Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

Rape and Rahypnol

A woman was taken by 5 men, who according to  hospital and police report was raped by a gang before being dumped at a bus station! Though she was unable to remember the events of the previous evening, tests conducted revealed that she had been raped repeatedly. There was a trace of *Rohypnol* in her blood. *Rohypnol*, is presently being used as a rape drug. It is actually  a small sterilization pill which is now being used by rapists to drug their targets at parties. The drug makes the mind of the target (would be victim) go blank so that she does not remember anything that transpired and worse still, the drug sterilizes the victim so that she doesn't conceive from the rape and the rapist need not worry about having his identity revealed later by a paternity test. The real bad news is that the drug's side effects ARE NOT TEMPORARY, they are PERMANENT. बलात्कार आणि रोहायपॉलिन: गेल्या आठवडयात मुंबईतील एका बस स्टँडजवळ एक ...

डीफौल्ट मोड vs डीफ्यूज मोड

*डिफॉल्ट मोड म्हणजे काय?*  (अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येकाने वाचा!) डॉ. यश वेलणकर *तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??*🤔🤔 तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!! *आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे..!!* कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!! डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मे...

religious fundamentalism and brain damage

Scientists have established a link between religious fundamentalism and brain damage https://www.rawstory.com/2019/04/scientists-established-link-religious-fundamentalism-brain-damage/ Scientists have established a link between religious fundamentalism and brain damage A study published in the journal Neuropsychologia has shown that religious fundamentalism is, in part, the result of a functional impairment in a brain region known as the prefrontal cortex. The findings suggest that damage to particular areas of the prefrontal cortex indirectly promotes religious fundamentalism by diminishing cognitive flexibility and openness—a psychology term that describes a personality trait which involves dimensions like curiosity, creativity, and open-mindedness. Religious beliefs can be thought of as socially transmitted mental representations that consist of supernatural events and entities assumed to be real. Religious beliefs differ from empirical beliefs, which are based on how the wo...

Nelson Mandela,* former President, Republic of South Africa

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर  मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहका-यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली.  काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली. जेवत असताना त्याचे हात सतत थरथरत होते. तरीही त्याने पटापट जेवण केले आणि आमचे जेवण संपायच्या आत तो तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर माझा सहकारी मला म्हणाला, "तुम्ही पाहिलंत का त्याला? तो बराच आजारी वाटत होता. त्याच्या हातापायात मुळीच त्राण नव्हते. जेवताना त्याचे हात सतत थरथरत होते." मी म्हणालो, "नाही ते तसे नाही. आंदोलन काळात मी जेव्हा तुरुंगात ह...

कविता-आपलेच दात आणि आपलेच ओठ

आपलेच दात आणि आपलेच ओठ! काल अचानक दातांनी जीभ माझी चावली. ओठांची खालची पातीही मग नकळत दाताखाली घावली. जाब विचारता दाताला, म्हणला नकळत सारे घडले. घडले तर घडू दे, त्यावाचून का तुझे घोडे कोठे आडले? मी म्हणालो, घोडे नसेल अडले तरी कळ मेंदूला अन् वेदना झाल्या मनाला. दात म्हणाला, गुन्हा झाला असे वाटते तर शिक्षा कर मला. मग मी म्हणालो, गुन्हा जरी गंभीर असला तरी ओठांइतकाच तुही आहेस जवळचा. शिक्षा केली तुला तर घास चावायचा -हायचा, पोटदुखी तर वाढेलच पण अब्रूचाही पंचनामा व्हायचा. दात म्हणाला, मग विसरून तरी जा सगळं आणि मोकळ्या मनानं माफ कर. लावून थोडं ग्लिसरिन जखम जरा साफ कर. मी म्हणालो, ग्लिसरीन लावता ओठाला डोळ्या येते पाणी, घास फिरतो तोंडात आणि मुकी होते वाणी. मग दात म्हणाला, धरावे किंवा मारावे, एक काहीतरी करावे. घेऊन एकदाचा निर्णय पटकन मोकळं व्हावे. मी म्हणालो, निर्णय एवढे सोपे नसतात, दात आणि ओठ दोन्ही जेव्हा आपले असतात. ©के.राहुल 9096242452

कविता- असे का होते कधी कधी?

असे का होते कधी कधी? असे का होते कधी कधी? अचानक भंगतात प्रतिमा मनाला भावलेल्या. आणि सूरु होतो प्रवास अस्वस्थतेचा, अस्वस्थतेकडून पुन्हा अस्वस्थतेकडे. असे का होते कधी कधी? मेंदू समजावत राहतो पण मन मानत नाही. चुकू शकतो कुणीही, मन मात्र जाणत नाही. असे का होते कधी कधी? अवधानाने का होईना, होतात चुका. शब्द होतात मुके आणि भाव ठरतो फुका. असे का होते कधी कधी? आपलेच दात आपलीच जीभ चावतात. गोड बोलणारी माणसे नकळत अंगावर धावतात. असे का होते कधी कधी? जिवाभावाची माणसे अचानक परकी वाटतात. शब्द गोठू लागतात आणि आठवणींचे बांध फुटतात. असे का होते कधी कधी? मेंदू घेतो सावरून पण मन मात्र डाव उधळून टाकतो, निरभ्र पौर्णिमा आकाशात आणि मनात काळोख दाटतो. असे का होते कधी कधी? कळत नाही काय करावे, मोडून टाकावा आपणच की, डाव पुन्हा नव्याने मांडावा. मन हलके होण्यासाठी सडा आसवांचा सांडावा. असे का होते कधी कधी? मनसोक्त रडण्यासाठी खांदा हक्काचा मिळत नाही, जळावे की जाळावे हेच मनाला कळत नाही. असे का होते कधी कधी................ © के.राहुल ९०९६२४२४५२

भाजपचा पराभव अटळ आहे का?

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा ?       लोकसभा जरी ३६राज्यातील ५४४सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३राज्यातच तब्बल ८१% म्हणजे ४४०खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२हा जादुई आकडा देखील या १३राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्यावेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो.    आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उ.प्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) म.प्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७.    आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले होते. राहिलेल्या सात राज्यांपैकी कर्नाटक १५ व बिहार २२ अशी साधारणतः ५०% जागांची बेगमी झाली होती. खरा हात दिला तो उ.प...

पीग्मॅलिन आणि गोलेम सिद्धांत

व्यवस्थापन शास्त्रात पीग्मॅलिन आणि गोलेम सिद्धांत नावाचे दोन सिद्धांत आहेत ते व्यवस्थापन शास्त्रातील असले तर लहान मुलांच्या शिक्षणाचे व्यवस्थापन आणि संगोपन करत असताना हे दोन्ही सिद्धांत महत्वाची भूमिका बजावतात. कसे ते खालील माहितीवरून पाहूया!   *पीग्मॅलिन सिद्धांत* हा अपेक्षा सिद्धांत असून त्यानुसार जर तुम्ही एखाद्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते. उदाहरण म्हणून पहायचे तर तुमचा वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमता, जमेच्या बाजूवर विश्वास ठेवत असेल आणि तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुमचे कौतुक करून तुम्हांला काही बक्षीस देत असेल तर तुम्हांला प्रेरणा मिळून तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते. हाच सिद्धांत विद्यार्थ्यांच्या बाबतीतही लागू होतो. जर पालक आणि शिक्षक म्हणून तुम्ही तुमचा प्रत्येक विद्यार्थी किंवा मूल हुशार आणि कार्यकुशल आहे असा आशावाद व्यक्त केला तर सामान्यातील सामान्य विद्यार्थी आणि मूल काहीही शिकू शकते आणि अगोदरच्या पेक्षा अधिक चांगली कृती करू शकतो. शिक्षकांच्या आणि पालकांच्या प्रामाणिक अपेक्षा विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि क्षमतांना आकार देऊ शकतात....