Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019

नात्यातील घुसमट

        नेहमीप्रमाणे लेक्चर संपवून स्टाफरूममध्ये येऊन बसलो होतो. लेक्चर म्हंटले की ताण येतोच! त्यातही वर्ग जर फुल भरलेला असेल तर ताण येतोच येतो पण अध्यापन करायलाही मजा येते. तसा माझ्या लेक्चरला वर्ग नेहमीच भरलेला असतो. फार कमी शिक्षकांच्या नशिबी आजकाल हे सुख असते. त्याअर्थी स्वतःला नशीबवान म्हणायला हरकत नाही. त्यात कंपनी कायदा, मॅथेमॅटिक्स आणि अकाऊंटसारखे  रटाळ प्रवृत्तीचे विषय शिकवायचे म्हणजे मुलांना भावेल आणि आवडेल अश्या पद्धतीने शिकविणे हेच कौशल्य असते आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर निसर्गाने ते मला बहालही केले आहे असे वाटते. त्याअर्थाने मी स्वतःला सुदैवी आणि समाधानीही समजतो.  विद्यार्थ्यांना (यात मुले आणि मुली दोघेही आले) त्यांच्या पातळीवर जाऊन शिकविल्याशिवाय आणि त्यांच्या भावनांना हात घातल्याशिवाय विद्यार्थी आपल्याशी मोकळेपणाने बोलत नाहीत हा अनुभव गाठीशी होता. वर्गात शिकवीत असताना मी ते करतोही.  त्यामुळेच बरेच विद्यार्थी मनमोकळे बोलतातही, अगदी मुलीसुद्धा!                   तर झाले असे की, मी स्टाफरू...

आइन्स्टाइन आणि देव

*(सतराव्या शतकातील बरूच डी स्पिनोझा या तत्त्वज्ञ विचारवंताच्या मूळ इंग्रजीत लिहिलेल्या 'देव संकल्पने' चा भावानुवाद.)* आईन्स्टाईन अमेरिकेतील कित्येक विद्यापीठांमध्ये विविध परिषदांना जात असत, तेव्हा विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारत. त्यात वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे *"तुमचा देवावर विश्वास आहे का?"* यावर त्यांचे नेहमीचे उत्तर असायचे *"माझा स्पिनोझाच्या देवावर विश्वास आहे."* बरूच डी स्पिनोझा हे पोर्तुगीज मूळ असलेले एक डच तत्त्वज्ञ होते. ते आणि रेनी डेकार्टस हे दोघे त्या काळातील सर्वश्रेष्ठ बुद्धिवादी विचारवंत मानले जात. स्पिनोझा यांचा जन्म सतराव्या शतकात ॲम्स्टरडॅम येथे झाला. त्यांचे वडील एक यशस्वी व्यावसायिक होते, पण ते फारसे श्रीमंत नव्हते. स्पिनोझा यांनी जी देव संकल्पना मांडली तिथे स्वरूप खालीलप्रमाणे सांगता येईल... *देव असता तर मानवाला म्हणाला असता, "हे उठसूठ प्रार्थना करणं आणि पश्चात्तापदग्ध होऊन आपली छाती बडवणं आता पुरे झालं... थांबवा ते आता. या जगात तुम्ही मनसोक्त हिंडा, नाचा, गा, मजा करा. गरजू लोकांनां मदत करा. मी दिलेल्या प्रत्येक ...

सत्तापिशाच्च षड"यंत्र

Fwd *सत्तापिशाच्च षड"यंत्र"* अकरा मुडदे घेऊन पावली भाजपला एव्हीएम *ताज बसला कि महल बनवणारे हात कलम करणारा "शाह" जहान या देशाला नवा नाही* _(टीप - हलक्या काळजाच्या तथा आपली बुद्धी कुठल्यातरी खुंटीला बांधलेल्या भक्त, अनुयायी तथा कार्यकर्त्यांनी लेख धाडस करून वाचावा नसता आपली वेळ वाचवावी)_ सुरेश भटेवरा हे दिल्लीत पत्रकारिता करणारे आमचे मित्र आहेत, लोकसभा राज्यसभेत वृतांकन करताना मोदी सरकारला जवळून त्यांनी अनुभवले आहे त्यांचे एक व्याख्यान ऐकण्याची संधी उपलब्ध झाली अन त्यांच्या संदर्भाने निरंजन टकले आणि ते अस्या उभय दोघांकडे असलेल्या सूत्राच्या माहिती आधारावर देशात मोठा कावा झालेला आहे यावर कुणाचे दुमत होत नाही . मोदींच्या यशात मंत्रावाल्या साध्वीचा नाही तर यंत्रांचा मोठा सहभाग आहे . याच वेळी नाही तर २०१४ आणि २०१९ अश्या दोन्ही अनिर्बंध सत्तेच्या बुडात मोठा घपला असल्याचे देशाला वाटू लागले आहे. नुसता घपला नाही तर मोठा रक्तपात देखील केलेला आहे. ज्याप्रमाणे ताजमहाल बनवणाऱ्या कारागिराचे हात शहाजहान कडून कलम केले तद्वत ज्यांनी मशीन हाईक केल्या त्या १२ लोकांना देखील भाज...

पेरियार कौन थे।

#बहुजन_नायक_पेरियार पेरियार रामास्वामी नायकर जी के जन्मोत्सव पर आप सभी को हार्दिक बधाई... जानिए कौन है पेरियार? अगर वो जिंदा हो गये तो मर जायेंगे संघी!! जी हाँ, क्रांतिकारी और आधुनिक विचारक द ग्रेट पेरियार रामास्वामी नायकर की मूर्ति तोड़कर उन्हें जिंदा करने के लिए संघियो को बधाई ... इस देश के इतिहास के आधुनिक युग में विज्ञान बोध और तार्किकता के एक ऐसे क्रांतिकारी विचारक थे, जिन्होंने समाज के दलित पिछड़े समुदाय को सम्मान से जीने और समाज में बराबर के अधिकार पाने का रास्ता सफलतापूर्वक दिखाया। पेरियार एकमात्र ऐसे बडे़ कारक और विचारक थे, जिन्होंने दक्षिण भारत की राजनीति से ब्राह्मणवाद के पैर उखाड़ दिये और समाज व्यवस्था तथा राजनीति में दलित पिछडे़ समाज को वर्तमान इतिहास के शिखर पर बैठा दिया। तमिलनाडु की राजनीति में आज भी पेरियार रामास्वामी नायकर की परिकल्पना साकार हुई देखी जा सकती है। पेरियार एक अच्छे व्यवसायी परिवार में जन्मे थे लेकिन वे लगातार महसूस कर रहे थे कि ब्राह्मण, दलित और पिछड़ों को घोर अपमान के साथ नारकीय जीवन जीने को मजबूर करते रहे है । ये उसी पेरियार साहब के विचार है जिन्हो...

कविता: सत्तेचा बैल

कविता : सत्तेचा बैल काल सत्तेचा बैल मेला, कुणी म्हणाले हे तर हात दाखवून अवलक्षण झाले, कुणी म्हणाले, घड्याळाचे काटे उलटे फिरले, टिकटिक थांबली, किटकीट उरली, सत्ता सुंदरीची मती फिरली, कुणी म्हणाले मुजोरांची खाशी जिरली. काल सत्तेचा....... सत्तेचा मालक सैरभैर झाला, कुणी म्हणाले, बाण लागला, कुणी म्हणाले वाण नाही पण गुण लागला, सत्तेसाठी कुणी इमान खुंटीला टांगला, कुणी म्हणाले, सत्तेचा बैल कधी गवत खात नाही, कुणी म्हणाले, हाव त्याची वाईट जाता जात नाही, काल सत्तेचा............ कुणी म्हणाले, जहाज बुडाले, कुणी म्हणाले, उंदीर पळाले, कुणी म्हणाले फाईल उघडली, कुणी म्हणाले, फाईल दाबली, कुणी म्हणाले, नेम लागला, कुणी म्हणाले, कसा वाकला, काल सत्तेचा............ कुणी म्हणाले, सत्तेचा बैल कधी मरत नाही, एका जागी थरत नाही, दावण मात्र बदलत जातो, गेल्या घरी खात राहतो.

भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेब

भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेब विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी इ.स. 1916 ते 1942 म्हणजे 26 वर्षे संघर्ष करून भारतातील सर्व अस्पृश्यांना जागृत करून संघटित केले , आणि दि. 18,19,आणि 20 जुलै 1942 ला या सर्व अस्पृश्यांचे नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन घेतले ,  त्यामध्ये 75,000 कार्यकर्ते उपस्थित होते , त्यामध्ये 50,000 पुरूष व 25,000 महिला होत्या ,  अस्पृश्य वर्गामधील 1500 जाती होत्या , त्या सर्व जातींना जागृत करून जोडण्याचे महाकठीम काम डाॅ. आंबेडकरांनी केलं . त्या राष्ट्रीय अधिवेशनात उत्तर भारतातील गोरे अस्पृश्य , मध्ये भारतातील सावळे अस्पृश्य , दक्षिण भारतातील काळे अस्पृश्य , अशा सर्व अस्पृश्यांना एकत्र केले . थोडक्यात एक राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण केले , या राष्ट्रव्यापी आंदोलनाचा पाया त्यांनी अस्पृश्यांना  बनविले . ज्यावेळी काॅन्ग्रेस + गांधीने डाॅ. आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून जाण्यासाठी एकही सुरक्षित मतदारसंघ सोडला नाही . त्यावेळी बंगाल मधील लोकांनी डाॅ. आंबेडकरांना बंगालमधून संविधान सभेची निवडणूक लढविण्याची विनंती केली . मुस्लीम लीगचा मनुष्य जिथू...

सिकंदर ते मोदी

लेख नक्की वाचा श्रीकृण्णा घरडे भारत पाकिस्तान विभाजन. गांधींच्या हत्येमागचे रहस्य. आणि आर्टिकल ३७० आपण नेहमी एक म्हण ऐकतो, "जो जीता वही सिकंदर".  के. अब्बास निर्मित अमीर खानचा या नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला आहे. "सिकंदरच" खर नाव "सिकंदर" नव्हत तर अलेक्झांडर होत. आता अलेक्झांडरच भाषांतर सिकंदर कस झाल ? हा संशोधनाचा विषय आहे. शब्द, वाक्य, पॅरा, पुस्तक याच भाषांतर होत पण नावाच सुद्धा भाषांतर फक्त भारतातच होत असाव. " *जो जीता वही सिकंदर"* , ही म्हणच खोटी आहे.  युनानचा राजा अलेक्झांडर भारतात आला, त्यान पुरु नावाच्या काश्मिरी ब्राह्मण राजाचा पराभव केला इथपर्यंत इतिहास ठीक आहे पण चंद्रगुप्त मौर्याने अलेक्झांडर उर्फ सिकंदरचा पराभव केला होता हा इतिहास ब्राह्मणांनी खूपच षडयंत्रपूर्वक दडवला. ब्राह्मण राजा पुरुचा ज्या अलेक्झांडरने पराभव केला त्याचा पराभव एक शुद्र सम्राट चंद्रगुप्त मौर्याने केला ही गोष्ट ब्राह्मणांच्या वर्ण अहंकाराची नांगी ठेचणारी होती.  ब्राह्मण पुरु राजाचा पराभव मान्य करण ब्राह्मणी इतिहासकारांना मान्य आहे पण  नागवंशी सम्रा...