Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

रुपया झाला मोठ्ठा...!

 रुपया झाला मोठ्ठा.....! गेल्यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एके ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो. माझ्या अगोदर एक वक्ते बोलणार होते. त्यांचा विषय होता, "बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय न्यायव्यवस्था". विषय मांडत असताना माझ्या आजपर्यत न वाचनात आलेले एक वाक्य त्यांनी सांगितले. त्यांच्यामते न्यायव्यवस्थेबद्दल मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात की, " न्यायव्यवस्था भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी तिथे न्यायदानाचे काम करणारे न्यायाधीश ही माणसेच असून ते सरकारचे पगारी नोकर आहेत त्यामुळे त्यांचा कल हा सरकारच्या बाजूने राहण्याची शक्यता जास्त आहे. कारण नोकराने मालकाच्या बाजूने राहणे हे त्याची गरज असू शकते. इथे न्यायव्यवस्थेचा मालक म्हणजे कोण हे वेगळे सांगणे नको. त्यामुळे केंद्रातील सत्तेत असेलेले सरकार  लोकशाही मूल्यांची बूज राखणारे नसेल किंवा पक्षपाती असेल तर न्यायव्यवस्थेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो आणि न्यायव्यवस्था चुकीचे निर्णय देऊ शकते. त्यातून लोकशाही मूल्यांचा संकोच होण्याची शक्यता वाढते. म्हणून देशातील जनतेने आणि लोकशाही मूल्यांची बूज असणाऱ्यांनी सत...

कविता: स्वप्नातला मोर

स्वप्नामध्ये काल मी झालो होतो मोर, थुई थुई नाचत त्यांच्या अंगणात धरला होता फेर. कसा काय आलास म्हणत, आपुलकीने ते भेटले. रोजी रोटीचा प्रश्न आहे, म्हणालो आधार सारे तुटले. कुटुंब आले रस्त्यावर, आभाळ  चहुबाजूंनी फाटले. हळहळत त्यांनी मग मुठीतले थोडे काजू बदाम टाकले, खाऊन घे म्हणत मला, ते झोपळ्यावर टेकले. करतील काही उपाय म्हणून आशेने मी पाहिले. मदत राहिली बाजूला, काहीक्षण रागाने त्यांनी पाहिले. मागू नको काही म्हणालेे, जागतिक मंदीने धन सारं आटलंय, मी तरी काय करू, शत्रूच्या आक्रमणाने आभाळ  सारं फाटलंय. निवारा राहू द्या बाजूला, निदान रोजगार तरी द्या. देश आपला फकिरांचा, म्हणाले तूू थेट हिमालयात जा. लेकरं बाळं उपाशी, भुकेने खूप व्याकुळ झालेत, ते म्हणाले, सीमेवर बघ  किती दहशतवादी आलेत! मिळेल तेवढे तरी घ्यावे म्हणून, एक एक दाणा टिपत जवळ त्यांच्या गेलो, अंगावरून हात फिरवता क्षणात त्यांचा झालो. नकळत त्यांचा मला लागला असा लळा, पिसे काढली सगळी तरी लागल्या नाही कळा. वेदना दाबत मनामध्ये मी सहन केले सारे, पाठीवरून हात फिरवत म्हणाले, फुकट कुणाला काही मी देत नाही आता तरी क...

तरडेंच्या निमित्ताने................!

तरडेंच्या निमित्ताने.............. ©के.राहुल, ९०९६२४२४५२ https://bit.ly/3gwSMio स्पेनमध्ये जॉर्ज संतांन्या नावाचा  सुप्रसिद्ध  विचारवंत, कवी, कादंबरीकार आणि तत्वज्ञ होऊन गेला. त्याने सन १९०५-०६ मध्ये "द लाईफ ऑफ रिझन" हा मानवी प्रगतीचे टप्पे दर्शविणारा निबंध लिहिला. यामध्ये मानवी विकास आणि बौद्धिक  प्रगतीबाबत आपले विश्लेषण मांडताना जॉर्ज म्हणतो की, "ज्या माणसाला (समाजाला) आपला इतिहास माहीत नसतो तो माणूस (समाज) वर्तमानात आपल्या भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती करत राहतो. त्यामुळे त्यांचे  वर्तमान दिशाहीन आणि भविष्य नेहमीच अंधकारमय असते".  आपल्या दुर्दैवाने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणारे इतिहासातील सगळेच विचारवंत भारताबाहेर जन्माला आल्याने आणि जे जे भारतात जन्मले त्यांचे तत्वज्ञान जाती आणि धर्मात बंदीस्त झाल्याने आपला इतिहास स्वतः वाचून समजून घ्यायचा असतो हेच आपली माणसे विसरून गेलीत की काय? असा प्रश्न निर्माण होतो. साहजिकच इतिहासातील चुकांची पुनरावृत्ती करू पाहणाऱ्या चुका झाल्या की चांगल्या चांगल्या जाणत्या आणि समजूतदार लोकांकडून  "होता है।", "चलता है।...

भारतावरील राज्यकर्ते

1=1193 मुहम्मद ग़ौरी 2=1206 क़ुतुबुद्दीन ऐबक  3=1210 आराम शाह 4=1211 इल्तुमिश 5=1236 रुकनुद्दीन फ़िरोज़ शाह 6=1236 रज़िया सुल्ताना 7=1240 मुईज़ुद्दीन बहराम शाह 8=1242 अल्लाउदीन मसूद शाह 9=1246 नासिरुद्दीन महमूद  10=1266 ग़यासुदीन बल्बन 11=1286 कै ख़ुसरो 12=1287 मुइज़ुद्दिन कैकुबाद 13=1290 शमसुद्दीन कैमुर्स 1290 ग़ुलाम वंश समाप्त् (शासन काल-97 वर्ष लगभग ) ● खिलजी वंश 1=1290 जलालुदद्दीन फ़िरोज़ ख़िलजी  2=1296 अल्लाउदीन ख़िलजी  3=1316 शहाबुद्दीन उमर शाह 4=1316 कुतुबुद्दीन मुबारक शाह 5=1320 नासिरुदीन ख़ुसरो शाह 6=1320 ख़िलजी वंश स्माप्त (शासन काल-30 वर्ष लगभग ) ● तुगलक वंश 1=1320 ग़यासुद्दीन तुग़लक प्रथम  2=1325 मुहम्मद बिन तुग़लक द्वितीय 3=1351 फ़िरोज़ शाह तुग़लक  4=1388 ग़यासुद्दीन तुग़लक द्वितीय 5=1389 अबु बकर शाह 6=1389 मुहम्मद तुग़लक तृतीय 7=1394 सिकंदर शाह प्रथम 8=1394 नासिरुदीन शाह सानी 9=1395 नुसरत शाह 10=1399 नासिरुदीन महमूद शाह सानी (दुबारा सता पर) 11=1413 दोलतशाह 1414 तुग़लक वंश समाप्त (शासन काल-94 वर्ष लगभग ) ● सैय्यद वंश 1=1414 ख़िज्र ख़ान 2=1421 मुइज़ुद्दिन मुबारक शाह सानी 3=...

कविता- काय करावे?

काय करावे? भिजत घातलेली घोंगडी, पिळून वाळत एकदाची घालावीत. फडताळातील बोचक्यात कोंबलेली, पुस्तके पुन्हा एकदा चाळावीत. विस्कटलेल्या नात्यांची, पुरचुंडी पुन्हा बांधावी. पाडून टाकाव्यात भिंती साऱ्या, वीण तुटलेली सांधावी. आवडले कोणी मनाला, तर खुशाल तिच्यावर भाळावं, आलाच पुढून होकार तर, केसात तिच्या फुल एखादं माळावं. बोललं कुणी मनापासून, तर मनमोकळं बोलावं. अहंकाराची किनार ज्याला, ते नातं पुन्हा पुन्हा तोलावं. वागलं कोणी वाईट म्हणून, जाब विचारत बसू नये. नकळत कोणी चुकलं तर, उगी त्याच्यावर रुसू नये. वर वर कोणी  बोलेल गोड, आपण त्याला फसू नये. जिथं आपली किंमत शून्य, घरात त्या घुसू नये. हेही करू नये, तेही करू नये. पश्न पडतो मनाला, मग करावे तरी काय? आपल्याच मनाशी, आपणच साधावा संवाद. आणि निघावे स्वतःच्याच शोधात स्वतः, मिटवून सगळे वाद. © के. राहुल 9096242452.

Listening process

Listening process: 1. Receiving:     It is the process of receiving sound waves through  sencory receptors of ears of the listeners. It is a physical response to sound waves. Listener must hear to listen, so that listener can proceed to understand the message delivered by speaker or sender of the message. 2. Understanding:      The process of analyzing the meaning of message listener has heard is called Understanding. It is not only understand words but sounds like laughs, applause also. Understanding includes intended meaning of message conveyed by sender. 3. Recalling:      Recalling is another important element of listening process. It is nothing but remembering message conveyed, for evaluation and feedback.  Being a human being listener can listen whole message but whole message can not be stored and memorize in our memory. So, most of the listener listen in pieces and drop out the part that feels them unimportant. So, ...