Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

ग्रामीण बाजाचे मराठी शब्द

*#ग्राम्यबोली* *आपआपल्या मुलांना हा मेसेज आवश्य (कंपलसरी) वाचायला द्या व समजावून ही द्या ग्रामिण भाषेचे आणी ग्रामिण बोली भाषेचे अघाद ज्ञान आहें* *कावळे -* गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे *कावळे* . *कालवण / कोरड्यास –*  पातळ भाजी *आदण -* घट्ट भाजीचा रस्सा त्याला *आदण* म्हणत. *कढाण -* मटणाचा पातळ रस्सा त्याला *कढाण* म्हणतात. *घाटा -* हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला *घाटा* म्हणतात. *हावळा -* हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला *हावळा* म्हणतात. *कंदुरी -* पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला *कंदुरी* म्हणत. *हुरडा -* ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास *हुरडा* म्हणतात. *आगटी -* हुरडा भाजण्यासाठी जमिनीत थोडासा खड्डा खोदून त्यात शेणक...

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री सशक्तीकरण

आदरणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून स्त्री सशक्तीकरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आणि कर्तृत्व माहित नसलेला जाणकार आणि अभ्यासू माणूस देशातच काय पण परदेशातही सापडणे अत्यंत दुर्मिळ बाब असून त्यांच्या अनुयायांइतकेच त्यांचे विरोधक आणि त्यांचा तिरस्कार करणारेही त्यांनी भारतात समता आणि लोकशाही रुजविण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि योगदान नाकारणार नाहीत. परंतु राजकीय फायद्यासाठी जाणूनबुजून त्यांना जात आणि आरक्षणापुरते मर्यादित ठेवून त्यांचे कर्तृत्व झोकाळणे, एक सशक्त आणि बुद्धिमान राष्ट्रीय नेता ही त्यांची ओळख नाकारणे ही मुळातच आपली शोकांतिका आणि दुर्दैव आहे. त्यामुळे ज्यांनी बाबासाहेब वाचून समजून घेतले आहेत त्यांना घटनातज्ञ, वकील, पत्रकार, इतिहासतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, संरक्षणतज्ञ, लेखक, जल नियोजनतज्ञ, परराष्ट्र व्यवहारतज्ञ अश्या अनेक भूमिकांमधून बाबासाहेब भेटत राहतात.       असे असले तरी बाबासाहेबांचे आणखी एक वेगळेपण आपल्यासमोर येते ते म्हणजे बाबासाहेबांची समतेची आणि सामाजिक न्यायाची भूमिका! बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून, भाषणांमधून आणि तत्कालीन ब्रिटि...

कृषी अर्थव्यवस्थाच देशाला तारेल!

कृषी अर्थव्यवस्थाच देशाला तारेल! ©के.राहुल       स्वातंत्र्यपूर्व काळात अविकसित किंवा मागास देश म्हणून गणना होत असलेल्या भारताची स्वातंत्र्योत्तर काळात विकासाकडे वाटचाल होत राहिली आणि अगोदर विकसनशील राष्ट्र आणि आता जगातील एक प्रमुख प्रभावी शक्ती म्हणून भारताकडे पाहिले जात असतानाच कोरोनाच्या संकटाने भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगालाच वेढले आहे. संपूर्ण जग टाळेबंदीच्या संकटातून जात असल्याने सर्व उद्योग, व्यवहार, व्यवसाय आणि व्यापार ठप्प झाल्याने संपूर्ण जगातील भांडवलशाही व्यवस्थाच कोलमडते की काय? असे भीती जागतिक अर्थतज्ञ आणि विचारवंतांना वाटू लागली आहे. त्यामूळे ही भीती रास्त ठरली तर माणसाचे जगणे थांबू शकते आणि ते थांबवायचे नसेल तर याला काही तरी पर्याय शोधावाच लागेल आणि तो पर्याय अर्थात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला कृषिप्रधान अर्थव्यवस्था असे आपण म्हणतो.           साधारण १०० वर्षापूर्वी भारतातील ८०% समाज शेतीवर अवलंबून होता. जागतिकीकरणाच्या रेट्याचा भारतातील शेतीवर विपरीत परिणाम झाला. शेतीला दुय्यम स्थान दिल्याने आणि कृषी विकासाकडे अक्षम्य दुर...

एक रुका हुआ फैसला!

एक रुका हुआ फैसला! न्यायव्यवस्था हा भारतीय लोकशाहीच्या चार स्तंभाधील एक प्रमुख स्तंभ समजला जातो. शासन, प्रशासन आणि सामान्य जनता यांच्याकडून कळत नकळत झालेल्या चूक दुरुस्त करणे आणि त्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार कायदे करणे किंवा चुका फारच गंभीर असतील तर त्याबाबत संबंधितांना योग्य ती शिक्षा सुनविणे ही न्यायव्यवस्थेची प्रमुख जबाबदारी. असे असले तरी तिथेही काम करणारी माणसेच असतात आणि ती चुकू शकतात.  या चुकीमागे बऱ्याचवेळा पूर्वग्रह असतो आणि त्याला कारणीभूत असतात ते घटक म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग आणि आर्थिक स्तर सुद्धा. यापैकी कोणत्याही घटकांचा थेट उल्लेख न करता या सगळयावर प्रकाश टाकणारा वास्तववादी चित्रपट म्हणजे बासूदा यांचा "एक रुका हुआ फैसला".         बासू चॅटर्जी यांच्याबद्दल जाणकारांना सांगायची काहीच गरज नाही. चित्रपटाची, कथा, पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन या सगळ्या बाजू एकट्याच्या खांद्यावर समर्थपणे पेलत बासूदांनी भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरावा असा हा चित्रपट बनवला होता. रंजनीगंधा, बातो बातो मे, खट्टामिठा, चमेली की शादी आणि चितचोर ...

काॅ. शरद पाटील यांच्या महापरिनिर्वाणदिनी सदानंद मोरे सरांनी लिहिलेला लेख.

प्राच्यविद्यापंडीत काॅ. शरद पाटील यांच्या महापरिनिर्वाणदिनी सदानंद मोरे सरांनी लिहिलेला लेख. - सदानंद मोरे पारंपरिक कर्मठ कम्युनिस्ट विचारांच्या मर्यादा समजल्यामुळं कॉम्रेड शरद पाटील त्या चाकोरीतून नंतर बाहेर पडले; पण पुढं त्यांना मुळात मार्क्‍सच्याच विचारांच्या मर्यादांची जाणीव होऊ लागली. याचा अर्थ त्यांनी मार्क्‍सचा समाजवाद किंवा क्रांतीचा विचार नाकारला असा होत नाही; पण जातिप्रधान भारतीय परिस्थितीच्या आकलनासाठी मार्क्‍सचा सिद्धान्त पुरेसा नाही व त्याला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जोड द्यायची गरज आहे, या निष्कर्षांपर्यंत ते आले. त्यातून त्यांचा मार्क्‍स-फुले- आंबेडकरवाद (माफुआं) सिद्ध झाला. विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात पदार्पण करणाऱ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर प्रभाव टाकणाऱ्या तीन महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांत साधर्म्य आहे. या तीन व्यक्ती म्हणजे शरद जोशी, शरद पाटील आणि शरद पवार. या तिघांची कार्यक्षेत्रं व कार्यपद्धती वेगळ्या असल्यामुळं त्यानुसार त्यांच्या प्रसिद्धीत व लोकप्रियतेत फरक पडणार हे उघड आहे; पण तो मुद्दा वेगळा. या त...

ब्राह्मणांचे कसब भाग दोन

ब्राह्मणांचे कसब भाग दोन लेखकाचे मनोगत: भारतातील बहुजन समाजच्या गुलामगिरीची एक मोठी परंपरा आहे आणि काळ बदलला तरी ती अजूनही सुरूच आहे. काळ जसा जसा बदलत गेला तसतसे या गुलामगिरीचे स्वरूपही बदलत गेले.                  -:अर्पण पत्रिका:- ज्यांनी आपल्या देशातील समता, शिक्षण आणि बंधुत्वाचा पाया रचला आणि ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिले त्या महात्मा ज्योतिराव फुले यांना आणि ब्राह्मणांच्या कसबाचे बळी पडले त्या सर्वांना!

गॉड इज नॉट ग्रेट!*

गॉड इज नॉट ग्रेट! २१ व्या शतकात जगात जे महान लोक जन्माला आले त्यामध्ये नास्तिक विचारांची कास धरणारे विचारवंत म्हणून रिचर्ड डोकिन्स यांचे नाव सर्वात वरती असून त्यांच्यापाठोपाठ ख्रिस्तोपर हिंचेन यांचे नाव येते. त्यांनी २००७ मध्ये एक पुस्तक लिहिले आहे त्याचे नाव आहे "गॉड इज नॉट ग्रेट". या पुस्तकाचे आजच्या काळातील महत्व असे की, हिंचेन यांनी आपल्या पुस्तकात गेल्या ५००० वर्षांच्या मानवी इतिहासाचा धांडोळा घेतला असून या काळात मानवावर आलेल्या विविध आपत्तींमध्ये कोणत्याच धर्माचा कोणताही दव माणसाच्या मदतीला आला नसल्याचे सप्रमाण नमूद केलेले आहे. जगात माणसांच्या एकूण संख्येपैकी जेमतेम ५% लोक हुशार आणि बुद्धिमान असून त्यांनी नेहमीच प्रयत्नांची पराकाष्ठा करून संपूर्ण मानव जातील हरएक प्रकारच्या संकटातून बाहेर काढले आहे. उर्वरित जे ९५% लोक आहेत ते निर्बुद्ध आहेत आणि कल्पनेतील देव आणि धर्म या संकल्पनांना ते चिटकून आहेत.  जगातील सगळ्यात मोठा धर्म हा ख्रिचन धर्म असून त्यांचा त्यांनी मानलेला सर्वश्रेष्ठ धर्मगुरू पोप हा इटलीतील रोम या शहरात राहतो. पण आज पोपचे निवासस्थान असलेले व्हॅटिकन सिटी पू...

कोरोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची..............

कोरोना एक प्रलय की संधी नवनिर्माणाची..............         निसर्गाने माणसाला नेहमीच भरभरून दिले आहे. बुद्धीची नैसर्गिक देणगी लाभल्याने माणसाने नेहमीच आपल्या गरजेपेक्षा जास्त घेतले आहे. हे करत असताना त्याने कळत नकळतपणे निसर्गाला आव्हान द्यायचाही  प्रयत्न केला आहे. त्यात माणसाला बऱ्यापैकी यशही आले पण पर्यावरणाचा मात्र ऱ्हास होत गेला. बदलते ऋतुमान, साथींचे आजार, वादळे, पूर, दुष्काळ  यासारख्या संकटांतून निसर्गाने वेळोवेळी माणसाला याची जाणीवही करून दिली आहे, पण स्वार्थ डोळ्यासमोर असला की दुसरे काही दिसत नाही आणि त्यातूनच विषमताही जन्माला येते. निसर्ग स्वतः विषमतेचा पाईक असला तरी एका प्रमाणाच्या बाहेर काही घडू लागले की तो माणसाला त्याची जागा दाखवून देतो. हे वारंवार माणसाने अनुभवले आहे. पण त्यातून फार काही बोध घेतलेला नाही.        पर्यावरणाच्या ऱ्हासाबरोबरच माणसाने जाणीवपूर्वक माणसामाणसात धर्म, जात, पंथ, लिंग, वर्ण आणि गरीब-श्रीमंत अश्या भिंती उभ्या केल्या आहेत. या सगळ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे दिवसेंदिवस ढासळत गेलेले  सामाजिक, आर्...

कोरोना संसर्गानंतरचे जग

कोरोना संसर्गानंतरचे जग! संपूर्ण जगातील मानवजात सद्या संकटात सापडली असून त्यामूळे करावा लागणारा संघर्ष हा कदाचित आपल्या पिढीसमोरचा सगळ्यात मोठा संघर्ष असू शकतो. येत्या काही आठवड्यात विविध देशातील सरकारांनी आणि प्रशासकीय व्यवस्थांनी घेतलेले निर्णय येत्या काही काळात संपूर्ण जगाला एक वेगळीच दिशा देतील. यात फक्त आरोग्यसेवाच नसून देशाची अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृती याचाही समावेश असू शकतो. त्यामुळे आपल्याला माणूस म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णयांची नीट मीमांसा करून तात्काळ आणि जपून पावले टाकावी लागतील. यामध्ये आपल्याला जीवन जगण्यासाठी काहीतरी पर्याय निवडावा लागेल पण तो निवडत असताना त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील याचाही बारकाईने विचार करावा लागेल. कारण वादळे येऊन गेल्यानंतर होणारे परिणाम हे वादळाच्या परिणामांपेक्षा जास्त भयंकर असू शकतात. कोरोनाच्या संकटाचे हे वादळही क्षमणार आहे आणि त्यातून आपण सहीसलामत बाहेरही पडणार आहोत पण नंतरचे जग कदाचित फारच वेगळे असू शकते.      याकाळात घेतलेल्या अनेक अल्पकालीन निर्णयाचे आपल्याला दीर्घकालीन परिणाम भोगावे लागू शकतात. काळ वेगा...