Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

कविता - बलात्कार

कविता - बलात्कार आता रोज निघेल कुठे ना कुठे मोर्चा, आणि झडत राहतील चर्चा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, तुला ओरबडून जिवंत जाळल्याच्या. सो कॉल्ड उच्चभ्रू  काढतील कॅडल मार्च, येतील वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आणि दिले जातील मीडिया बाईट, तुझ्या देहावर झालेल्या अत्याचाराच्या वर्णनांनी भरून जातील वृत्तपत्रांची पाने. चौका चौकात होईल रोष व्यक्त गुन्हेगारांचे पुतळे जाळून, म्हणतील सगळे त्यांना तात्काळ फासावर चढवा किंवा मरेपर्यत बडवा. दिल्या जातील मुलाखती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या, म्हणेल कुणी त्या पुरुषांचे लिंग छाटून टाका, त्यांनाही जाळा जिवंत भर चौकात. परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा राजकारणी घेतील दखल आणि करतील नराधमांना अटक, पहिल्याच तारखेला मिळेल त्यांना जामीन, चालू होतील कोर्ट कचेऱ्या आणि पडत राहतील तारखा, सामान्यांना विस्मरण होईपर्यंत. हळू हळू पहिल्या पानावरची बातमी शेवटच्या पानावर जाऊन विरून जाईल. थकून जातील  तुझ्या घरचे न्यायाची प्रतिक्षा करून, कदाचित न्याय मिळण्याअगोदर जातील मरून. एवढे करूनही त्यांना मरेपर्यत फाशीची शिक्षा होईल की नाही सांगता येत नाही, ...

कविता - मैत्रीचे राजकारण

कविता - मैत्रीचे राजकारण एकदा ते दोघे शांतपणे बोलत होते, एकमेकांचे विचार अधूनमधून कोलत होते. एकाने दुसऱ्यावर जहरी टीका केली, दुसरा कसा चुकतोय हे सांगताना अहमहमिका केली. पहिला म्हणाला, वाईट वाटून घेऊ नको, मी दोष तुला देत नाही, रोष तुझा घेत नाही. पण माझीही मतं आहेत काही, जाब विचारायची तु करू नका घाई. मग दुसरा म्हणाला, मनात माझ्या काही नसताना, तुला मात्र जिथे तिथे जात दिसते. इथेच तर तुझे गणित फसते. पहिला म्हणाला, तुझ्या बाजूने कदाचित तु बरोबर असशील, पण माझ्या बाजूने मी सुद्धा चुकीचा नाही. अधून मधून तुझ्या वागण्यात जात डोकावत असते, जातीच्या जोरावरच तर तुझी डाळ शिजते. वागत नसशील जातीने, पण राजकारणात मात्र जाती धरतोस. संधी मिळेल तेव्हा माझा पाणउतारा करतोस. दुसरा म्हणाला, मान्य मला मी जातीचे राजकारण करतो, पण त्याचा मैत्रीशी संबंध काय? पहिला म्हणाला, हेच तर तुझे ढोंग आहे, जाणून बुजून अजाणतेपणाचे सोंग आहे. मैत्री सुद्धा एक राजकारण असते, माझे सारखे कुणी तरी कधी तरी त्याला फसते. जातीने वागण्यासाठी जातीचा उच्चार गरजेचा नसतो, राजकारण हा विषयच मुळी बेरजेचा असतो...

कविता : ते आणि मी

कविता : ते आणि मी सच्या, संदया, सूऱ्या, अम्या, मन्या, मंदया अन् मी, लहान होतो तेव्हा सारखे एकत्रच रहायचो, गोळ्यामेळ्याने सगळे शाळेला जायचो. लघवीच्या सुट्टीत शर्यत आम्ही लावायचो, कोणाची धार लांब जाते, पैज लावून पाहायचो. जेवणाच्या सुट्टीत राऊंड करून बसायचो, एकमेकांच्या डब्यातल्या भाज्या वाटून खायचो. माझे घर सगळ्यात जवळ म्हणून पाणी प्यायला यायचो. पी. टी. च्या तासाला एका-आड-एक उभे राहायचो, सरांना फसवून एकाच टीममध्ये यायचो. खेळताना आम्ही खूप खूप चिडायचो, पायात पाय घालून प्रतिस्पर्ध्याला पडायचो. बाईंना कुणी सांगितलं तर बुकलून त्याला काढायचो. परीक्षेला शाळेमध्ये एकमेकांना दाखवायचो, हुशार पोराने दाखवावे म्हणून त्याला धरून वाकवायचो. एक दिवस हे सगळं बंद झालं, सप्त ताऱ्यांचं तेज अचानक मंद झालं. अलगद त्यांनी मला बाजूला टाकलं, कळेना मला माझं काय चुकलं. उमजेना मला दोष माझा आहे की मातीचा आहे, नंतर कळलं मला, मी खालच्या जातीचा आहे. ©के.राहुल ९०९६२४२४५२.

कविता - नेहरू-पटेल भेट

एकदा मला स्वप्नामध्ये नेहरू-पटेल दिसले, एकमेकांना पाहून क्षणभर थोडे हसले, आनंदाने मिठी मारून मग निवांत झाडाखाली बसले. सरदारजी भेटत नाहीत आजकाल, खरंच माझ्यावर रुसलात काय? गैरसमज नको पंडीतजी, दीड दमडीच्या लोकांना तूम्ही सुद्धा फसलात काय? कधी न घडलेल्या गोष्टी मनाला लावून बसलात, जिवंत असतो आता तर यांची लावली असती वासलात. तुमच्या माझ्या वादाची हल्ली असते गरमागरम चर्चा. मी तुमच्याशी कसा वाईट वागलो यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यत मोर्चा. म्हणूनच सरदारजी सांगा मला, मी कधी चुकीचा वागलोय? खरं सांगतो दिल्या वचनाला शेवटपर्यंत जागलोय! तुम्हांला कमीपणा यावा असं माझ्या हातून काही घडलंय का? निर्णय घेताना कधी तुम्हांला मी तोंडघशी पाडलंय का? पंडितजी, देश चालवताना असलं कधी मनावर घ्यायचं नसतं. बैचेन होईल मन त्या वाटेनं जायचं नसतं, आपलं राजकारण होतं विकासाचं आणि समतेचं. देशाबद्दलच्या माया आणि ममतेचं! आपल्यासमोर आव्हान होतं देश उभा करण्याचं, जात धर्म विसरून देशासाठी मरण्याचं. तुच्छ यांच्या राजकारणात कित्येक गांधी मरतील, नथुरामच्या पिलावळी अश्याच देशभक्त ठरतील. आपली पाटी कोरी असली की मा...

मेंदूशी मैत्री- डॉ श्रुती पानसे यांची सदरे

================ 🧠 *मेंदूशी मैत्री* 🧠        (दै.लोकसत्ता)     *लेखांक- १२०*     *दिनांक- १९ जून १९* 🎯 *तरुण समाज* ‘मला पासष्टाव्या वर्षी नवी भाषा शिकायची आहे.’ ‘मला कम्प्युटरवर काम करणं जमायला हवं.’ ‘लांबच्या सहलीला जायचं आहे.’ ‘नवीन पद्धतीचे पदार्थ करून बघायचे आहेत’ असे अत्यंत सकारात्मक विचार कित्येकांच्या मनात येत असतात. ही चांगली गोष्ट आहे. ज्या वेळेस आपली खरी आवड सापडते, तेव्हा आतमध्ये ऊर्जा निर्माण झालेली असते. कधीच कशातून मिळणार नाही असा आनंद आपल्याला जे आवडतं ते करण्यात मिळतो. या आवडीच्या कामात कितीही वेळ गेला, कितीही कष्ट पडले तरी चालतं. अशा पद्धतीने मूलभूत स्वरूपाचं काम हातून  घडण्याची शक्यता असते. पूर्वीच्या काळी ‘आता माझं काय राहिलंय आता’ असा अत्यंत निराश विचार करण्याचं एक वय असायचं. मात्र आज तेच वय नवं काहीतरी शिकू बघतंय, ही आपला समाज तरुण झालाय याची खूण आहे.अशाच प्रकारे, आपल्या स्वत:ला नक्की काय आवडतं याचा शोध सगळी प्रौढ माणसं घेतात का? वास्तविक, आपल्या आत नक्की कसली ‘पॅशन’ आहे हे प्रत्येकाने शोधायला हवं. पण सगळी ...