Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

परमाणू आणि पोखरण

परमाणू आणि पोखरण:  काल जॉन अब्राहम निर्मित आणि अभिनीत परमाणू हा चित्रपट पाहिला. चित्रपट भारताने 1998 साली केलेल्या अणुचाचण्यांवर आधारित असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता होतीच. ज्यांना साधारण  1990 नंतरचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आठवत असेल त्यांना याचे महत्व आणि गांभीर्य निश्चितच जाणवत असेल. ते महत्त्व आणि गांभीर्य कायम राखत जॉनने हा चित्रपट बनवला असून एक निर्माता आणि अभिनेता म्हणून कामगिरी अत्यंत चोख बजावलेली आहे. मुळात हा  विषय संवेदनशील असल्याने  त्याबाबतची चित्रपट म्हणून मांडणी करणे अत्यंत कठीण आणि जबाबदारीची गोष्ट होती ती जॉन आणि त्याच्या संपूर्ण टीमने यशस्वीपणे पेलली आहे. एक ठोकळा अभिनेता ते उत्कृष्ट निर्माता आणि अभिनेता हि जॉनची वाटचाल खूपच विस्मयकारक आहे. याअगोदर त्याने राजीव गांधींच्या हत्येवर आधारित "मद्रास कॅफे" या चित्रपटातून याची झलक दाखविली होती. त्यामुळे तो आणि त्याची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे. जॉनच्या "परमाणू" चित्रपटाने 1998 च्या अणुबॉम्ब चाचण्यांची  आठवण ताजी झाली. तसा भारत हा 1974 पासून अणूवस्त्रधारी देश आहे. १९६२ भारत-चीन युद्ध...

अखेर राणीने डाव जिंकला

अखेर गेले तीन दिवस कर्नाटकात चाललेला राजकारणाचा खेळ येद्दीयुरप्पा यांच्या राजिनाम्याने संपला. राजीनामा हि तशी अत्यंत सामान्य गॊष्ट आहे, पदावर विराजमान होण्याइतकिच सामान्य गोष्ट आहे पण भाजपने सत्ता राखण्यासाठी केलेला आटापिटा आणि त्यातूनही पदरी पडलेले अपयश यामुळे भाजपची (विशेषतः मोदी, शहा आणि येद्दीयुरप्पा यांची) पुरती नाचक्की झाली. मुळातच निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष (१०४ जागा, त्यातील एक निकाल राखीव म्हणून १०३) म्हणून भाजप कर्नाटकात पुढे आला असला तरी  दोन नंबर वर असलेला काँग्रेस (७८ जागा) आणि तिसऱ्या नंबरवर (३७ जागा) जनता दल यांच्यात निवडणूक  निकालानंतर झालेली युती यामुळे भाजपला सत्ता मिळणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट असतानाही केंद्रातील सत्तेची गुर्मी आणि पैशाचा वापर करून आम्ही काहीही करू शकतो हा अट्टाहास अंगलट आला.  त्यातूनच काँग्रेस आणि जनता दलाचे आमदार फोडून आपण विधानसभेत बहुमत सिद्ध करू असा भ्रम भाजपला होता आणि त्यासाठी भाजपला गोवा आणि माणिपूरचा अनुभव हाताशी होता. पण त्यावेळी काँग्रेस लोकसभा निवडनुकीत झालेल्या  पराभवातुन सावरलेली नव्हती त्यातच सोनि...

लघुकथा : फोटो

मिराला कृष्णकुंज सोसायटीत रहायला येऊन आठ दिवस झाले होते. त्यामुळे ती आता स्थिरावली होती. कामावरून आठ दिवसाची काढलेली सुट्टी आता संपणार होती. उद्या तिला कामावर हजर व्हावे लागणार होते. त्यातच ती आयटी कंपनीत कामाला असल्याने इतकी मोठी सुट्टी तिला फारच प्रयासाने मिळाली होती त्यामुळे आता तिला अजून करणे सांगता येणार नव्हती. तसे तिने आपल्या आईला तिच्या कडे रहायला बोलाविले होते पण आईला यायला अजून  चार पाच दिवस अवकाश होता. पण मिराला एकटेपण खायला उठले होते त्यामुळे तिच्या आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला अनय ला पुढे पाठवून दिले. अनय दहा वर्षाचा असला तरी खूपच हुशार होता. तिच्या आईने त्याला एकट्यालाच ट्रेनने बसवून दिले होते. पण ट्रेनला मध्येच अपघात झाल्याने ती चिंतेत होती. तिने रेल्वेच्या आपतकालीन हेल्पलाईनला फोन करून माहिती घेतली होती. शेवटी आज तिने कामाला दांडी मारून रेल्वे हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधील जखमी प्रवासाच्या बेडवरील एका बेडवर अनयला बगून तिला हायसे वाटले. त्याला किरकोळ लागले होते. पण त्याच्या मनात अपघाताची भीती बसल्याने तो बेशुद्ध झाला होता. एकमेकांना पाहून दोघे रडू लागले. मिराने...

लघुकथा : बदला

बंडोपंतांच्या सुलेखचा आज सकाळी सकाळी अमेरिकेत जोरदार ऍक्सिडेंट झाला होता. सुलेख तसा शिस्तप्रिय आणि नियमाने चालणारा मुलगा होता आणि तितक्याच शिस्तीच्या बॉस्टन शहरात त्याने आपले निवासस्थान वसवले होते. अश्या आपल्या शिस्तप्रिय मुलाचा शिस्तप्रिय शहरात असा अचानक अपघात झाला तरी कसा याचा विचार करतच बंडोपंत पहाटेच्या flight ने बॉस्टन ला रवाना झाले.  बंडोपंतांच्या भाग्याने प्रवासात कोणताही अडथळा न आल्याने ते ठरल्या वेळेला बॉस्टनला पोहचले खरे पण अंकिता काही त्यांना एअरपोर्टवर recieve करायला आली नव्हती. आपली लाडकी आणि होतकरू सून आपल्याला न्हायला आली नाही म्हणून त्यांना जरा काळजी वाटली. त्यांनी घरगड्याला तिच्या न येण्याचे कारण विचारले तर त्याने रडत रडत तिलाही अपघात झाल्याचे तर सांगितलेच पण सुलेखचा अपघाती मृत्यू झाला असून त्याचे पार्थिव आपल्या हवाली करण्यासाठी आपल्याला बोलावले असल्याचे स्पष्ट केल्यावर बंडोपंतांना रडू कोसळले.  त्याच्याबरोबर अंकितालाही उपचारासाठी भारतात घेऊन जावे असा विचार करून बंडोपंत अंकिताला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले.  ती शुद्धीवर आल्याचे पाहून त्यांनी तिला अपघ...

लघुकथा : आस

वयाच्या नव्वदीला टेकलेल्या पुष्पाताई आज कधी नव्हे त्या रात्रिच्या अकरा वाजून गेल्या तरीही जाग्या होत्या.  तश्या त्या रोज दहा वाजण्याच्या आतच झोपी जात असत. लवकर झोपून लवकर उठावे हा त्यांचा शिरस्ता त्यांनी आजही कटाक्षाने पाळला होता. त्याचे यजमान रिटायर झाले की एका वर्षातच निवर्तले होते. हा दिनक्रम त्यांनीच घालून दिला होता.  अगदी त्यांच्या एकलुत्या एका मुलाला गिरीषलाही ते कटाक्षाने या गोष्टी पाळायला लावत असत.  त्याचे फायदेही त्यांनी अनुभवले होते. गिरीष आता आपल्या बायकोबरोबर परदेशी वास्तव्यास असला तरी त्याने ती legacy पुढे आपला एकुलत्या मुलगा अद्वय आणि पत्नी रियाकडे सुद्धा pass on केली होती.अश्या या आपल्या मुलाचे आणि सूनेचे होणारे आगमन आज या वयातही इतका उशीर जागण्यासाठी त्यांना वेगळीच उर्मी देऊन गेलं होतं. गिरीशला अमेरिकेला जॉबसाठी जाऊन आता चांगली 35 वर्षे होऊन गेली होती. पण याकाळात तो फक्त दोनदा आला होता भारतात. एकदा बाबा गेले तेव्हा आणि दुसऱ्यांदा त्याच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळेस. नाही म्हणायला तो पैसे पाठवायचा लागतील तेवढे पण प्रत्यक्ष भेटीची सर त्या नोटांच्या पुडक्याल...

लघुकथा : बीच

रवी आणि प्रिया आज पाच वर्षानंतर बाहेर फिरायला गेले होते. तसे ते लग्नाच्या अगोदर खूप फिरले होते पण लग्न झाल्यावर मात्र घर संसार आणि आयटी क्षेत्रातील जॉब यामुळे त्यांना कोठेच जात आले नव्हते. त्यातच त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह. समाजापुढे काहीतरी आदर्श घालून द्यायचा म्हणून दोघांनी आपापल्या  नातेवाईकांचा विरोध फाट्यावर मारून बंड केले आले आणि प्रेमविवाह केला. पण लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन दोघांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग केला. अगदी सर्व काही सेट झाल्याशिवाय मुलही  होऊ दिले नाही. तसे त्यांनी एकमताने ठरविले आणि त्यावर ते कायम राहिले. याला आता पाच वर्षे पूर्ण झाली होती. आता त्यांना आपल्याला बाळ असावे असे वाटू लागले होते. त्याच्या आगमनानंतर आपण परत पाच वर्षे तरी अडकून पडू याची जाणीव होऊन त्यांनी यंदा चार दिवस फिरायला जायचा बेत आखला. पण कोठे जायचे यावरून पुन्हा नेहमीप्रमाणे मतभेद झाले. दोघांनाही बीचवर फिरायला जायचे आवडायचे पण बीच मात्र वेगवेगळा.  प्रियाला लाडघर तर रवीला वेळणेश्वर. यावरून त्यांचं कित्येकवेळा याअगोदरही भांडण झाले होते तसेच...

लघुकथा : भूक

उमाकाकू आपली दुपार शिफ्टची ड्युटी संपवून घरी   चालल्या होत्या . आज अचानक त्यांची नेहमीची  लोकल चुकली होती म्हणून त्यांनी सीएसटीवरून रात्रीची ११.३० ची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली होती. कल्याणजवळ आले कि  एक्सप्रेस स्लो होते हा त्यांचा नेहमीच अनुभव गाठीशी होता तेव्हा आपण कल्याण स्टेशन जवळ आले की उतरू असा विचार करून त्या आत चढल्या. गाडीत गर्दी होती त्यामुळे त्या दरवाज्यात उभ्या राहून विचारत गढून गेल्या. शिवाय थोडे मागे उतरावे लागत असल्याने त्यांना अंधारात थोडे अंतर चालावे लागनार होते. रस्ता ओळखीचा आणि पायाखालचा असला तरी मनात थोडी भीती आणि धाकधूक होतीच. विचारात गढून गेल्या असतानाच त्यांना आतील प्रवाशांच्या गडबडीने कल्याण जवळ आल्याची चाहूल लागली आणि त्यांनी गाडी स्लो झाली की गाडीतुन खाली उडी मारली उतरल्यावर त्यांना आपण नेहमीपेक्षा थोडे मागेच उतरल्याने लक्षात आले . आणि त्या पदर सावरत लगबगीने चालू लागल्या. चालता चालता त्यांचे लक्ष रेल्वेरुळाच्या  बाजूला पडलेल्या एक 25 ते 30 वर्षाच्या मुलीकडे गेले. ती विव्हळत होती आणि मधून मधून भूक भूक असे म्हणत होती. तिची अवस्था अत्यंत...