Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

आर्थिक निकषाचे पिल्लू

आर्थिक निकषाचे पिल्लू: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने जोर पकडला असून सरकारी अनास्थेमुळे  इतके दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन अचानक हिंसक झाले आहे. आरक्षणासाठी "करा किंवा मरा" या दृढ निश्चयाने मराठा युवक, युवती आणि समाजातील लोक आपापल्या भागात विविध मार्गाने आंदोलन आणि निषेध व्यक्त करत आहेत. आंदोलनाच्या वेळी विविध भागातील सर्व जातीय लोकांनी मराठा आंदोलनाला उस्फुर्त पाठींबा दिला आणि सर्व भागातील संप यशस्वी झाले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा झाला. वेळेवर सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र सरकारबरोबर केंद्र सरकारलाही या आंदोलनाची धग जाणवू लागली आहे. आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असतानाच एका बाजूला आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे असे म्हणणाऱ्या राजकीय पक्षांच्या समविचारी संघटना आणि राजकीय नेते आरक्षणाच्या राज्यघटनेतील तत्वाला  हरताळ फासण्याचे प्रयत्न करत  आहेत. आरक्षणाची तत्वे आणि मूळ मुद्दा बाजूला टाकण्यासाठी मराठाच काय कोणत्याही आरक्षणाला विरोध असलेले पण आरक्षणाच्या विरोधाची जाहीर  भूमिका घेणे अशक्यप्...

रंगीत तालीम

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सुरुवात झाल्या झाल्या पहिल्याच आठवड्यात तेलगू देसमचे गुंटूरचे खासदार जयदेव गल्ला यांनी अविश्वास ठराव मांडला आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी   तो लगेच दाखल करून घेऊन विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यापेक्षा मोठा धक्का तो पुढच्या ४८ तासात त्यावर १० तास चर्चा होऊन मतदान होईल असे जाहीर करून दिला. वास्तविक मागील अधिवेशनातही  तेलगू देसमनेच हा प्रस्ताव मांडला होता आणि लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळला होता. त्यावेळेस असलेले आरोप या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणखी तीव्र झाले होते आणि या अधिवेशनात हा प्रस्ताव पुन्हा येणार याची जाणीव असणारे पंतप्रधान मोदी आपल्या प्रदेश दौऱ्यात असतानाच पुन्हा हा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात दाखल होणार हे पक्के समजून होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्याची तयारी करत होते. हे त्याच्या हातातील बाडावरून स्पष्ट दिसत होते.  विरोधकांना धक्के देण्यात पटाईत असलेल्या मोदींनी असे चाल खेळणे हे आता विरोधकांच्या अंगवळणी पडले आहे. त्यामुळे विरोधकही गेल्या अधिवेशनापासूनच चर्चेच्या तयारीत होते. त्यामुळे विरोधकांची आपल्या या निर्णयान...

व्यभिचार आणि समता

व्यभिचार आणि स्त्री पुरुष समता : केरळ उच्चन्यायालयात सध्या एक याचिका दाखल झाली असून त्यातील याचिकाकर्त्याने घेतलेल्या भूमिकेमुळे ही याचिका आणि याचिकाकता देशभर चर्चेचा विषय झाले आहेत. याचिकाकर्त्याने याचिकेत स्त्री पुरुष व्याभिचाराबाबत स्त्री आणि पुरुष यांना समान शिक्षा का नाही? असा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतीय राज्यघटनेने जर स्त्री आणि पुरुष यांना समान मानले असेल तर व्यभिचार केल्याबद्दल फक्त पुरुषच दोषी का? येथे लिंगभेद होत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या ठिकाणी याचिकाकर्त्याने राज्यघटनेतील तरतुदींचा आधार  घेतल्याने वरवर  पाहता त्याची भूमिका रास्त वाटत असली तरी याचिकेचा विषय स्त्रीच्या चारित्र्याशी आणि व्याभिचाराशी जोडला असल्याने आणि याबाबत असलेले कायदे, सामाजिक आणि सांस्कृतिक  दृष्टिकोन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यातील सामाजिक दृष्टिकोनातून याकडे बघताना व्याभिचाराच्या अनुषंगाने कायद्यात काय तरतूद आहे ते पाहणे आवश्यक आहे. ब्रिटिशांनी भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात जे कायदे केले त्यातील काही कायदे अजुन तसेच आहेत. त्यातील भारत दंड विधान अत्यंत महत्वाचा कायद...

बिफोर द रेन : एक शोकांतिका

बिफोर द रेन : एक शोकांतिका गल्लाभरू आणि तद्दन मसाला असलेल्या बाजारू चित्रपटांच्या भाऊगर्दीत अनेक चांगल्या कलाकृती उच्चनिर्मिती मूल्य आणि कलाकारांचा कसदार अभिनय असतानाही प्रेक्षकांच्या उदासीनतेमुळे आणि बौद्धिक क्षमतेमुळे दुर्लक्षित राहतात. अश्या अनेक कलाकृती हिंदीसह अनेक भाषेत तयार होतात. असाच एक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारांच्या  अभिनयाने नटलेला आणि बहुसंख्य रद्दड प्रेक्षकांच्या नजरेतून सुटलेला चित्रपट म्हणजे "बिफोर द रेन". चित्रपटाचा काळ साधारणत: जग दुसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतानाचा आहे. ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळणार नाही असे म्हटले जात होते त्या ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्याला धक्के बसू लागले होते. हिटलर आणि मुसोलिनी या धर्मवेड्या आणि वंशवाद जोपासणाऱ्या प्रवृत्तीने साम्राज्यवादी धोरण अंगीकारले होते. अश्या काळात ब्रिटिशांची सर्वात मोठी वसाहत असलेल्या भारतात संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न भारतीयांना शांतपणे झोपून देत नव्हते. देश म्हणून भारत अखंड असला तरी भारतीय अस्मिता जागवणारा असा  कोणताही खास मुद्दा नजरेसमोर नसतानाच नेताजीने जपानच्या मदतीने ब्रिटिशां...

चांगला कोण?

काल नेहमी प्रमाणे संध्याकाळी सायकलिंग ला चलल होते.  तसा मी खिशात ओझे नको म्हणून शक्यतो माझा मोबाईल घरीच ठेवून जातो पण काल गडबडीत मोबाईल घरी ठेवायला विसरलो. घरापासून तीन चार किमी लांब गेल्यावर लक्षात आले की आपण मोबाईल आणला आहे. तेही मोबाईलची रिंग वाजली तेव्हा. सायकल बाजूला लावून मोबाईल बघितला तर माझ्या भाचीने फोन केला होता. माई नेहमीप्रमाणे तिला विचारले तर तिला एक प्रश्न होता आणि त्याचे उत्तर तिला लिहून पाहिजे होते. प्रश्न तसा साधाच होता पण उत्तर द्यायला अत्यंत कठीण होता. तिला शाळेत तिच्या शिक्षिकेने कोणत्याही एका भारतीय  सनावर निबंध लिहून आणायला सांगितले होते. तिने सगळ्यात अगोदर हात वर करून मॅडम मी दिवाळी विषय मागून घेतला होता.

सत्य सत्याच्या पलीकडचे

सत्य सत्याच्या पलीकडचे २६ मार्च २०१८ पाकिस्तानच्या लाहोर येथील उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते होते. लाहोर स्थित इम्तियाज रशीद कुरेशी. यांची लाहोर मध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेचे नाव आहे. भगतसिंग फाऊंडेशन.  याचिकेचा विषय होता ८३ वर्षापूर्वी क्रांतीवीर भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारने दिलेली फाशी ही ज्या हत्या करण्यासाठी दिली आहे. त्या त्यामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात नसून ते निर्दोष असून याबाबत त्यांना सबळ पुरावे मिळाले असून न्यायायाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी विनंती करण्यात आली. कुरेशी यांनी यावर युक्तीवाद करताना खालील मुद्दे मांडले: १. २३ मार्च १९३१ ला भगतसिंग आणि सहकाऱ्यांना ब्रिटिश अधिकारी जॉन पी सॉंडर्स याच्या हत्येला कारणीभूत ठेवून फाशीची शिक्षा दिली होती. पण या खटल्यात भगतसिंग आणि सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच नव्हती. न्यायलयाने त्यांना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती असा सप्रमाण युक्तीवाद कुरेशी यांना केला. २. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना परत एका खोट्या प्रकरणात अडकविण्यात आले. हे प्रकरण म्हणजे दिल्लीतील ब्...

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुरस्कर्ते

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुरस्कर्ते:        सूर्य मावळतीला गेला की खुज्या लोकांच्या सावल्या लांब लांब पडायला लागतात. ही खुजी माणसे मग स्वतःला खूप मोठी  आणि महान समजायला लागतात. जेव्हा सुमारांच्या सद्दीचा काळ येतो तेव्हा अशा लोकांचे फावते. आम्ही म्हणू तेच सर्व बरोबर आहे आणि मला फार कळते असा या लोकांचा भ्रम असतो त्यामुळे आम्ही म्हणू तेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे या लोकांना वाटते आणि मग ते आपल्याला वाटेल तसे बरळत सुटतात. त्यांच्या या वागण्याला जर कोणीच विरोध केला नाही तर त्यांना असे वाटते की आपण जे बोलतोय ते बरोबर आहे आणि लोकांनी ते स्वीकारले आहे असाही या लोकांचा समज होतो आणि तोंडाला येईल  ते  ही लोकं बोलतात. कारण आपण चुकीचे बोलतोय हे त्यांना सांगणारे समाजात कोणीच नसते.             आपल्या आजूबाजूला रोज अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना समाजातील कोणताच जबाबदार घटक काहीच बोलत नसतो तेव्हाचा काळ सुमारांच्या सद्दीचा आहे असे समजले जाते. महाराष्ट्र देशी सध्या अशा सुमाराचा सुकाळ झालेला आहे. जो तो उठतो आणि आपल्याला वाटेल ते बोलत सुट...

उच्च-निचतेच्या विळख्यात भारत

उच्च निचतेच्या विळख्यातील भारत: काळ आणीबाणीचा (आतासारख्या अप्रत्यक्ष आणीबाणीचा नव्हे, थोडा वेगळा) म्हणजेच १९७६ च्या  पूर्वार्धातला आहे. आणीबाणीला विरोध करणाऱ्या अनेकांना तुरुंगात टाकले जात होते. काँगेसविरोधी सर्व पक्षीय नेत्यांना तुरुंगांत डांबले गेले होते. समाजवादी, साम्यवादी यांच्याबरोबरच संघ भाजपचेही अनेक नेते तुरुंगात होते. राजकीय परिस्थिती पूर्णपणे ताब्यात असतानाच समाजमन मात्र वेगाने इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात चालले होते. अटकेने काकुळतीला आलेले आणि तुरुंगाबाहेर असलेले संघाचे नेते संघाच्या कार्यकर्त्यांना तुरुंगातुन बाहेर काढावे यासाठी प्रयत्नशील होते.  सर्व  विरोधक असे गलितगात्र होते पण इंदिरा गांधी मात्र आताच्या नेतृत्वासारख्याच हादरलेल्या होत्या. त्याला कारण म्हणजे विरोधात गेलेले जनमत. अश्यावेळेस आपल्याला आणीबाणीनंतर सत्तेत यायचे असेल तर धर्मसत्तेचा पाठिंबा असणे आवश्यक आहे हे इंदिरा गांधींनी हेरले होते. त्याचाच एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी हिंदू धर्म गुरु शंकराचार्य यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत आमच्या भागात एक घटना फारच चवीने सांगितली जाते ती ...