Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

अनुसुचित जाती,जमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल- प्रा. हरी नरके

 अनुसुचित जाती,जमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल- प्रा. हरी नरके डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्या अधिकारात येतच नाही. सबब हा मुद्दा या ब...

रामराज्यातील अराजक!

 रामराज्यातील अराजक! ©के.राहुल, 9096242452 इंडियन आयडॉल सीझन-१० अनेक अर्थाने गाजला. सोनी या सर्वाधिक टीआरपी असलेल्या टीव्ही चॅनेलवरील जगभरातून प्राधान्याने पहिल्या जाणाऱ्या कार्यक्रमातील एक म्हणून या गीत गायन स्पर्धेत लाखो नवयुवक युवतीमधून सहभागी होतात. त्यांची आवाज चाचणी(Audition)घेतल्यानंतर त्यातून अगोदर ४० आणि त्यातून उत्तम १० आणि नंतर सर्वोत्तम ३ आणि शेवटी सर्वश्रेष्ठ नवोदित गायक अशी निवड केली जाते. यामध्ये परीक्षकांच्या पसंतीसह प्रेक्षकांची पसंतीही विचारात घेतली जाते. या स्पर्धेत हाथरसच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या उत्तरप्रदेश या राज्यातील लाखीमपूर खिरी या गावातून  एक होतकरू मुलगा या स्पर्धेत सहभागी झाला होता.  अत्यंत गोड गळा, खणखणीत आणि तितकाच श्रवणीय आवाज असलेल्या या मुलाची टॉप १० मधून अचानक गच्छंती झाली. परीक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला. इतका गोड आवाज असलेल्या या मुलाचा आवाज अचानक प्रेक्षकांना कडू वाटू लागला. कारण त्याला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीच्या मतात अचानक कमालीची घट झाली होती. आमिर खान सारख्या आघाडीच्या नायकासाठी गाणे गाऊ पाहणाऱ्या या पोराला आपल...

कविता - औरत हूं साहब!

 औरत हूं साहब! कौन हो तुम? मै औरत हूं साहब। मेरा मतलब कौन जात की हो? इससे कोई फर्क पडता है क्या? पडता है, हमारी भावना इसपे ही निर्भर करती है। क्या मै औरत हूं ये काफी नहीं है? नहीं है।  अगर मै कहूं, मै उंची जात की हूं तो? औरत को जादा सवाल नहीं पुछने चाहीये। फिर भी मै जानना चाहती हूं। मर्द कभी सच्चाई बताते नहीं, लेकीन तुमने पुछा इसलीये बता देता हूं। उंची जात की हो या नीची जात की। औरत का कोई वजुद नहीं होता! फिर क्यो पुछते हो? क्यो की मै एक अच्छा मर्द हूं। और उंची जात की औरत की थोडी बहुत इज्जत करता हूं।  क्यो? क्यो की मैं खुद उची जात का हूं। अगर मैं कहू मैं नीची जात की हूं तो? तो तुम पिटी जाओगी। लुटी जाओगी। भरे बाजार नीलाम हो जाओगी। तुम्हारा जिस्म नोचा जायेगा। तुम्हारा खून बहेगा। दो चार हाड्डीया भी तूटेगी। जादा बोलोगी तो जबान भी कटेगी। अगर मैंने इसका विरोध किया तो? फांशी देकर मार डालेंगे या फिर केरोसीन डालकर जला देंगे। अगर मेरे घरवालोने आवाज उठाई तो? नहीं उठा पायेगे। क्यो? नीची जातवालोंको आवाज उठाने की इजाजत नहीं है। फिर भी हिंमत जुटाकर आवाज उठाई तो? उनको भी मार देंगे। उनका घ...

गांधीहत्या: सत्य आणि मीमांसा

 गांधीहत्या: सत्य आणि मीमांसा ©के.राहुल, 9096242452 एखादा माणूस चांगला की वाईट हे ठरविण्याच्या अनेक कसोट्या आहेत. त्यांचा वापर करून कोणत्याही माणसांच्या चांगल्या-वाईटपणाची चाचपणी करता येते. असे असले तरी सतत चांगला वागणारा एखादा माणूस अचानक वाईट वागू शकतो किंवा त्या उलट सतत वाईट वागणाऱ्या माणसाकडून कळत नकळत एखादी चांगली कृती होऊ शकते. वाईट माणसाला चांगुलपणाची किंमत कळाली की तो उत्तरोत्तर चांगला होत जातो. अश्या माणसाचे भूतकाळातील विचार आणि वर्तमानकालीन विचार यात खूप तफावत दिसून येते. ही तफावत इतरांच्या मनात वैचारिक गोंधळ निर्माण करू शकते. समोरच्या माणसाला समजून घ्यायची मानसिक आणि बौद्धिक क्षमता नसेल तर सध्या चांगला वागणारा माणूस भूतकाळात कसा नालायक होता याचीच असे लोक अधिक चर्चा करत बसतात. अश्या माणसांबाबत महात्मा गांधी म्हणतात, "एखादा माणूस भूतकाळात कसा वागला आणि भविष्यात कसा वागेल यात फार गुंतून न राहता तो वर्तमानकाळात कसा वागतोय हे पहावे. आता तो चांगला वागत असेल तर तो त्याच्यात झालेला वैचारिक बदल असून त्याचे स्वागत करायला हवे आणि त्याच्या सध्याच्या विचाराला प्रमाण मानायला हवे...