Skip to main content

Posts

Showing posts from September, 2020

भारतातील बेरोजगारी

 वॉशिंग्टन पोस्ट हे अमेरिकेतील अत्यंत धडाडीचे आणि निर्भीड दैनिक आहे. सत्तेवर कोण आहे आणि त्याचा आपल्या अस्तित्वावर काय परिणाम होईल याची कोणतीही तमा न बाळगता पुरावांच्या आधारे सत्य मांडण्यात अग्रणी असलेल्या या वृत्तरपत्राचे भारतात ही काही निवडक शहरात वार्ताहर आहेत आणि तेही अत्यंत निर्भीडपणे भारतातील लोकशाहीची बूज राखणाऱ्या विषयांचे संतुलित आणि निडरपणे वार्तांकन करतात. त्यामध्ये दिल्लीस्थित वॉशिंग्टन पोस्टच्या वार्ताहर निहा मसीह यांचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतात लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर त्यांनी भारतातील विविध राज्यात फिरून भारतातील बेरोजगारीचे दृश्य आणि सदृश्य स्वरूप आणि परिणाम याचा सखोल अभ्यास करून त्याची शास्त्रीय साधनांच्या साह्याने मांडणी करून एक संशोधनपर लेख लिहिला हा लेख २४ सप्टेंबर २०२० च्या वॉशिंग्टन पोस्टने जसाच्या तसा प्रसिद्ध केला. या लेखाचा हा अनुवाद:  २७ वर्षाचा इराप्पा बावगे रोजगार हमीच्या कामावर काम करत होता. त्याच्याकडून माहिती घेत असताना त्याने इंजिनिअरिंग केल्याचे समजले. सामान्य कुटुंबात जन्माला आल्याने त्याला शिक्षण देण्यासाठी संपूर्ण कुटूंबाने जीवाचे रान के...

कामगारांच्या मुळावरील सुधारणा!

कामगारांच्या मुळावरील सुधारणा! केंद्रसरकारने काल विरोधकांच्या अनुपस्थितिचा आणि राज्यसभेतील कामकाजावर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्काराचा गैरफायदा घेत बराच काळ प्रलंबित असलेली तीन कामगार विधेयके पास करून घेतली. कोणत्याही चर्चेविना विधेयके पास झाली असली तरी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी भाजपचे बिहारमधील माजी खासदार रवींद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार कामगार कायद्यात बदल करण्यात आलेले आहेत.  या शिफारशीनुसार वेगवेगळ्या औद्योगिक अस्थापनांसाठी असलेल्या आणि विविध राज्यातील वेगवेगळ्या कायद्यांचे एकत्रीकरण करून सर्व देशभरात हे नवीन तीनच कायदे लागू होतील. हे सुसूत्रीकरण वगळता या तीन कायद्यांनी काही मोजक्या चांगल्या गोष्टी करताना अनेक वाईट कामगार प्रथा पाडण्याचा घाट घातलेला दिसतो. त्यामुळे याचे परिणाम।काय होतील तर पाहणे महत्वाचे आहे.  सध्या अस्तित्वात असलेल्या विविध २९ कामगार कायद्यांचे १. कार्यालयीन सुरक्षितता, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २. औद्योगिक संबंध संहिता आणि ३. कामगारांची सामाजिक सुरक्षितता संहिता यांमध्ये वर्गीकरण केल...

शेतकरी संघर्षाचा नवा अध्याय

शेतकरी संघर्षाचा नवा अध्याय! ©के.राहुल, ९०९६२४२४५२ ज्यांनी ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा खरा इतिहास स्वतः वाचला आणि समजून घेतला असेल त्यांना एक गोष्ट कळली असेल ती म्हणजे हा लढा फक्त ब्रिटिश सत्तेशी नव्हता तर त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत केलेले कायदे आणि त्याद्वारे भारतीय जनतेची केलेली दडपशाही याविरुद्धचा लढा होता. यातील कृषी क्षेत्र हे प्राधान्याचे क्षेत्र होते कारण ब्रिटिशांनी कृषी क्षेत्रात चालवलेली दडपशाही, शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण आणि पिळवणूक शेती आणि शेतकऱ्यांच्या मुळावर आली होती. ब्रिटिश सत्तेला हादरा द्यायचा असेल शेतकऱ्यांनी त्यांच्या कृषी धोरणाला विरोध केला पाहिजे याची गरज सर्वात अगोदर जाणली ती म्हणजे महात्मा गांधी या द्रष्ट्या नेत्याने. आफ्रिकेतून १९१५ साली भारतात आल्यानंतर जेमतेम दोनच वर्षात स्वातंत्र्य लढ्याचे मर्म कृषी क्षेत्रात आहे हे त्यांच्या लक्षात आले. वेगवेगळ्या प्रातांत ब्रिटिशांकडून शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या मार्गाने शोषण होतच होते. त्यामुळे त्यांच्यात असंतोष तर होताच पण त्याला योग्य दिशा सापडत नव्हती. त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि दोनच वर्ष...

जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ, प्राच्यविध्यापंडित : शरद पाटील!*

 *जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ, प्राच्यविध्यापंडित : शरद पाटील!*  *जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*                          -- डॉ.श्रीमंत कोकाटे                                  शरद पाटील हे महान संस्कृत पंडित होते.केवळ मॅट्रिक शिक्षण झालेल्या शरद पाटील यांच्यावर सत्यशोधक आणि वारकरी विचारांचा प्रभाव होता,पारंपारिक मार्क्सवाद्यांच्या मतभेदाने ते सखोल संस्कृत अध्ययनाकडे वळले. वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी संस्कृतवरती प्रभुत्व मिळवले.पाणिनी व्याकरण,वेद, महाकाव्ये,पुराण,उपनिषद इ. संस्कृत साहित्य मुळापासून वाचले. भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञान त्यांनी अभ्यासले,                                    शरद पाटील हे केवळ पारंपारिक पुस्तकी संस्कृतपंडित नव्हते, तर इंडोलॉजी,स्त्रीवाद,राज्यशास्त्र, इतिहास,तत्वज्ञान,मानवशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचे महाविद्वान हो...

नवीन कृषी विकास विधेयक! शेतीसाठी तारक की मारक

 नवीन कृषी विकास विधेयक शेतीसाठी तारक की मारक! केंद्रसरकारने ५ जून २०२० रोजी "शेती उत्पादने व्यापार आणि वाणिज्य अध्यादेश - २०२०" जारी केला आणि महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नेहमीप्रमाणे त्यावर लगेच सहीही करून टाकली. काल दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी कोणताही विशेष बदल न करता हे बिल लोकसभेत सत्ताधारी पक्षाच्या बहुमताच्या जोरावर विनासायास पास झाले. बिलावर मतदान घेत असताना सगळे विरोधक थंडावले असताना  सत्ताधारी पक्षाचा जुना भिडू अकाली दलाने मात्र याविरोधात मतदान केले. अकाली दलाच्या पंजाबच्या वजनदार खासदार आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर-बादल यांनी केंद्रसरकारवर घणाघाती टीका करत थेट राजीनामा दिला आणि लोकडाऊनच्या चिरनिद्रेत गेलेल्या पत्रकार, प्रसारमाध्यमे आणि काही शेतकरी नेत्यांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. हा अध्यादेश  काढल्यापासूनच पंजाब आणि हरियाणा राज्यात तेथील शेतकरी मात्र विरोध करत होते. हा विरोध इतका टोकाचा होता की लॉकडाउनच्या नियमांना हरताळ फासत शेतकरी रस्त्यावर उतरले होते. शेतकरी ही अकाली दलाची मुख्य वोटबँक आहे आणि गेल्या निवडणुकीत पंजाबमध्ये भाजप अकाली दलाला तेथील म...

सच्ची रामायण- पेरीयर रामसामी

रामासामी पेरियार... दक्षिणेतील महात्मा फुले !! इरोड वेंकट नायकर रामासामी यांचा जन्म तामिळनाडू मधील इरोड या गावी १७ सप्टेंबर १८७९ रोजी झाला. यांना पेरियार (म्हणजे तमिळ मध्ये अर्थ सम्मानित व्यक्ति) या नावे पण ओळखतात. एके काळी हे तमिलनाडु मधील प्रमुख राजनेता होते. यांनी जस्टिस पार्टी स्थापना केली. या पार्टीचे मुख्य उद्दिष्ट रुढ़िवादी हिंदुत्वाचा विरोध करणे हे होते. हिन्दी मध्ये अनिवार्य शिक्षण याला पण पेरीयर रामासामीनी विरोध केलां. भारतीय तथा विशेषकरूण दक्षिण भारतीय समाजाचे शोषित वर्गातील लोकांची स्थिति सुधारण्याचे यांनी प्रयत्न केले... देशाच्या स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात (विशेषता: तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपड...

मराठा आरक्षणाच्या निमित्ताने.........

 मराठा आरक्षणाच्या निमित्ताने.... भारतासारख्या खंडप्राय आणि विशाल देशात समता आणि विकास यापेक्षा जात आणि धर्म हे मुद्दे नेहमीच कळीचे राहिलेले आहेत. त्यातच वेगवेगळे धर्म आणि प्रत्येक धर्मांतर्गत असलेली विविध जातींची उतरंड यामुळे निर्माण झालेली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता सामाजिक अस्थैर्याला कारणीभूत ठरली हे वेगळे सांगणे नको. त्यावर उतारा म्हणून खालच्या वर्गाला आपला विकास करता यावा म्हणून संविधानाने निर्माण करून दिलेली संधी म्हणून घटनाकर्त्यांनी आरक्षणाकडे पाहिले. पण गेल्या ७० वर्षातील आरक्षण, त्यातून निर्माण झालेल्या संधी, समता आणि विकास याकडे सामाजिक-आर्थिक आणि राजकीय  परिप्रेक्ष्यातुन पाहिले तर फार काही समाधानकारक चित्र नजरेसमोर येत नाही. हे असे का झाले? या प्रश्नाचे उत्तर शोधू गेल्यास एक बाब नजरेसमोर येते ती म्हणजे "आरक्षण म्हणजेच समता आणि विकास!" हा जो काही समज समाजाने करून घेतला आहे तोच मुळात चुकीचा आणि आधारहीन आहे.  असे असतानाही आरक्षणाबाबत समाजातील विविध जाती (प्रत्येक जातीला समाज म्हणणे हेच मुळात राज्यघटनेला अपेक्षित नाही. कारण भारतीय समाज हा विविध जातींनी मिळ...

कविता- रामा घरची चोरी

 कविता- रामा घरची चोरी. रामा तुझें पैसे कोणी चोरले सांग, दर्शनासाठी तुझ्या बघ लागली किती मोठी रांग. भोळ्या भाबड्या तुझ्या भक्तांना काही कळत नाही यातलं, तुझ्याच नावाने पोट भरून सांग कुणी मातलं. स्वामी तिन्ही जगाचा म्हणे तू, असे कसे केले? खरं सांग हे तुझ्या संमतीनेच तर नाही ना झाले! मी असे बोललो म्हणून भक्त तुझे माझ्यावर भडकतील, अधर्मी ठरेल मी आणि माझ्या खिडकीच्या काचासुद्धा तडकतील. नास्तिक ठरवून मला ते यथेच्छ माझ्याशी भांडतील, जुमानलो नाही मी तर माझे रक्त सुद्धा सांडतील. का तू असाच नेहमी निवडक लोकांवर मेहेरबान असतोस, दिवसाढवळ्या चोरी होताना मुद्दाम दार लावून बसतोस. भक्तीचा तू भुकेला तुला इतका डामडौल कशाला? निवडक लोकांचाच कसा तुझ्या दरबारी वशिला. तुझे मला आता काही खरे वाटत नाही, तुझ्या कर्तृत्वाची जरी कुणी किती दिली ग्वाही. भक्तांना तुझ्या तू थोडी सद्बुद्धी दे, दुःखे त्यांची थोडी तू तुझ्या पदरी घे. काल तर रामा तू मला चक्क राजकारणी वाटलास, आले भक्तांच्या मानत, मुक्काम तिथे थाटलास. जाती धर्माचे स्तोम माजत असतांना खुशाल पाहत बसतोस, भक्त असताना कष्टी खुशाल गालात हसतोस. म्हणून तर तू मला म...

राहुल गांधी पंतप्रधान होतील काय?

गेल्या पाच वर्षांपासून देशात देश आणि विविध राज्यातील राज्यपातळीवर राजकीय, आर्थिक, न्यायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर जे काही सुरू आहे ते बघता सामान्य नागरिक म्हणून चिंता वाटावी अशी परिस्थिती जशी आहे तसेच याबाबत बोलण्याशिवाय आणि चर्चा करत राहण्याशिवाय सर्वसामान्य पण जाणकार माणसांच्या जवळ काहीच पर्याय उरला नाही त्यामुळे तो हतबल तर आहेच पण त्याहीपेक्षा गंभीर काही असेल तर ज्यांच्यासाठी संघर्ष करावा असे वाटते ती नवी पिढी मात्र वेगळ्याच विश्वात रमली आहे. त्यामुळे जे चालू आहे ते बदलण्यासाठी राजकीय पर्यायाशिवाय दुसरा कोणताच पर्याय सध्या तरी दिसत नाही कारण सामाजिक पातळीवर काही सकारात्मक होईल अशी सुतराम शक्यता नाही. आंदोलने, चळवळ, सत्याग्रह असली समाजाला निर्णायक दिशा देणारी साधने केव्हाच कालबाह्य ठरली आहेत. सतत काहीतरी थ्रिल हवे असणाऱ्या आणि चंगळवाद यात रमू पाहणाऱ्या नव्या पिढीला यात आकर्षण आणि स्वारस्य राहिलेले नाही. अश्या परिस्थितीत राजकीय पातळीवर सध्याच्या सत्ताधारी पक्षाने केलेली आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक वाताहत लक्षात घेता त्यांना राजकीय सत्तेच्या परिघाबाहेर ढकलायचे असेल तर पर्यायी ...

कविता

 कविता घरात किंवा DP ला बुद्ध ठेऊन कुणी सिद्ध होत नाही. नुसती पुस्तके वाचून कुणी सुविद्य होत नाही. नुसते वैचारिक बोलून कुणी आद्य होत नाही. नुसते वचन देऊन कुणी बाद्य होत नाही. केली एखाद्याने वाहवा म्हणून कुणी आराध्य होत नाही. मन असेल मळलेले तर हेतू साध्य होत नाही.  ©मीच ना, दुसरं कोण!

कविता -गुरू

"गुरू" गुरू असावा जिजाऊ सारखा, शपथ स्वराज्याची शिवबाला अन् घोर शत्रूच्या जीवाला. गुरू असावा शिवबासारखा, रयतेला न्याय देणारा अन्  मावळ्यांसह शपथ स्वराज्याची घेणारा. गुरू असावा महात्मा फुल्यांसारखा, सावित्रीला शिकवणारा अन् मनुवाद्यांना वाकवणारा. गुरू असावा सावित्रीसारखा, यशवंताला जपणारा अन् स्त्रीशिक्षणासाठी खपणारा. गुरू असावा शाहू महाराजांसारखा, जात-पात, उच्च-नीच याला मूठमाती देणारा अन् गरिबांच्या विकासासाठी राज्य पणाला लावणारा. गुरू असावा बाबासाहेबांसारखा, धिक्कार जाती-धर्माचा करणारा अन् समतेचा पाया घालणारा. गुरू असावा महात्मा गांधीजींसारखा, मूठभर मीठ उचलणारा अन् ब्रिटिश सत्तेला झुकवणारा. गुरू असावा कर्मवीर भाऊराव पाटलांसारखा, गरिबांची पोरं शिकवणारा अन् मशाल संघर्षाची पेटविणारा. गुरू असावा लक्ष्मीबाईंसारखा, अंगावरचे दागिने मोडणारा, अन् दुसऱ्याची लेकरं जेऊ घालणारा. गुरू असावा संभाजीसारखा, वारसा समर्थपणे सांभाळणारा आणि फितुरांना मातीत गाडणारा. गुरू असावा भगतसिंगसारखा, स्वप्न स्वातंत्र्याचे पाहणारा, अन् देशासाठी फासावर जाणारा. गुरू असावा अझीझुन्नीसासारखा, ...