Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019
कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर राज्यस्तरीय शिबीर ४ थे वर्ष संकल्पना : आपला भारत-बहुविध भारत ३१.०५.२०१९ पहिला दिवस: उदघाटन सत्र : प्रास्ताविक - मंजूश्री जयसिंग पवार प्रमुख पाहुणे- राम पुनियानी, कॉ. दिलीप पवार, प्रा. एन आर भोसले, इरफान इंजिनियर, पत्रकार जतीन देसाई, मेधा पानसरे, कमलताई विचारे. अध्यक्ष- जयसिंगराव पवार. #हिंदुबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, इसाई हेही आपले बांधवच आहेत. #भारत हा कधीच एकपंथी, एकजाती, एकधर्मा चा नव्हता परंतु आता एकधर्म आणि सरंजामशाही मूल्ये घट्ट होताना दिसत आहेत. # विचारांचा वारसा सांगून चळवळ आणि विचार रुजत नाहीत त्यासाठी विचारांचा पाया भक्कम असावा लागतो. # चांगली माणसे आणि चांगले विचार मोडून किंवा गाडून दुसरे चांगले विचार आणि माणसे उभी राहत नाहीत म्हणून चांगल्या माणसांनी एकमेकांबरोबर काम करणे गरजेचे आहे नाहीतर चांगले विचार आणि माणसे मागे पडतील. मा. राम पुनियानी # शिबिरातील विचारधारा आंदोलनाची भाषा व्हायला हवी. # गुलामगिरी भोगलेल्या राष्ट्रात राष्ट्रवाद भयंकर रूप धारण करतो. या देशांमध्ये प्रामुख्याने धर्माच्या नावाने राष्ट्रवाद फोफावते. ...

दया येते अश्या देशाची........!

दया येते अश्या देशाची........! दया येते अश्या देशाची जिथले नागरिक मेंढरासारखे असतात आणि देशातील पुढारी त्यांना मेंढपाळासारखे हाकत असतात. दया येते अश्या देशाची जिथले पुढारी खोटारडे असतात. जिथे बुद्धिवादी लोक शांत बसून आणि ताकदवान लोक सतत घाबरून असतात. दया येते अश्या देशाची जिथले लोक आवाज उठवत नाहीत आणि आणि संकट काळी देवा धर्माच्या धावा करत बसतात. आणि पुंडांना आपला नेता निवडतात, आणि अन्यायाने व गैरमार्गाने देशावर राज्य करण्यासाठी प्रयत्न करतात. दया येते अश्या देशाची जिथले नागरिक फक्त आपलीच भाषा, धर्म आणि संस्कृती यांचा पुरस्कार करतात. दया येते अश्या देशाची जिथले नागरिक आपल्या मतलबालाच आपला श्वास समजतात, आणि पोटाची खळगी भरली की झोपून राहतात. दया येते असल्या देशाची आणि नागरिकांची सुद्धा जे आपल्या अधिकारांवर बालंट येऊ देतात, आणि टाकतात घाण आपले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तेव्हा स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा  सूंदर आणि सुखाचे नंदनवन असलेला माझा देश अश्रू ढाळत असतो. --------------------- लॉरेन्स फर्निंगघेट्टी.

ATF संमेलन शारदानगर इतिवृत्त

ATF संमेलन - शिक्षणकर्मींचं हक्काचं व्यासपीठ... यंदाचं Active Teacher's  Forum (ATF )तर्फे आयोजित शिक्षण संमेलन 12-13 मे 2019 ला बारामती येथे पार पडलं. Active Teacher's Forum (ATF) काय आहे? मुलांसोबत काम करणारे उपक्रमशील शिक्षक अधिकारी,शिक्षण विषयक काम करणारे अभ्यासक, संशोधक, तज्ञ शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते यांचं अनौपचारिक संघटन म्हणजे ATF. मुलांसोबत प्रत्यक्ष काम करणारा संवेदनशील शिक्षक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. प्रत्यक्ष काम करताना केलेल्या नवनवीन गोष्टी, आलेल्या अडचणी, यातून काढलेला मार्ग, त्या विषयीचा अभ्यास, संशोधन, याविषयीचं आदान प्रदान या गटात चालू  असतं. एकमेकांना समृद्ध करणारा हा गट तितक्याच उत्साहाने वार्षिक संमेलन आयोजित करतो. यात गटातील महाराष्ट्रभरातील शिक्षक व शिक्षणाविषयी आस्था असणारे, सहभागी होतात. संमेलनाचा उद्देश विविध वाड्या-वस्त्यांवर गावोगावी काम करणाऱ्या सर्व शिक्षकांच्या भेटीगाठी ,शिक्षण विषयक चर्चा इत्यादी गोष्टी हा आहे. त्याच बरोबर संमेलनात काही तज्ञ व्यक्तींना सध्याच्या शिक्षण विषयक धोरणांबद्दल, दृष्टिकोन विषयक मांडणी करण्यासाठी बोलावण्या...
From Autobiography : My Struggle, My Life Author : Ananymous माझा संघर्ष, माझे जीवन या आत्मचरित्रातून लेखक: अनामिक अनुवाद : ©के. राहुल आमचं घर गावाकडे तर नातेवाईक सगळे शहरी. शिकले आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडले आणि तिकडेच स्थायिक झालेले.  मम्मीच्या माहेरीपन तसेच. मग गावाकडे किणीतरी रहायला हवे म्हणून आणि गावात व्यवसायात चांगला जम बसलेला म्हणून नोकरी मिळत असतानाही पप्पांनी गावी रहायचा निर्णय घेतलेला. त्या निर्णयाने मम्मी नाखूष होती. नाही म्हटले तरी ती शहरातील होती आणि तितकीच कर्तृत्ववान होती.  पण नवऱ्याला कधी विरोध करायची नाही. मग शाळांना सुट्ट्या पडल्यावर दोन्हीकडच्या जत्रा आमच्या घरी यायच्या आणि एकच धमाल उडायची. नाही म्हटलं तरी मम्मीवर त्याचा खूप ताण पडायचा ।मला तिच्याबद्दल कणव यायची. मग मी ठराविक वेळ खेळायला देऊन तिला घरकामात मदत करायचो. तिलाही बरे  वाटायचे. त्याचा मला एक फायदा असाही झाला दहावीत जाईपर्यत मला सगळा स्वयंपाक आणि घरकाम व्यवस्थित जमू लागले होते आणि पप्पांच्या धंद्यातील समजही होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीने माझी उपयुक्तता जास्त होती.  माझ्या ...

कविता- हमेशा की तरह.......

हमेशा की तरह, इस बार भी टकराव हो रही है, मेरे दिल और दिमाग में....... ......"आज़ से पहले, जब भी कभी ऐसा हूआ है... वक्त ने ये साबित किय है ये मेरे जिंदगी का एक सुहाना दौर है"..! दिल और दिमाग दोनों मेरे दोस्त हैं दिमाग मेरी रोजी-रोटी चलाता है दिल मुझे जिंदादिली सिखाता है.......... लेकिन हर बार की तरह इस बार भी मैं दिल ही का सुनूंगा मेरी जिंदगी में जो भी कुछ , अच्छी बातें ,अच्छे दोस्त आये मै सोचता हूं.... ओ नहीं आये , युंही एक हादसा बनके.... लेकिन।  ओ आये एक करीष्मा बनके.......  ओ आये एक "अनजाना"  एक "अनकहा " पैगाम लेके  ओ आये दिल की एक अहमियत बनके..... दिमाग को ये सारी बातें कतई बर्दाश्त नहीं होती लेकिन मेरे दिल ने कहा ...... अच्छे लोग, अच्छे दोस्त आजकल मिलते कहां है नसीब से अगर मिलते हैं तो हर किमत पर,  उन्हें दिल में पिरोये रखें.... जिंदगी की इबादत बनाकर.... दोस्तों मुझे मालूम नहीं , मेरे दिल का कहना सच है या नहीं.... लेकिन हमेशा की तरह इस बार भी मैं दिल  का ही सुनूंगा........

*शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे?

*शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे? पालक शाळा निवडतांना, “बोर्ड कुठले आहे”? हा हमखास प्रश्न विचारतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नर्सरीमध्ये प्रवेश घेतांना तुमची अमुक अमुक बार्डची शाळा आहे का? नर्सरी पासुनच बोर्डचा अभ्यासक्रम शिकवतात ना..? टिचर्स सुध्दा त्या अमुक अमुक बोर्ड मधुनच पास झाले ना?.. या अण् या संदर्भात असंख्य प्रश्न पालक विचारत असतात. खरं तर त्याचां काही दोष नाही, शिक्षणपध्दतीने समाजात खुप गैरसमज निर्माण केले आहे त्यामुळे हे पालक संभ्रम अवस्थेत असतात. *अनेक बोर्ड आणि त्याचा संबंध शैक्षणिक यशस्वीतेशी लावून अनेक गैरसमज निर्माण झाले.* खरंतर बोर्ड लागते आठवीपासून पुढे. कुठलेही बोर्ड फक्त दहावी आणि बारावीची परिक्षा घेत असते. बोर्डचे काम फक्त परीक्षा आयोजीत करणे असते. *कुठलेही बोर्ड पाल्याला हुषार करीत नाही. शाळा त्या विद्यार्थ्यावर काय मेहनत घेते. त्यावर त्या मुलाचा/मुलीची शैक्षणिक गुणवत्ता अवलंबुन असते.* सध्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांना विविध बोर्डचे पर्याय उपलब्ध आहेत. State बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड, Cambridge बोर्ड, IB बोर्ड, असे विविध बोर्ड उपलब्ध आहेत. *खरंच...

Higher Education in India - Challenges, Opportunities and New Directives.

Higher Education in India - Challenges, Opportunities and New Directives.                                                                   ©K.Rahul                                                           Introduction: Higher education is the Heart of qualitative and quantitative India. It is the core part of very Country, whether it is Developed, Developing or Underdeveloped country. Even the countries which are developed like U.S.A., U.K. Japan, France, Canada etc. are on the top of mountain of success in all fields, because of quality education to all sections of society without any bias.   Developing countries like China and India are in the way of Developm...