Skip to main content

Posts

Showing posts from April, 2018

लघुकथा : सोबत

लघुकथा: सोबत वयाच्या पंचवीशीतील निशा नवीन घराच्या शोधात होती. खूप शोधाशोध केल्यानंतर  शहरापासून दूर  असलेल्या एका भागात छोटेखानी घर मिळाले होते. लोकवस्ती खूपच विरळ होती तसेच रस्त्यापासून दूर असल्यामुळे वाहनांची वर्दळ असली तरी त्याचा काही विशेष त्रास होणार नव्हता. त्यामुळे तिला लेखिका म्हणून आवडणारा एकांत येथे सापडणार होता त्यामुळे ती खुश होती.  पण घर बरेच वर्षे  बंद असल्यामुळे साफसफाई करावी लागनार होती . त्यातच तिला कामाचा कंटाळा आला होता म्हणून ती त्यासाठी एखादी बाई मदतीला मिळेल का? याच्या शोधात होती. पण दिवसभर आजूबाजूला विचारपूस करूनही बाई काही मिळाली नाही. रात्र झाली तरी पसारा तसाच पडला होता. आता सकाळी लवकर उठून पसारा आवरावा असा विचार करून ती आत जाऊ लागली. तेवढ्यात तिला गेटच्याबाहेर एक सत्तरीतली म्हातारी बसलेली दिसली. हिला मदतीला घेतले तर आपले काम सोपे होईल म्हणून तिने तिला आत बोलावून घेतले. म्हातारी आनंदाने लगेच आत आली. एवढ्या रात्री कुठे जाणार तुम्ही, आजची रात्र इथेच थांबा असे म्हणत निशाने पर्समध्ये हात घालून सोबत आणलेले स्नॅक्स तिला दिले. म्हातारीने मानेनेच ...

लघुकथा : ऑपरेशन

लघुकथा: ऑपरेशन रवीने गडबडीनेच डॉक्टर अस्थानांच्या हॉस्पिटलमध्ये फोन लावला . तर मॅडम एका अर्जंट सर्जरीसाठी मुंबईला गेल्याचे कळाले म्हनून त्याने थेट त्यांच्या मोबाईलवर फोन लावला. मॅडम प्रवासात होत्या त्यातच त्यांचा ड्रायव्हर आज नेमका सुट्टीवर असल्याने त्या स्वतःच गाडी चालवत होत्या. रवीने प्रियाला अचानक कळा येत असल्याचे सांगितले. तिची डिलिव्हरी डेट जवळ आली होती पण चार पाच दिवस अवकाश असतानाही तिलाआज अचानक बसल्या बसल्या त्रास होत होता. तसे तिला बरेच कॉम्प्लिकेशन्स होते पण डॉक्टर आस्थानांची ती जवळची पेशंट होती अगदी मुलगीच म्हणलं तरी चालेल. त्यातच प्रिया लहानपणापासून अनाथ अगदी रविसारखीच. त्यामुळे घरात कोणी थोर माणूस नाही त्यामुळे रवी स्वतः डॉक्टर असूनही घाबरून गेला. शिवाय तो हाडांचा डॉक्टर होता. त्यामुळे गायनेकॉलॉजिमधील विशेष ज्ञान नाही. आस्थाना मॅडम चे पती जो अनाथआश्रम चालवायचे त्याच आश्रमात प्रिया वाढलेली असल्याने आणि आस्थाना दाम्पत्याला मुलबाळ नसल्याने त्यांनी या दोघांनाच आपली मुले मानले होते.  त्यामुळे प्रियाची सगळी जबाबदारी मॅडमने स्वतः घेतली होती पण आज नेमका निर्वाणीचा प्रसंग आला...

निर्णयाची ऐशीतैशी.....!

20 मार्च 2018 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील एका ऍट्रॉसिटी केसच्या संदर्भांत एक महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला. एक लेखक, वाचक आणि कायद्याचा अभ्यासक म्हणून या निर्णयाच्या अनुषंगाने मनात काही प्रश्नही निर्माण झाले. दुर्दैवाने याबाबत कोणीच चकार शब्द काढायला तयार नाही. कदाचीत देशातील दूषित वातावरण, न्यायावयवस्थेवर आणि निर्णय प्रक्रियेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, प्रशासकीय आणि राजकीय उदासीनता यामुळे आपण यावर काही लिहिले तर सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्या संगनमताने आपण अडचणीत येऊ कि काय? याची आता लोकांना भीती वाटू लागली आहे म्हणूनच न्यायालयाचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नाही हे स्पष्ट करून याविषयावर मत व्यक्त करतो. अगोदर ज्या केसच्या अनुषंगाने हा निर्णय आला ती केस काय आहे ते पाहूया: कराड येथील शासकीय औषध निर्माण (Pharmacy) महाविद्यालयात स्टोअर विभागात काम करणारे भास्कर कारभारी गायकवाड हे अनुसूचित जातीचे कर्मचारी आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सतीश बाळकृष्ण भिसे आणि प्राध्यापक किशोर बाळकृष्ण बुराडे यांनी  आपल्या पदाचा गैरवापर करून आपण मागास...

खुर्शीदांचे अर्धसत्य

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विध्यार्थ्यांना संबोधित करताना एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वेळ मारून नेण्यासाठी का होईना पण काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले आहेत असे सांगितले.  अवधनाने का होईना खुर्शीद खरेच बोलले पण ते अर्धसत्य बोलले असेच म्हणावे  लागेल. आता ते अर्धसत्य बोलले असे म्हणणे म्हणजे पूर्णसत्य काय आहे हेही सांगणे क्रमप्राप्त आहे. नाहीतर हे अर्धसत्य पूर्णसत्य ठरण्याचा धोका आहेच. तेव्हा पूर्णसत्य हे आहे की काँग्रेसचे हात फक्त मुस्लिमांच्याच नव्हे तर मागासवर्गीयांच्याही रक्ताने माखलेले आहेत. (इथे मागासवर्गीय असे म्हणताना अ. जाती, अ. जमाती, इतर मागास वर्ग आणि प्रत्येक राज्यातील भटक्या जाती जमातींचाही समावेश आहे हे लक्षात घ्यावे). या वक्तव्याचा समाचार घेताना अजून एक सत्य सांगावे लागेल ते म्हणजे फक्त काँग्रेसच नव्हे तर सर्व पक्षीयांचे हात मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांच्या रक्ताने माखलेले आहेत. म्हणून तर खुर्शीद यांनी सत्ताधारी भाजपच्या हातात एवढे मोठे कोलीत देऊनही ...

बलात्काराला फाशीची शिक्षा नको

कठुआ आणि उन्नव येथे अल्पवयीन  मुलीवर झालेले बलात्कार आणि त्यानंतर त्यांच्या झालेल्या निर्घृण हत्यानी संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले.  देशात ठिकठिकाणी याविरोधात निदर्शने, आंदोलने आणि मोर्चेही  निघाले. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यत जन्माला आलेल्या लहान बालिकेपासून 100 वर्ष वयाच्या म्हातारीपर्यंत  कोणीच सुरक्षित नसल्याची भावना या काळात बळावत गेली अर्थात त्यात चुकीचे काही नाही पण यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सत्ताधारी पक्षाने संपूर्ण देशात याविषयावर रान पेटेपर्यत कोणतीच भूमिका घेतली नाही उलट सत्ता धारी भाजपच्या मातृसंघटना, आणि सहयोगी संघटना यांनीही बघ्याची भूमिका घेतली. सत्ता धारी भाजपच्या अनेक सदस्यांनी ,मंत्र्यांनी आणि आमदार खासदारांनी यावर केलीली वक्तत्वे  अत्यंत बेजबाबदार आणि अचंभीत करणारी होती.  जम्मु काश्मीरमध्येही भाजप सत्तेत असून भाजपचे दोन मंत्री या बलात्कारी माणसाच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले त्यावरही कडी करणारी बाब म्हणजे बलात्कार झाला ती मुस्लिम आहे आणि करणारा हिंदू त्यातही काश्मिरी ब्राम्हण आहे म्हणून हिंदू वकिलही यात सामील झाले हि आणखी ...

लघुकथा: बलात्कार

रात्रीचे दहा वाजून गेले होते. आजोबा अजून पुण्याहून आले नव्हते. शेवटी ची गाडी आज अचानक लेट झाली होती म्हणून गायकवाड आजी ग्रहण मालिका बघत बसल्या होत्या. अचानक दरवाजावर टक टक झाली. आजोबा आले असावेत असा विचार करून आजीने गडबडीने दार उघडले तर दारात एक युवती उभी होती कपडे फाटलेले होते. अंगातून रक्त वाहत होते ती काकुळतीला येऊन आजीला म्हणाली, मला जर माझी जखम पुसन्यासाठी कापूस मिळेल का? आजीला तिची दया आली. तिला आत घेऊन आजींनी कापूस देत काय झाले असे विचारले तर ती म्हणाली, " चार दिवसांपूर्वी मी रात्री कामावरून सुटून घरी चालले होते अचानक चार गुंडांनी मला अंधारचा फायदा घेऊन तोंड दाबून गाडीत घातले आणि तुमच्या घरामागच्या  झाडीत आणून माझ्यावर पाशवी बलात्कार केला". काळजी वाटून आजींनी दरवाजा लावत मग इतके दिवस पोलिसात तक्रार का केली नाही असे विचारले. त्यावर ती तरुणी म्हणाली," मी त्यांचा प्रतिकार करून पोंलीस स्टेशनलाच चालले होते पण त्यांनी मला खूप मारहाण करून माझा गळा दाबून खून केला. माझा मृतदेह अजून तिथेच पडून आहे. तुम्ही जर पोलिसांना माझ्या खुनाची बातमी सांगाल का? आजीने घाबरत घाबरत मागे प...

शाळकरी मुलीची आत्महत्या आणि शिक्षण

तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील पनापक्क्म या छोट्या शहरातील चार अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली त्याबाबतचा  कृष्णकुमार यांचा द हिंदूंमध्ये 29 डिसेंम्बरला प्रसिद्ध झालेली लेखाचे मराठी रूपांतर: गेल्या महिन्यात पणापक्क्म या छोट्याशा शहरातील इयत्ता अकरावीच्या वर्गातील चार अल्पवयीन मुली अचानक गायब जगल्या होत्या . त्यांचं शोध घेत असताना एका विहिरीच्या बाहेर त्याची दप्तरे आढळली तर त्याच्या चपला विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसल्या. होय त्या मुलींनी आत्महत्या केली होती. त्या या निर्णयापर्यत का गेल्या याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. एक तर या मुली अँल्पवयीन होत्या आणि त्यानची समज अद्याप सारासार विचार करण्याइतपत विकसित झालेली न्हवती.  इतर अनेक समवयस्क मुलामुलींप्रमाणे त्या शिक्षणाबाबत आणि शिक्षणपद्धतीबाबत निरस होत्या त्यामुळे त्यांना या साचेबद्ध शिक्षणाचा  कन्ठाला आला होता. शिकवण्याची पद्धतीही अत्यंत पारंपरिक आणि रटाळ होती त्यामुळे सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या वयात त्यांचे या अभ्यासपद्दतीकडे आणि एकूणच शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आणि...

श्रीदेवी यांचा मृत्यूचे राजकारण आणि माध्यमांचा उथळपणा

खरे तर याविषयावर बोलायला नको. पण गेल्या दोन तीन दिवसात स्त्रीदेवीच्या मृत्यूनंतर अनेक उलटसुलट प्रतिकिया ऐकायला मिळाल्या. जो तो आपापल्या पद्धतीने तिच्या कर्तृत्त्वाने मूल्य मापन करत आला आणि आपण आलेली पोस्ट काहीही विचार न करता forward करत आलो.  यातल्या काही प्रतिक्रिया खूपच टोकाच्या होत्या त्यात जे काही आक्षेप होते त्यात प्रमुख्याने तिची देशाच्या सैनिकांशी केलेली तुलना सैनिक सीमेवर हुतात्मा झाल्यावर आपण एवढा शोक करत नाही हा या मंडळींचा प्रमुख आक्षेप पण मुळात या तुलनेला काहीच आधार नाही कारण दोन्ही क्षेत्रे हि पूर्णपणे भिन्न आहेत सैनिकांच्या हुतात्मा होण्याला जशी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय धोरणे, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती कारणीभूत असते तसेच सरकार सैनिकांप्रति किती संवेदनशील आहे यावर अवलंबून असते. याअगोदरही सरकारी अनास्थेमुळे सीमेवर सैनिक मरत आलेले आहेत पण गेल्या साडेतीन वर्षात सीमेवरील चकमकीत प्रचंड वाढ झाली आहे.  शेजाऱ्यांना धडा शिकवण्याच्या नादात आपण शेजाऱ्याकडेही आपल्यासारखीच शस्त्रे आहेत हे विसरलो आणि सैनिक जणू मारण्यासाठीच असतात अश्या अविर्भावात वागत आलो त्याचा ...

बबन : एक सशक्त आणि वास्तवदर्शी कलाकृती

बबनच्या निमित्ताने.......... काल दोन भाऊंचा बबन चित्रपट पाहायला गेलो होतो. चित्रपट गृहासमोर लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा आणि  नंबर यायच्या आत लागलेला हाऊस फुलचा बोर्ड. ,सैराटनंतर अशी गर्दी पाहायला परत नागराजचाच चित्रपटाची पुन्हा वाट पाहावी लागतेय कि काय असे वाटत असतानाच  बबनने हि अपेक्षा पूर्ण केली.  पण सैराटबाबत  जशी सर्वमुखी उत्कृष्ट अशी प्रतिक्रिया होती तशी बबनबाबत चित्रपट गृहामधून बाहेर आलेल्याकडून दिसत नव्हती. तसेच सर्व शो हाऊस फुल असले तरी महिलावर्ग आणि मुलींची संख्या अत्यंत बोटावर मोजन्याइटपत होती. त्यामागचे कारण घेण्याचीही उत्सुकता होती. तसे पाहायला गेले तर तो फारच अश्लील सिनेमा आहे असे म्हणावे तर तसेही काही नाही.  किंवा भाषा फारच कठीण आहे असे म्हणावर तर तेही नाही. मग तरीही असे का? याची काही कारणे आहे का? तर त्याचे उत्तर हो असेच आहे. त्याकारणांकडे जाताना अगोदर चित्रपटाच्या जमेच्या बाजू बघुयात: १. बबन हा अत्यंत वास्तवदर्शी आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण मांडणारा सिनेमा आहे. ग्रामीण भागातील जातीव्यवस्थेवर जरी तो प्रकाश टाकत नसला तरी एकाच जातीतील दोन...

संघ भाजप आणि काँग्रेस

4 एप्रिल 2018 रोजी संजय पवार याचा लेख प्रसिद्ध झाला होता त्यावरची हि प्रतिक्रिया: संजय पवार यांनी या लेखात संघ भाजपच्या प्रवृत्तीचे अतिशय वास्तवदर्शी आणि सखोल विवेचन केलेले असले तरी माझ्या मते फक्त भाजपचं असा आहे असे मुळीच नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक नाहीच म्हणून तर ते एकमेकाला पर्याय म्हणून काम करतात. खरे तर याविषयावर अभ्यास व्हायला हरकत नाही किंवा तसा कुणी इतिहासकाराने केला आहे किंवा नाही हेही सांगता येणार नाही कारण तो केला असला तरी प्रकाशात आणला जात नाही कारण त्यामुळे संघ भाजपबरोबर आपणही उघडे पडू अशी भीति काँग्रेसच्या धुरिणांना वाटणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस सामाजिक सुधारणा अगोदर कि स्वातंत्र्य अगोदर याविषयावर  फुटल्यानंतर मवाळ आणि जहाल अश्या दोन गटात तिची विभागणी मवाळ गटाला आपसूकच सत्तेच्या जवळ घेऊन गेली तर काँग्रेसने स्वतःला राजकीय पक्ष म्हणून स्थिरस्थावर केल्यानंतर मवाळ गट सत्तेचे आणि संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असतानाच जहालगट सत्ता आणि स्वातंत्र्य चळवळ यापासून लांबच गेला म्हणजे निर्वाणीचा स्वातंत्र्य लढ्यात या गटाचे कोणीच नव्हते पण...