Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

कविता- सूर्य गेला मावळतीला......

सुर्य गेला मावळतीला...... सुर्य गेला मावळतीला, अन् सावल्या लांब लांब पडल्या. तू मोठा की मी मोठा, सुमारांच्या आपापसात चर्चा कित्येक झडल्या. सुर्य गेला मावळतीला...... कुणी म्हणाले,  मीच खरा जातवान, म्हणून मीच सत्ता राखणार, महान होण्यासाठी मी कितीही थापा ठोकणार. सुर्य गेला मावळतीला...... कुणी म्हणाले, मीच आता नवा इतिहास इथे रचणार, कर्तृत्वाचा वारसा फुका सगळ्यांना सांगत बसणार.   मीच माझी बखर पुन्हा पुन्हा वाचणार, प्रत्येकाच्या वरातीत फक्त आता मीच एकटा नाचणार.  सुर्य गेला मावळतीला...... कुणी म्हणाले,  मी म्हणेन  तीच आता पूर्व दिशा असणार, माझ्या विरोधात जाणारांचे दूध आता नासणार. सुर्य गेला मावळतीला......  

कविता - चमचे

  कविता - चमचे चमचे आले, चमचे! काही तुमचे आले, काही आमचे आले. काही घरचे आले, काही दारचे आले, काही आतले आले, काही बाहेरचे आले.  काही खालचे आले, काही वरचे आले. काही हवेतले आले, काही कवेतले आले. काही कोल्हे आले, काही कुत्रे आले. काही लांडगे आले, काही दांडगे आले. काही लुच्चे आले, काही कच्चे आले. काही लाळघोटे आले, काही बूटचाटे आले. काही टुकार आले, काही मोकार आले.  काही शेंबडे आले, काही चोंबडे आले. काही कवडीचे आले, काही दमडीचे आले. काही हुजरे आले, काही गजरे आले, काही माजलेले आले, काही गाजलेले आले. चमचे आले, चमचे! © के.राहुल, ९०९६२४२४५२.

उदारीकरण आणि भारतातील विविध पंतप्रधानांची भूमिका!

१९९१ ते २०२१ या कालावधीतील भारतीय पंतप्रधानांची उदारीकरणाबाबतची भूमिका आणि त्यांचा दृष्टीकोन.                                                                         प्रा. डॉ. राहुल सदाशिव खरात,                                                                मु. सा. काकडे महाविद्यालय ,        ...

अकबर-बिरबल कथा ५२- जिंकेल तो आपला

  अकबर-बिरबल कथा ५२ - जिंकेल तो आपला! अकबर बादशहा सकाळी सकाळीच दरबारात येऊन बसला होता. दरबारात कोणी आले तरी चीडचीड करत होता. त्यामुळे कोणीही दरबारात यायला तयार नव्हते. अकबराने सकाळची न्याहरीही उरकली नव्हती. वयोमानानुसार वेळेवर नाश्ता आणि जेवण करणे अपेक्षित होते. त्यामुळे बेगम साहिब चिंतेत होत्या. अकबराच्या आवडीचा साजूक तुपातला बदामाचा शिरा करूनही त्याकडे त्याने ढुंकूनही पाहिले नव्हते. अकबराला खाऊ तर घातलेच पाहिजे; पण त्यासाठी काय करावे हे बेगमला सुचत नव्हते. त्यामुळे बेगम अस्वस्थ होऊन आपल्या कक्षात येरझाऱ्या घालत होत्या. तेवढ्यात दासीने बिरबल दरबारात येत असल्याची वार्ता बेगमला कळविली. बेगमला त्यामुळे थोडा धीर आला. त्यांनी स्वतः जातीने जाऊन दरबारात जाणाऱ्या बिरबलाला मध्येच अडविले आणि त्याला सगळे रामायण ऐकविले. त्यावर बिरबलाने बेगमला विचारले, "महाराज गेल्या आठवड्यात आर्यवर्ताला गेले होते ना क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी! तेथे काही गंभीर घडले का?" होय,  अनेक राज्याचे एकापेक्षा एक पारंगत क्रीडापटू तेथे आले होते. त्यामुळे आपल्या राज्यातील क्रीडापटू होतकरु असूनही अपेक्षित यश मिळवू शकल...