Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

कविता

पानांमागून पाने उलटत, बघता बघता वर्ष सरले. सुखदुःखाचा खेळ जीवन, कुणी जिंकले, कुणी हरले. क्षण सुखाचे मनात साठवून, निरोप देऊन दुःखाला. स्वप्नांची मशाल पेटवून. नववर्षाच्या स्वागताला. ©के.राहुल, ९०९६२४२४५२

डेस्मंड टुटू - मानवी हक्क आणि समतेच्या आकाशातील तारा

_आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीचे अध्वर्यू डेस्मंड टुटू यांचे नुकतेच निधन झाले_ त्यांच्या वाटचालीला सुरुवात झाली तीच मुळात दक्षिण आफ्रिकेतील मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते म्हणून. मानवी हक्कांची चळवळ चालविताना त्यांचा ज्या ज्या लोकांशी संपर्क आणि संबंध आला ते सगळे त्यांचे मित्र, शिष्य आणि चाहते झाले. यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक, पुरुष, स्त्रिया व श्वेतवर्णीय अशा सर्वांचाच समावेश होता. स्वतः कृष्णवर्णीय असूनही त्यांच्या आजूबाजूला श्वेतवर्णीय लोकही होते, हे त्यांचे आणखी एक वेगळेपण! वर्णभेदाच्या वणव्यात संपूर्ण आफ्रिका खंड होरपळून निघत असताना डेस्मंड टुटू यांनी तेथील कृष्णवर्णीय जनतेच्या जखमांवर हळुवार फुंकर तर घातलीच; पण त्या जास्त चिघळू नयेत यासाठी अविरत प्रयत्न केले. *- के. राहुल* *https://kartavyasadhana.in/view-article/k-rahul-on-desmond-tutu* डेस्मंड टुटू - मानवी हक्क आणि समतेच्या आकाशातील तारा "एखाद्यावर अन्याय होत असतांनाही जर तुम्ही शांतपणे पहात असाल तर तुम्ही अन्यायकर्त्याच्या बाजूचे आहेत असा अर्थ निघतो. एखाद्या बलाढय हत्तीने उंदराच्या शेपटीवर पाय दिला असेल आणि तुम...

शक्तीहीन शक्ती

  शक्तीहीन शक्ती महिला आणि मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने काल विधानसभेत शक्ती कायदा पारित केला. आंध्र प्रदेश सरकारने गेल्यावर्षी पास केलेल्या दिशा कायदा,२०२० च्या प्रारूपावरून हा कायदा महाराष्ट्र सरकारने आणला असून एरव्ही ऊठसूट कोणत्याही क्षुल्लक बाबींना विरोध करणाऱ्या विरोधकांनीही सत्ताधारी पक्षाच्या सुरात सूर मिसळून एकमताने हे विधेयक संमत होऊ दिले. एखादा कायदा करताना किंवा त्याबाबतचे विधेयक पास करताना त्याच्या अनुषंगाने संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा राज्यांच्या बाबतीत विधानसभा आणि विधानपरिषद (असल्यास) सांगोपांग आणि मुद्देसुद चर्चा होणे आणि कायद्यातील तरतुदींचे भविष्यात हॊणारे सामाजिक, आर्थिक आणि काही अंशी सांस्कृतिक परिणाम याबाबत मंथन होणे अपेक्षित असते. त्यातही महाराष्ट्रासारख्या राज्यात पास होणारे अनेक कायदे हे संपूर्ण  देशाला दिशा देणारे ठरले आहेत. तेव्हा त्याअर्थानेही त्याचे महत्व अधिक आहे.  तेव्हा महाराष्ट्रासारखे राज्य असा कायदा पास करत असताना त्याबाबत जास्त सजग असणे अपेक्षित असते. म्हणून या कायद्यामुळे होणारे  चांगले वाईट...

कविता - म्हैस

 कविता - म्हैस म्हैस म्हणाली गायीला, तू सुद्धा माझ्यासारखीच  चारा खातेस, माझ्यासारखेच रोज दोन वेळेला दूध देतेस. नाही म्हणायला, आहार माझा तुझ्यापेक्षा जास्त आहे, पण दुधसुद्धा माझे तितकेच मस्त आहे. तुझ्यापेक्षा माझ्या दुधाचा फॅटसुद्धा बडा आहे, म्हणूनच माझ्या दुधाचा दर सुद्धा चढा आहे. कष्ट करण्यात सुद्धा आम्ही कुठे मागं नसतो, बैलांबरोबर नांगराला जुंपले तरी आम्हांला त्याचा राग नसतो. मग तूच माझ्यापेक्षा कशी काय श्रेष्ठ आहे? काहीही म्हण पण इथल्या माणसांची नीतीमत्ता भ्रष्ट आहे. तुझं म्हणणं पटतंय मला, पण वासराची शपथ माझ्या यात काहीच हात नाही. "गाय वेगळी, म्हैस वेगळी" अशी कोणतीच जात नाही. दोघीही आपण जंगलातल्या, माणसांच्या मागे आलो अन् माणसातल्याच झालो. "तुझ्यापेक्षा मी भारी आहे" असा काही जण दावा करतात, माणसामाणसात तेढ वाढावी म्हणून जाणूनबुजून कावा करतात. माणसांचा म्हणे प्रत्येकांचा वेगळा धर्म आहे, त्यांच्या शब्दाला जागणे हेच आपले कर्म आहे. दूध देत असतो तोपर्यंतच तो आपल्याला दावणीला बांधत असतो, वेळोवेळी बाजार दाखवून आढं घराचं सांधत असतो. कधी कधी मला वाटते, माणसांचा नाद सोडून ...

सरकारी प्रवृत्तीचे शैक्षणिक परावर्तन!

सरकारी प्रवृत्तीचे शैक्षणिक परावर्तन! सुमारे वर्षभर चालू असलेल्या यशस्वी शेतकरी आंदोलनाचा परिपाक म्हणून मोदींना आपला ताठ कणा वाकवून शेतकऱ्यांपुढे मान तुकवावी लागली आणि शेतकऱ्यांची सपशेल माफी मागून कृषी कायदे मागे घ्यावे लागले. संसदेतही तसा ठराव पास करावा लागला. नेहमीप्रमाणे सरकारने आपल्या शैलीला साजेसे वर्तन करत कोणतीही चर्चा न करता हे कायदे मागे घेतले. त्यावर विरोधी पक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त करत गोंधळही घातला. प्रसारमाध्यमांनी फक्त  याकडेच जास्त लक्ष दिल्याने या  गोंधळात एक महत्वाचा आणि संवेदनशील विषय दुर्लक्षित राहिला. तो म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सी.बी.एस.ई.च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील वादग्रस्त ठरलेल्या एक उताऱ्यावर काँग्रेस पक्षच्या हंगामी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर सी.बी.एस. ई ने प्रश्नपत्रिकेतून तो परिच्छेद वगळला असल्याची घोषणा केली.  दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी सी.बी.ई ला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविले आहे. एवढे सगळे रामायण सुरू असताना विरो...
कविता -  देशाची संसद मौन आहे. एक माणूस, जाे भाकरी थापतोय. दुसरा एक माणूस, जाे भाकरी खातोय. एक तिसरा माणूसपण आहे, जो ना कधी स्वतः भाकरी थापतो, ना कधी  स्वतः भाकरी खातो. जो फक्त त्या भाकरीशी खेळतो, माझा प्रश्न फक्त एवढाच आहे -  "हा तिसरा माणूस कोन आहे?"  या  देशाची संसद मात्र मौन आहे. मूळ कवी - सुदामा पाण्डेय 'धूमिल' अनुवाद - के. राहुल, 9096242452