Skip to main content

Posts

Showing posts from February, 2022

कविता- बुद्ध एकदा समजून घे!

 तु राम होऊ नको मला सीता होणं जमणार नाही माझ्याच्यानं अग्निपरिक्षा देणं तर होणारच नाही आणि तुझ्याविना तर सोडच तुझ्यासोबतचाही वनवास जमणार नाही लग्नात घेतलेल्या सप्तवचनातलं 'जन्मभर तुला साथ देईन'  हे वचन पाळता न आलेल्या तुला  माझ्याच्याने एकवचनी न्यायनिष्ठ म्हणणं होणारच नाही... तु लक्ष्मणही होऊ नकोस मला उर्मिला होणं जमणार नाही राजवाड्यातली सुखं टोचतील मला बंधुप्रेमाचं वचन पाळताना सप्तपदीतलं तेच सात जन्माच्या सोबतीच वचन तु ही तुझ्या भावासारखंच कोलून दिलंस विरहात जळत तुला श्रेष्ठ बंधुप्रेमी म्हणणं मला जडच जाईल.... तु बुद्धही होऊ नकोस मला यशोधरा होणं जमणार नाही दुःखाचं मुळं शोधायला घर सोडणाऱ्या तुला ते भेटणार नाही कारण तु ते माझ्या हृदयात घर सोडताक्षणी ठेऊन जाशील शांततेच्या प्रेमात असणारा तु माझ्या मनातला गोंधळ ऐकुही शकला नाहीस ज्या गोष्टींच्या शोधार्थ तु गेलास  त्याच गोष्टी माझ्याजवळ सोडून गेल्यानं त्याचं ज्ञान तुला झालं हा दावा मी खोटा पाडीन आणि सप्तपदीत तुला दिलेलं विश्वासार्हतेचं वचन माझ्याकडुन मोडलं जाईल तु तरी साथ देण्याचं कुठं पाळलंस हां,व्हायचंच असेल तर तुकाराम ह...

महामनाव लेखमाला

*लेख पहिला*  * तथागत गौतम बुद्ध* *प्रस्तावना* भारताने जगाला अनेक महान गोष्टी दिल्या आहेत, जीवनाच्या विविध बाबींवर नावीन्यपूर्ण भाष्य करणारी माणसं दिली आहेत. आखिल जगाला स्वातंत्र्य, समता अन बंधुतेचा मूलमंत्र देणारे शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे त्यात सर्वोच्च आहेत. डॉ. आ. ह. साळूंखे यांनी 'सर्वोत्तम भूमिपुत्र' या शब्दांत त्यांचे वर्णन केलेले आहे. प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद पाटील स्वातंत्र, समता अन बंधुतेचा अग्निस्त्रोत असा बुद्धांचा उलेख करतात. तथागतांच्या आसपासही जाणारे व्यक्तित्व आजवर भारतानेच नाही तर जगाने जन्माला घातलेले नाही असे आचार्य रजनीश म्हणतात. तर गौतम बुद्धांच्या हृदयाचा एक अंशही मला मिळाला तर मी स्वत:ला धन्य समजेन असे महाकरुणिक बुद्धांच्या महतीचे वर्णन स्वामी विवेकानंद करतात. महामानव हे कुठून आकाशातून कोसळत नसतात किंवा जन्मत:च महामानव म्हणून प्रकट होत नसतात. त्यांच्या महामानव होण्याला तत्कालिन सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संघर्षाची पार्श्वभूमी असते. या संघर्षाचे त्यांच्या जानीवांनी केलेले आकलन, या संघर्षात त्यांनी मानवतेच्या बाजूने पार पाडलेली भूमिका अ...

कविता - एकदा प्रेम करून बघ!

  कविता - एकदा प्रेम करून बघ! शिरो वापरला तर मुडदे पाडाल,  जीन्स घातली तर मुडदे पाडाल, बुरखा घातला म्हणून मुडदे पाडाल, पाय उघडे ठेवले म्हणून मुडदे पाडाल, पदर पडला म्हणून मुडदे पाडाल, बोलले म्हणून मुडदे पाडाल, बोलले नाही म्हणून मुडदे पाडाल, हसले म्हणून मुडदे पाडाल, मोबाईल जवळ बाळगला म्हणून मुडदे पाडाल, प्रेम केले म्हणून मुडदे पाडाल, नोकरी करते म्हणून मुडदे पाडाल, घरीच असते म्हणून मुडदे पाडाल, या ना त्या कारणाने मुडदे पाडाल, धर्माच्या नावाखाली मुडदे पाडाल, अधर्म झाला म्हणून मुडदे पाडाल, तुम्ही आमचे मुडदे पाडनारच, कितीही झाकलं तरी आणि नाही झाकलं तरी, आमचं अस्तित्व आहे म्हणूनच तर मुडदे पाडाल, पण आमच्या जन्माच्या अगोदरही आमचे मुडदे पाडाल, पण सत्य मात्र हेच आहे की- तुम्ही आमच्या शिरोला घाबरता, आमच्या जीन्सलाही घाबरता, आमच्या पदर पडण्याला ही घाबरता, आमच्या बुरख्यालाही घाबरता, आम्ही शांत असलो तरी तुम्ही घाबरता आणि आम्ही बोललो तरीही, आम्ही शिकतोय म्हणून तुम्हांला धडकी भरते आणि नाही शिकलो तरीही, तुम्हांला आमच्या नोकरीचीही भीती वाटते आणि घरी असण्याचीही, आमच्या विरुद्ध बोलणाऱ्यांनो तुमच्य...

संविधानाच्या मार्गानेच जावे लागेल!

  संविधानाच्या मार्गानेच जावे लागेल! 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत स्वतंत्र झाला याला 75 वर्षे पूर्ण होतील. म्हणजेच हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे हिरकमहोत्सवी वर्ष आहे.  एका अर्थाने भारतीय समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था,  राजकीय व्यवस्थेच्या आणि प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्थेच्या प्रगल्भतेचा हा सर्वोच्च बिंदू ठरायला हवा. जगातील अनेक लोकशाही व्यवस्था विशेषतः युरोप आणि पश्चिमात्य देशातील अर्थव्यवस्था एवढयाच कालावधीत प्रगल्भावस्थेत जाऊन स्थिरावल्या त्या आजतागायत कायम असून त्यांनी विकासाच्या वाटेवर कायम राहताना लोकशाही मूल्ये फक्त जपलीच नाहीत तर संपूर्ण व्यवस्थाच समाजकेंद्रित करून ती येत्या काळात अधिकाधिक लोकाभिमुख कशी राहील यासाठी भरीव प्रयत्न केले आणि ते लोकांच्या सहकार्याने फलद्रूपही झाले.  भारताच्या बाबतीत मात्र भारतीय लोकशाहीव्यवस्था देशात टिकून असली तरी 75 वर्षानंतरही म्हणावी तितकी प्रगल्भ झाल्यासारखी वाटत नाहीत. गेल्या 7-8 वर्षात तर भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा पायाच डळमळीत झाला आहे की काय? अशी शंका आणि भीती वारंवार मनात निर्माण होते. अर्थात त्याला कारणीभूत असलेल्या अनेक घटका...

भारताची फाळणी सात वेळा

 भारताची फाळणी कधी झाली? *तुमच्यापैकी किती जणांना भारताच्या विभाजनाबद्दल माहिती आहे?* भारताची फाळणी किती वेळा झाली? *ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा*.  1) *अफगाणिस्तान* 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.  2) 1904 मध्ये *नेपाळ*  3) 1906 मध्ये *भूतान*  4) 1907 मध्ये *तिबेट*  5) 1935 मध्ये *श्रीलंका*  6) *म्यानमार* (बर्मा) 1937 मध्ये.  आणि ...  7) 1947 मध्ये *पाकिस्तान*  *अखंड भारताची फाळणी:* पुर्वी अखंड भारत *हिमालया पासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.*  1857 मधे भारताचे क्षेत्रफळ *83 लाख* चौरस किलोमीटर होते आणी सध्या *33 लाख* चौरस किमी आहे.  वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले. पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:  1) 1876 मध्ये अफगाणिस्तान,  2) 1904 मध्ये नेपाळ,  3) 1906 मध्ये भूतान,  4) 1907 मध्ये तिबेट,  5) 1935 मध्ये श्रीलंका,  6) 1937 मध्ये म्यानमार आणि  7) 1947 मध्ये पाकिस्तान.   *श्रीलंका*:  ब...

कविता- आतला तू!

  कविता:  आतला तू! तू कितीही गायला समतेची गाणी, तरी भेद तुझ्या मनातला लपणार नाही. ठाऊक आहे मला, खालच्या पायरीवरचे कुणी 'आपला' म्हणलेले तुला खपणार नाही. हातचे राखून तू कोणासाठीही पळत असतोस, झाले कोणाचे जर आपसूकच भले, तरी तू आतल्या आत जळत असतोस. तू किती मनापासून बोलतोय, सर्व काही कळत असते. निर्वाणीच्या क्षणी तुझे मन जातीच्या गावा वळत असते. नुसत्या बाता मारून कधी समता येणार नाही, दिखावा करून खोटा; समतेच्या गावी कधी रमता येणार नाही.  वरवरचे बोलून असे फक्त भोळेभाबडे फसतील, तुझ्या जातीचे आमच्यावर कुत्सितपणे हसतील . जातीवाद्यांच्या कित्येक पिढ्या तुझ्याच मार्गाने घडतात. थोर समाजसेवक म्हणून अनेक पुरस्कार पदरी पडतात. म्हणूनच तुझ्यासारख्या पुरोगाम्यांसमोर कित्येक मुडदे पडतात. समतेच्या गप्पांचे तुझे गुऱ्हाळ सत्तेला तुझ्या तारक असते, समतेचे तुझे हे राजकारण माझ्यासारख्याला  मारक असते. ©के.राहुल, ९०९६२४२४५२.