPSC मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या काठिण्यपातळीवर जगातील विविध देशांचा विचार करता दोन नंबरच्या अवघड परीक्षा समजल्या जातात. मुळात ज्यू नंतर जगातील सर्वात हुशार लॊक भारतीय आहेत असे जागतिक पातळीवरील अनेक शास्त्रीय चाचण्यामधून सिद्ध झाले आहे . तेव्हा UPSC परीक्षा पास होणारा उमेदवार अगदी नवखा असला तरी आयुक्त बनून संपूर्ण शहर किंवा कलेक्टर बनून जिल्ह्याचा कारभार सहज हाताळू शकतो तेही फक्त सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर. याची अनेक उदाहरणे आपल्या समोर येतात. याचाच अर्थ देश चालविण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेचे लोक भारत...