Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

लिंगभेदात अडकलेला शिक्षण दिन........

 लिंगभेदात अडकलेला शिक्षण दिन ........ ©के.राहुल, ९०९६२४२४५२ बदल हा निसर्गाचा स्थायीभाव आहे आणि त्यानुसार तो ते बदल घडवून आणतो. मात्र त्यासाठी निमीत्त ठरतात ती माणसे! त्यामुळे कोणत्याही बदलाकडे नवनिर्मितीची सुरवात म्हणून पाहता येते आणि सुजाण माणूस म्हणून त्याकडे पहायलाही हवे. पण या बदलांचे अधिकार कळत नकळत ज्या माणसांकडे असतात ती माणसे त्याकडे कसे पाहतात यावर त्या बदलांचे परिणाम, प्रभाव आणि यशापयश अवलंबून असते. साहजिकच जी माणसे इतिहासात रमणारी असतील किंवा इतिहासाची मीमांसा करण्यात कमी पडत असतील  त्यांना हे बदल रुचत नाहीत किंवा ह्या बदलांनी आपल्या सत्तास्थानाला धक्का लागेल अशी त्यांची धारणा असेल तर मात्र हे बदल करणे जाणूनबुजून टाळले जाते किंवा ते करत असताना त्यामुळे होणारा प्रभाव सीमित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी वापरली जाणारी शस्त्रे साहजिकच जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग आणि आणखी बरीच काही असू शकतात. बदलत्या काळात शिक्षणासारखे क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेले नाही ही तितकीच दुर्दैवाची गोष्ट.  महाराष्ट्र सरकारने नुकताच सावित्रीमाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हण...

साने गुरुजी यांचे पत्र

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडणाऱ्या वसंताला साने गुरूजींनी लिहलेले अतिशय महत्वाचे पत्र थोर देशभक्त, सामाजिक कार्यकर्ते, लेखक साने गुरुजी . जगाला प्रेम अर्पावे, असं सांगणाऱ्या गुरुजींचं सारं लिखाण मानवधर्माची पताका उंचावणारं आहे. आजही त्यांची पुस्तकं बेस्टसेलर आहेत. पण श्यामची पत्रं हे त्यांचं पुस्तक दुर्लक्षितच राहिलं. त्यात त्यांनी संघ सोडणाऱ्या एका मुलाला लिहिलेली पत्रं आहेत. प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद दत्तु नावाचा एक लहान मुलगा संघ सोडून तुझ्या सेवा दलात आला हे वाचून आनंद झाला. जातीय संघटनांनी हिंदुस्थानचा नाश चालविला आहे. भारतीय मनाला ही कीड लागत आहे. लाठी फिरवून कवायत करून संघातील मुलांची शरीरे दणकट होतील. परंतु शरीरातील मने विषारी होत आहेत. आपल्या संघटनेतील मुलांच्या कानांवर नवीन विचार ते जाऊ देत नाहींत. बौध्दिक गुलामगिरी निर्मिली जात आहे! दुनियेतील सर्व विचारांचा व प्रयोगांचा अभ्यास करून जर कोणी एखादा मार्ग पत्कारला तर ती गोष्ट निराळी, परंतु या जातीय संघटना मुलांची बुध्दीच मारीत आहेत. त्यांच्या आत्म्याचा वध करीत आहेत. आपल्या हिंदुधर्मात गायत्री मंत्राला आपण अत्यंत पवित्र मा...

नागवंश आणि महाराष्ट्र

 नागवंश आणि महाराष्ट्र प्राचीन काळातील नागलोकांचे वंशज आजचे बौद्ध (महार) आहेत, असे राजाराम शास्त्री भागवत यांनी म्हटले आहे. इतिहासचार्य वि. का. राजवाडे, प्र. न. देशपांडे, ह. श्री. शेणोलीकर, एच. एल. कोसारे, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनीसुद्धा वरील मतास पुष्टी दिली आहे. महारांच्या परंपरेनुसार महारांचा पहिला राजा नाग हा होता. नागलोक व नागराजे आपल्या नावात ‘नाग’ व ‘निका’ या शब्दांचा वापर करीत असत. चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या राणीचे नाव कुबेरनागा होते. कळलाय राजाच्या मुलीचे नाव ‘नागलिका’ होते. पद्मावतीला ‘भवनाग, भीमनाग, बृहस्पतीनाग, देवनाग, गणपतीनाग, प्रभाकरनाग व स्कंदनाग या नावाचे राजे होऊन गेले. यावरून बौद्ध तथा महार लोकांचे प्राचीनत्व लक्षात येते. महारांच्या नावावरून या देशाला महाराष्ट्र असे नाव पडले आहे. जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी उत्पत्ती दिली आहे. महार+राष्ट्र = महाराष्ट्र असे होते. या उत्पत्तीला अलेक्झांडर रॉबर्टसन, महात्मा जोतिबा फुले, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर यांनीही या म...

पहिला सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा २९ सप्टेंबर १९१७

 सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा २९ सप्टेंबर १९१७ शिक्षण ही सर्व सुधारणांची गुरूकिल्ली आहे, असे मानणाऱ्या शाहू महाराजांना आपल्या संस्थानात मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण करण्याची तीव्र इच्छा होती. तथापि, असे शिक्षण आपल्या प्रजाजनांना देणे सोपी गोष्ट नव्हती, कारण त्याचा सरकारी खजिन्यावर मोठा ताण पडणार होता. पण, त्याचा विचार न करता महाराजांनी धाडसाने स. १९१७ साली सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. महाराजांच्या हे ध्यानात आले होते की, गावोगावी केवळ शाळा काढून काम भागणार नाही; तर त्या शाळांत मुलांना पाठविण्याची सक्ती पालकांवर करणे गरजेचे आहे. दुसर्‍या शब्दात शिक्षणाची केवळ दारे खुली करून भागणार नाही, तर त्या दारांच्या आत रयतेच्या मुलांना सक्तीने ढकलणे गरजेचे आहे. जाहीरनामा तारीख २१ सप्टेंबर १९१७ इसवी प्रेसिडेंट कम्पलसरी एज्युकेशन कमेटी कोल्हापूर यांनी सक्तीचे शिक्षणाबद्दल खाली लिहिलेले नियम तयार केले. ते मंजूर करण्यात आल्याबद्दल हुजूर सरकारचा मु. ठराव नंबर ३४३ चा होऊन लगत मु.आ.नंबर १२३, तारीख ११ माहे सप्टेंबर सन १९१७ इसवीचे आज्ञेत आल्यावरून प्रसिद्ध करण्यात येत आहे ते : सक्तीचे ...