Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

आय.आय. टी. मध्येही पाहिजे जातीचे!

आय.आय. टी. मध्येही पाहिजे जातीचे! आय.आय.टी. खरगपूर ही देशातील सर्वात प्रगत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचे गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण देणारी भारतातील सर्वात जुनी आणि केंद्रसरकारची स्वायत्त संस्था मानली जाते आणि तशी ती आहे ही. जागतिक पातळीवरील दर्जेदार शिक्षण संस्थांशी स्पर्धा करू शकेल इतपत गुणवत्ता नसली तरी आशियातील एक अत्यंत नामांकित संस्था म्हणून नावारूपास आलेली. या संस्थेत प्रवेश मिळावा म्हणून दरवर्षी रात्रंदिवस अभ्यास करून जीवाचे रान करणारी देशभरातील मुलामुलींची संख्या लाखोंच्या घरात असते. त्यातील फक्त १३४२ उच्च गुणवत्ता प्रदान मुलामुलींना आय.आय.टी. खरगपूर मध्ये प्रवेश मिळतो. त्यानंतर मग आय.आय.टी. पवई, चेन्नई, रुरकी असा उतरता क्रम लागतो. या पहिल्या पाच आय.आय.टी.तून पदवी मिळालेल्या मुलांना देशात आणि परदेशात भल्यामोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात आणि त्यांचे आयुष्यभराचे कल्याण होतो. त्यामुळे साहजिकच अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत हुशार असलेली लाखो मुले-मुली अत्यंत अवघड अशी प्रवेश परीक्षा देऊन इथे यायचे स्वप्न बघतात. १९५१ साली स्थापन झालेल्या या संस्थांना पर्याय देऊ शकतील अश्या शास...

२०२४ च्या निवडणुका आणि भाजपचे भवितव्य!

  २०२४ च्या निवडणुका आणि भाजपचे भवितव्य! कोरोना विषाणूच्या साथीने घातलेला धुमाकूळ आणि त्याला रोखण्यात आलेल्या सपशेल अपयशाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने नुकतीच सत्तेची सात वर्षे पूर्ण केली पण गेल्या दीड दोन वर्षातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अपयशाने भाजपला ते साजरे करता आले नाही. तरीही  सर्व काही सुरळीत पार पडले तर १८ व्या लोकसभेसाठीच्या सार्वत्रिक  निवडणुका ठरल्याप्रमाणे एप्रिल ते मे २०२४ दरम्यान पार पडतील. सध्याच्या भाजपप्रणीत एन.डी.ए. सरकारकडे असलेले पाशवी बहुमत लक्षात घेता सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे काहीच चमत्कार घडला नाही तर एप्रिल २०२४ पर्यंत हे सरकार  सत्तेवर राहणार हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. परंतु २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ज्याप्रमाणे दोन्ही लोकसभा निवडणुका एकतर्फी खिशात घातल्या तशी परिस्थिती २०२४ मध्ये असणार आहे का? याकडे चिकित्सक नजरेतून पहायचे झाल्यास थोडे इतिहासात डोकवावे लागणार आहे. हा इतिहास थोडा मोठा आहे पण पाहणे आवश्यक आहे. निवडणुकांना आणखी तीन वर्षे बाकी असताना आत्ता लगेच यावर भाष्य करणे काह...

बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कर्ते

 बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कर्ते: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेविरुद्ध दिलेला शास्त्रशुद्ध लढा संपूर्ण भारताला आणि जगाला ज्ञात आहे. बाबासाहेबांनी भारतात लोकशाही रुजविण्यासाठी दिलेले योगदान त्यांचे चाहतेच काय? पण त्यांचे विरोधकसुद्धा नाईलाजाने का होईना मान्य करतात. भारताला सरंजामशाही व्यवस्थेतून बाहेर काढून समता, बंधुता आणि एकात्मतेची त्रिसूत्री बहाल करताना भारतीय राज्यघटनेच्या रूपाने त्यांनी त्याला लिखित आणि कायदेशीर स्वरूप दिले. त्यामुळेच जगातील अनेक देश हुकूमशाही आणि अंतर्गत यादवीने होरपळून निघत असताना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैसर्गिक संकटे येऊनही भारत त्यातून सावरला आणि खंबीरपणे उभाही राहिला. साहजिकच स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत यातील बदलांनी जगातील अनेक विचारवंतांचे आणि तत्त्ववेत्त्यांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी लोकशाहीवर अनेक ग्रंथ लिहिले आणि नवनवीन सिद्धांतही मांडले. पण अंतिमतः त्याचा मूळ पाया हा डॉ. बाबासाहेबांनी मांडलेले विचार आणि तत्वज्ञान हेच असल्याचे त्यात दिसून येते. ...

विक्रम वेताळ कथा ५२

  विक्रम वेताळ कथा: शाळा बंद का? आज पौर्णिमा आहे हे लक्षात आल्यावर विक्रम गडबडीनेच उठला. कसेबसे आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी बोलण्याची चूक यावेळी करायची नाही अशी पक्की खूणगाठ मनाशी बांधून आज काहीही करून सिद्ध वडावरील वेताळाला पकडून स्मशानातील साधुच्या हवाली करायचेच, असा विचार करून राजा विक्रम जंगलाकडे निघाला. जंगलात आल्यावर एका झाडाला घोडा बांधून त्याने त्याला खरारा दिला आणि त्याच्या पाठीवर थाप मारून तो सिद्ध वडाच्या झाडाकडे चालू लागला.  वडाचे झाड जवळ आले की, त्याला उलटा लटकलेला वेताळ दिसला. त्याने पळत जाऊन वेताळाचे लांबलचक केस पकडायचा प्रयत्न केला पण वेताळाने विक्रमच्या डोळ्याचे पाते लावण्याच्या आत मोठी उडी घेतली आणि कमरेवर हात ठेवून दात विचकत झाडाच्या शेंड्यावर जाऊन उभा राहिला. पानांच्या गर्दीत विक्रमला वरचे काहीच दिसत नव्हते. याचा फायदा घेत वेताळ हळूच त्याच्या पाठीवर येऊन बसला आणि अचानक गंभीर झाला. नेहमीसारखे छद्मी हास्य त्याच्या चेहऱ्यावरून अचानक कसे काय गायब झाले? म्हणून विक्रमही थोडा साशंक झाला. प...

विक्रम-वेताळ कथा ५१

विक्रम वेताळ कथा: राजाचे आजारपण आज पौर्णिमा असल्याने काहीही करून सिद्ध वडावरील वेतळाला पकडून स्मशानातील साधुच्या हवाली करायचेच असा चंग बांधून राजा विक्रम जंगलातील त्या वडाच्या झाडाकडे चालू लागला. शत्रूला नेहमीच शिंगावर घेण्यासाठी सळसळणारे त्याचे क्षत्रिय रक्त त्याला वेगाने जंगलाकडे घेऊन जात होते. 'वेताळाने कितीही प्रश्न विचारले तरी उत्तरच द्यायचे नाही', असे मनाशी ठरवूनही प्रत्येक वेळी आपण त्याच्या प्रश्नाला फसतो. याचा त्याला मनोमन राग येत होता. आज मात्र काहीही झाले तरी आपण संधी वाया घालवायची नाही, असे ठरवून तो जंगलाकडे तावातावाने निघाला. त्याने सिद्ध वडाच्या झाडावर पाहिले पण नेहमी त्या वडाला उलटा लटकणारा वेताळ आज तेथे दिसत नव्हता. वेताळ आपल्याला आज घाबरलेला दिसतोय असा मनात विचार करत म्यानातून आपली  तलवार बाहेर काढत तो इकडे तिकडे त्याला शोधू लागतो. तेवढ्यात अचानक वेताळ पाठीमागून येऊन त्याच्या मानगुटीवर बसला. विक्रमाला त्याला पकडणे शक्य झाले नाही हे पाहून वेताळ आपले कुरतडलेले दात दाखवत छद्मी हसत त्याला म्हणाला "विक्रमा मला कैद करण्याचा तुझा पहिला डाव तर फसला आहे. आता मी माझा...

बिरबल कथा ५१

 बिरबल कथा: घोडचूक रविवारचा दिवस म्हणजे राजदरबाराला सुट्टी होती. सकाळी सकाळी अकबर आणि बेगमसाहिबा बदामाचा शिरा खात बसले होते. दिवस कसा घालवावा या विवंचनेत असलेल्या अकबरला अचानक एक युक्ती सुचली. त्याने एका सैनिकाला फर्मान सोडले आणि "आताच्या आत्ता दरबारात हजर व्हा!" असे सांगून बिरबलाला घेऊन ये! सैनिक निघणार तेवढयात बिरबलच महाराजांच्या महालात हजर झाला. महाराजांना मुजरा करत म्हणाला, "महाराज, आदेश द्या आपला हा सेवक हजर आहे!" बदामाच्या शिऱ्याची एक प्लेट त्याच्याकडे सरकवत अकबर म्हणाला, "बिरबला आज तुला एक कथा सांगणार आहे. त्याचे तू बरोबर आणि समर्पक उत्तर दिले नाही तर तू शिक्षेला पात्र ठरशील". महाराज मंजूर आहे. मग ऐक, 'एक आटपाटनगर असते. तेथील जनता आपल्या राजावर अजिबात खुश नसते. राजा भ्रष्टाचारी आहे, त्याला विकास करता येत नाही. त्याच्याकडे निर्णय क्षमता नाही, तो आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही. शिवाय तो दिर्घकाळ सत्तेत आहे म्हणून तो आता थकला आहे. आजूबाजूची अनेक राज्ये आपल्या पुढे निघून गेली तरी आपण मागेच आहोत, याला हा राजाच जबाबदार आहे. तेव्हा त्याला बदलला पाहिजे आ...