Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

छद्मविज्ञानाची लक्षणे

छद्मविज्ञानाची लक्षणे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने दोन वर्षांसाठीच्या ज्योतिष विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याची घोषणा केली.  आपण शालेय जीवनापासून आपल्या मुलांना पृथ्वी हा फक्त ग्रह आहे, सूर्य हा लाखो किलोमीटरवर अंतरावरील फक्त एक तारा आहे हेच शिकवत आलो आहोत आणि आता त्याच मुलांना आपण पदव्युत्तर शिक्षणात सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि तो चंद्राच्या समांतर पातळीवर असतो हे शिकवणार आहोत.  भारतातील संख्येने 1000 च्या जवळपास असलेल्या विद्यापीठांपैकी 20 विद्यापीठात ज्योतिष विषयांतील अभ्यासक्रम शिकवला जातो. बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृती भाषेशी संबंधित अनेक विभाग आहेत जेथे ज्योतिष विषय संस्कृतमधून अगोदरपासूनचशिकवला जातो. पण आताचा हा निर्णय एका वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या सामाजिक परिस्थितीत आलेला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत IGNOU सारख्या नामांकित आणि मुख्य प्रवाहातील विद्यापीठाने घेतलेला ज्योतिष विषयातील पदवीला वरदहस्त दाखविणे हे पहिलेच उदाहरण आहे.  खरेतर ज्योतिष हा विषय दोन पातळ्यांवर चर्चिला जाणे आवश्यक आहे, पहिले म्हणजे आजच्या प्रग...

कविता - पोपट

कविता - पोपट एक पोपट दुसऱ्याला म्हणाला, थांब रे तू मध्ये मध्ये बोलू नको. तुला खूप कळत असल्यासारखे, नाकाने कांदे सोलू नको. तसे पाहिले तर, मला सुद्धा काही कळत नाही. पण मी तुझ्यापेक्षा थोर आहे, आजपासून मीच राजबाबूंचा मोर आहे.  माझ्या तालावरच सगळयांनी नाचायचे, मी जे लिहून देईन तेच तुम्ही वाचायचे. उंची माझी लहान म्हणून, कुणी नाही मला टोकायचे, मी वाक म्हटले की, तुम्ही गुमान वाकायचे. तुम्हा सर्वांत मीच ज्येष्ठ आहे, कळत नसले काहीतरी मीच खरा श्रेष्ठ आहे. आलो मी दौऱ्यावर की, सगळयांनी हजर रहायचे, जमत नसेल तर सरळ सगळ्यांनी घरी जायचे. पुन्हा एकदा सांगतो, माझा नाद कुणी करू नका, फुका वाद माझ्याशी घालू नका. एकेकाकडे मी आता पाहणार आहे, इथून पुढे मी राजबाबूंच्या गोटातच राहणार आहे. ©के. राहुल, 9096242452

कविता - पुरामधील प्रेत

कविता - पुरामधील प्रेत पुरामध्ये वाहत आलेल्या प्रेताजवळ, दोघेजण बसले होते रडत. अधून मधून दोघेही होते तिच्या निर्जीव देहावर पडत. बघता बघता गोळा झाला नदीकिनारी गाव, कोण ही स्त्री? आणि कोण हे पुरुष? म्हणून चर्चा करू लागले रंक आणि राव. ही माझीच बायको म्हणून दोघे हमरीतुमरीवर आले, निवाडा होईना गावाला म्हणून प्रकरण थेट पोलिसात गेले. चांगल्या घरची दिसते बिचारी,  आया बाया कुजबुजू लागल्या, अंगावरच्या दागिन्यांकडे टक लावून पाहू लागल्या. पोलिसांनी मग सगळी सखोल चौकशी केली, थोड्या वेळातच एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली. पुरामधून मरता मरता वाचलेला एकजण रडत रडत खाली उतरला, पोलिसांचा आधार घेऊन प्रेताजवळ गेला. ही माझीच बायको म्हणून तिथेच गर्भगळीत झाला, त्याला बघून रडणारे दोघे मग हळूच मागे फिरले, पोलिसांनी ताणून मग सहज धरले. अंगावरच्या सोन्याची त्यांना सुटली होती हाव, संधीचे सोने करण्याचा त्यांना आखला होता डाव. सोन्यासारखी बायको गेली मला त्याची गरज नाही, देऊन टाका हवे ते त्यांना, माणूस मेला की काही उरत नाही. कितीही कमावले तरी माणसाला काही पुरत नाही, फुकटचे घेऊन कुणी आनंदी झाल्याचे मला तरी स्मरत नाही. ...

कविता - 'गुरु'त्व

  कविता - 'गुरु'त्व 'गुरु'त्वामागचे हेतू एकदा समजून घ्यायला हवेत, लाभला मोठा गुरु म्हणून कोणी जाऊ नये हवेत. द्रोण जितका मोठा होता, तितकाच तो खोटा होता. एकलव्याचा अंगठा त्याने कपटाने घेतला होता, ज्ञानाचा साठा त्याने पांडवांनाच वाटला होता. शूर असला तरी कर्ण सूत म्हणून बाटला होता. सूत्रे हाती राहावीत म्हणून कृष्ण पांडवांना भेटला होता. 

सहकार क्षेत्र आणि ९७ वी घटनादुरुस्ती

* सहकार क्षेत्र आणि ९७ वी घटनादुरुस्ती* 20 जुलै 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने 2:1 या बहुमताने 97 व्या घटनादुरुस्तीतील काही भाग वगळण्याचा निर्णय दिला. ही घटनादुरुस्ती सहकार क्षेत्राशी संबंधित आहे. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्वतंत्र सहकार खात्याची निर्मिती करून त्याचा कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपविला. केंद्र सरकारच्या विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यातून राज्यांच्या अधिकारांवर टाच आणण्याच्या धोरणांवर टीका होत असताना, त्याबाबत संशयाचे वातावरण असताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्यांना दिलासा देणारा ठरला आहे. मुळात सहकार हा विषय राज्यघटनेच्या समवर्ती सूचीत (Concurrent list)  असल्याने त्याबाबाबतचे कायदे करण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे संबंधित राज्यांचा असल्याने केंद्र सरकारला त्यात थेट हस्तक्षेप करता येणे शक्य नव्हते. 97 व्या घटनादुरुस्तीने केंद्राला याबाबत काही अधिकार बहाल केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने तो हस्तक्षेपही काढून ट...

केरळमध्ये भाजपा अपयशी का ठरली?

    जागतिक   राजकारण   न्याय   अर्थकारण   विज्ञान   शिक्षण   साहित्य   पर्यावरण   हिंदी   उर्दू   सपोर्ट द वायर राजकारण Featured केरळमध्ये भाजपा अपयशी का ठरली? 01:20 AM Jul 18, 2021 | राजेंद्र भोईवार केरळमध्ये दोन आघाड्याचे राजकारण इतके घट्ट रुजले आहे की, तिथे तिसऱ्या राजकीय शक्तीला कोणतेही स्थान नसते. तरीही भाजपने तिथे पर्यायी म्हणून तिसरी आघाडी स्थापन केली, या आघाडींनी एकमेकांचे तुष्टीकरण व आरोप – प्रत्यारोप करण्यात मग्शुल राहतील आणि त्यातून एक मोठी घुसळण घडून येऊन, त्यातून नवे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपने करून ही निवडणूक तिरंगी व प्रतिष्ठेची केली,  मात्र त्यात पूर्णतः अपयशी ठरले. मुळात भाजपने २०१४ पासून प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची बनवत आली आहे. उदा. लोकसभा, राज्यांच्या विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका. ज्या राज्यात पक्षाचा जनाधार नाही त्या राज्यातील निवडणूक लढवून ती निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. उदा. हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक. तसेच आता पश्चिम बंगाल, केरळ व पुद्दुचेरी या राज्याची निवडणुकही प्रतिष्ठ...