Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

मतदान हाच उपाय: जयराज साळगांवकर

मतदान हाच उपाय जयराज साळगांवकर , बुधवार , २५ जानेवारी २०१२ लोकशाहीचे स्थर्य टिकवायचे असेल , तर लोकशाहीची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. आणि याची सुरुवात मतदानातून होऊ शकते. जबाबदार लोकांनी , जबाबदार लोकांना , जबाबदारीने निवडून आणले आणि त्यांच्या कामाचा त्रमासिक किंवा सहा महिने तरी आढावा घेतला तरच लोकशाहीवर लोकांची मालकी राहील. नेत्यांच्या श्रीमुखात लगावून , मेणबत्त्यांचे मूकमोच्रे काढून , फेसबुकवरील ‘ स्टेटस ’, ‘ लाइक ’ करून काही होईल ही अपेक्षा बाळगणे व्यर्थ आहे. त्यासाठी एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे आपला संवैधानिक अधिकार वापरण्याचा!   मतदानाचा अधिकार निवडणुकीत वापरणे हे   आपले सर्वाचे परमकर्तव्य आहे. टय़ुनेशियामधील उठावानंतर एकापाठोपाठ एक असे उठाव मध्यपूर्वेत झाले. या सर्व उठावांपकी इजिप्तमधील उठाव हा सर्वाधिक ताकदीचा होता. सुएझ कालवा , आसवान धरण आणि इतर अरब राष्ट्रांच्या तुलनेत खूप मोठे सन्य असलेल्या इजिप्तमध्ये अशा प्रकारचा गोंधळ होईल याची कोणाला कल्पनाही नव्हती. इजिप्तकडे तेल नसले तरी क...

कविता : गावकुसाबाहेर...............

गावकुसाबाहेर............... जग प्रसिध्द माझ्या गावात, गावकुसाबाहेर माझी वस्ती हाय, किती वर्षे सरली तरी, बापाजाद्याच्या हातात हस्ती हाय. गावामधी जायाला,  माझ्या   वस्तीवरनं रस्ता हाय. गावकुसाबाहेरचा जीव, कोल्या-कुत्र्यापेक्षा सस्ता हाय. कितीतरी आया-बायांच्या अबरु, तिथं वेशीवर टांगल्या, गावधन्याच्या राती, रोज धुंदीत झिंगल्या. जाण्याआधी जीव, आजा मुक्यानं तडफडला, त्याला बघुन बाप माझा, आतल्या आत चडफडला. देह त्याचा सारा बाभळीत जळला, त्या राती बाप रातभर मसणात लोळला. जाणता जीव त्याचा, तिळ तिळ तुटला. संयमाचा बांध त्याचा, वेशीबाहेरचं फुटला. धगधगत्या मनानं, गावधन्याला जाब ईचारला, त्याला मातुर त्यो अपमान वाटला. गावच्या पाटलाची गावभर सत्ता, कित्येक पिढ्यांनी गिरवला हाच कित्ता.  ---------------------------------------------

कविता : “प्रित”

  “ प्रित ” प्रित तुझी माझी, सखे खेळ ऊन-पावसाचा, ऊन पडता अंगणी, तेवढ्यापुरता बरसायचा. ऊन-पावसाच्या खेळात, म्हणे लग्न चिमणा-चिमणीचं लागतं. उघड्या डोळ्यांनी सखे, सपान माझं रातभर जागतं. क्षणिक त्या पावसाचा, क्षणभर गारवा, बरसतो श्रावण ऋतू होऊन बरवा. बरव्या त्या ऋतुला साथ हिरव्या बनाची, क्षणभराच्या त्या पावसाला नसते कदर मनाची. प्रित असावी सखे जसा पाऊस मृगाचा, बंद ओठातल्या शब्दांना जो फोडेल वाचा. शब्द होऊन श्रावणधारा, बरसतील तुझ्या अंगणी, साठवेल माझी प्रित तुझ्याच मनी.

कविता : "शब्द”

“ शब्द ” शब्द म्हणजे शब्द, मनाचे अंतरंग, जसे बावरलेल्या प्रेयसीच्या प्रेमाचेच रंग. शब्द बनतो कधी, जिवाभावाचा सखा, जसा प्रेयसीच्या गालावर प्रियकराचा मुका. शब्द बनतात कधी, श्रावणातील धारा, जसा प्रेयसीला छेडणारा उनाड वारा. शब्द असतात कधी, संवादाचे सोबती, स्वप्न होऊन शब्द रात्रभर जागती. शब्द असतो कधी, मदतीचा हात, शब्द करतो कधी संकटावर मात. शब्द बोलतो कधी, शब्दांचीच भाषा, भरकटलेल्या जिवाला भविष्याची आशा. शब्द असतात कधी, शिंपल्यातील मोती, शब्द बनतात कधी अव्यक्त प्रिती. शब्द असतो कधी, हंबरणारी माय, भुकेलेल्या वासरासाठी पान्हावलेली गाय. शब्द असतो कधी, शब्दांचाच वैरी, जश्या आपल्याच माणसावर बंदुकीच्या फैरी. शब्द वाटतात कधी, शब्दांचेच ओझे, शब्द करतात कधी शब्दांनाच खुजे. शब्द शब्द एक होऊन, गुंफतात संवादाच्या माळा, शब्द शब्दांसाठी बनतात शब्दांचीच शाळा. ©के.राहुल 9096242452

कविता : "स्वप्नातला राजहंस”

“ स्वप्नातला राजहंस ” स्वप्नातला सखे तुझ्या, मीच आहे तो एक राजहंस. प्रणयाच्या या धुंदराती, मालवुन टाक दिपकंस. नकोत आता कुठली नाती, नकोच आता कसली भिती. विसरुन जाऊ आज जगाला, बहरुन येऊ दे प्रिती. श्वासामध्ये श्वास मिळुनी, सुर बनावा आज नवा. मिलनाच्या या रात्रीचा, सखे कधीच ना शेवट व्हावा. धडधडणा-या दोन हृदयांचा, आवाज एक व्हावा. बेधुंद अशा या रात्री, मनाचा मनाला स्पर्श व्हावा. आर्त सुरात माझ्या , मिसळुन सुर तु, ऐक   माझे एकच म्हणणे..... स्वप्नातला सखे तुझ्या, मीच आहे तो राजहंस एक. प्रणयाच्या या धुंदराती, मालवुन टाक दिपकंस.

कविता :"काऴ”

“ काऴ ” वर्तमानाच्या भिंतीवर, रेखाटीत बसलो भविष्याची चित्रे, कुठून अचानक जागी झाली, मग भुतकाळातील पितरे. बसुन माझ्या मग बोकांडी, घायाऴ त्यांनी, मजला केले. भुतकाऴाच्या त्या पापसरीत, पुण्य सारे वाहुन गेले. व्याकुऴ होऊन मी नियतीला, साद घातली आशेने, कुठुनतरी मग आवाज आला, धावत आली ती त्वेषाने. मुठीत घेऊन वर्तमानाला, वाचाळपणा मग तिने केला. तो-यात येऊन मला म्हणाली, हिशोब माझा न चुकता करताच बाप तुझा रे मेला. पाप-पुण्यांचा पुन्हा एकदा, होऊन जाऊदे निवाडा. जे बापाचे, ते लेकाचे, हाच नियतीचा ओढा. त्या न्यायाने आज तुझ्यावर, ऋण माझे रे आहे. त्या ऋणाच्या परतीसाठी, वर्तमानाला घेऊन संगती, पुण्यांची तु वाट धरावी, समतेला तु प्रमाण मानुन, सत्याची तू वाट स्मरावी. काळ सुध्दा मग येईन धावुन, दुःख तुझे रे नेईन वाहुन. खुशाल रेखाटित बस मग तु, भविष्याची चित्रे. टाकीन गाडुन पाताळात मी, भुतकाळातील पितरे...... ! (2) ©के.राहुल 9096242452

कविता : "घरटं”

“ घरटं ” आता आपण लग्न करावं, असं एका पाखराच्या मनात आलं. शोध घेता घेता रानावनात, एक पाखरु भेटलं. पाखरानंही त्या लाजुन हळुच हो म्हटलं. मनातले विचार मग सत्यात आले, तिच्याशी एकदिवस लग्न त्याचे झाले. संसाराचं स्वप्न त्याचं सत्यात आलं, दोघांनी मिळुन छान घरटं बांधलं. दिस-मास जाता मन मनात गुंतलं, संसाराच्या वेलीवर छान फुल बहरलं. सा-या घरट्याचं मग गोकूळ झालं, पाखराचं मन आनंदुन गेलं. किलबिलाटात अशा कित्येक वर्षे सरली, एक दिस मग येगळीच पहाट झाली, पिलांचंही मन मग घरट्याबाहेर रमलं, एक दिस पिलु घरटं सोडुन गेलं, विसरलं मायबाप ज्यांनी जिवापाड जपलं, घेऊन सखीला नवं घरटं थाटलं. पाखराला मग तेव्हा कऴुन चुकलं, आपुल्याच वागण्याचं अनुकरण घडलं. आपुनही असंच मायबाप सोडलं, म्हणुनच आज आपलं घरटं मोडलं.... ! (2) ©के.राहुल ९०९६२४२४५२

कविता : "चिऊ”

“ चिऊ ” एकदा जंगलात चिऊला एक माणुस भेटला, म्हणाला तो तिला, का गं इतक्या दुर तु संसार थाटला... ! संयमी चिऊ मग बोलती झाली, हऴुच माणसाच्या ती खांद्यावर आली. म्हणाली, माणसा-माणसा इथं माझं आहे घरटं छान, घरट्यात माझ्या मला आहे रे मान. चिमणा माझा मला जिवापाड जपतो, पिलांच्या सुखासाठी आम्ही रात्रंदिन खपतो. स्वप्नांना माझ्या येथे आकार येतो, सुख-दुःख सारी आम्ही वाटुन घेतो. शेजा-यांशी माझा रोज सुसंवाद होतो, चांगल्या वाईटाचा येथे रोज विचार होतो. बेबनावातही आमच्या, इथे आसते आपुलकी, भांडणात इथं कधी नाहीत फुटतरे डोकी. आमच्या इथे ना वाद जाती-धर्मांचे, सर्वांनाच आम्ही मानतो आमुचे. नाही रे इथं कुणाची स्वार्थाची भाषा, टिचभर पोटाचीच सर्वांना रे आशा. थोरामोठ्यांचा आम्ही सदा राखतो मान, त्यांच्यामुळेच रे आमुच्या घराला शान. माणसा तुझ्यातला रे माणुस मेला, आपुल्याच स्वार्थासाठी हैवान तु झाला. माणसा-माणसा तुझी फाटकी रे झोऴी, तुझ्यासंगे आयुष्याची माझ्या झाली असती रे झोऴी, वेळीच मी हे संकट ताडलं, म्हणुनच मी तुझं घरटं सोडलं... ! (2) ©के.राहुल 9096242452 ...

कविता : "स्वप्न”

“ स्वप्न ” एकदा एका कावळ्याला छानसे स्वप्न पडले , स्वप्नातच मग त्याचे एका चिमणीवर प्रेम जडले. तासन् तास तिला न्याहाळणं मग रोजचंच झालं , एक दिवस मग तिच्याही ते लक्षात आलं. एक दिवस मग तो तिला भेटायला आला , धाडस करुन मग तिला विचारता झाला , काय गं तु माझ्याशी लग्न करशील .....! हुशार   चिमणी मग क्षणभर थांबली , मग कावळ्याला म्हणाली , " काय रे! तु करतोस तरी काय ? कावळा म्हणाला , रोजी रोटी तर मी सहजच कमावतो घराच्या सुखासाठी रात्र् न दिन झटतो. विशेष म्हणजे माझं स्वतःचं छानसं घरटंही आहे , आणि तुझ्यासाठी ते अतिशय योग्य आहे." चिमणी मग कावळ्याला म्हणाली , " ते सर्व ठिक आहे रे! पण, तु तर माझ्यापेक्षा खुपच वेगळा वाटतोस , रंगारुपाने तर फारच बेढब दिसतोस ; मला वाटतं तु खालच्या वर्गातला असावास ; म्हणुनच मला एवढा शुद्र दिसावास ; मी तर फार उच्चकुलीन आहे...! माझ्या येथे कुळाला फार मान आहे , जातीची माझ्या सर्वत्र शान आहे , त्यामुळंच तुझं कर्तुत्व इथं शुन्य ठरतं. तुझ्यासारखा विचार करणारं रोज इथं कुणीतरी मरतं! म्हणुनच तु तुझ्या कुळातली वधु...

Bgvs चा शालेय शिक्षणाबाबतचा जाहीरनामा

प्रति, मा. वार्ताहर दै.................... विषय: आमच्या बातमीला आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्धी मिळणेबाबत....... सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याबाबत येणाऱ्या सरकारने कटिबद्ध रहावे:  जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आणि तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता ठरू पहात असलेल्या आपल्या देशातील मूलभूत प्रश्न अत्यंत गंभीर बनले असून शिक्षणाची दुरवस्था हा कळीचा मुद्दा बनला आहे. २०११  च्या जनगणनेनुसार देशातील २७% म्हणजे सुमारे ३० कोटी जनता आजही निरक्षर असुन लोकसंख्येच्या ५०% असलेल्या स्त्रियांमध्ये निरक्षरतेचे प्रमाण आजही ३५%हुन जास्त आहे. युनोस्कोने २०१३-१४ मध्ये जाहीर केलेल्या आपल्या अहवालात याचा ठळक उल्लेख केला असून जगातील एकूण निरक्षर लोकांमध्ये भारतातील निरक्षरांचे प्रमाण ३७% इतके गंभीर आहे. युनेस्कोच्या याच अहवालात देशातील "आहे रे" वर्गाने जाणीवपूर्वक या लोकांना निरक्षर ठेवले आहे असे नमूद करून याच दराने वाटचाल सुरू राहिली तर संपूर्ण महिला साक्षर होण्यासाठी २०८० साल उजडावे लागेल, असे नूड केले आहे. भारतातील शिक्षणव्यवस्था ही जगातील इतर कोणातूनही देशापेक्षा मोठी व्यवस...

संघ भाजपचे मुस्लिम कनेक्शन

Fwd Post*🍂BJP की दोगली नीति. 👉1. विश्व हिन्दू परिषद के नेता अशोक सिंघल 'ब्राह्मण' ने अपनी बेटी सिमा सिंघल की शादी मुख़्तार अब्बास नकवी 'मुस्लिम' से की है। 👉2. मुरली मनोहर जोशी 'ब्राह्मण' ने अपनी बेटी रेणु जोशी की शादी शाहनवाज़ हुसैन 'मुस्लिम' से की है। 👉3. नरेंद्र मोदी (मोट घांची) 'बनिया' ने अपनी भतीजी की शादी 'मुस्लिम' से की है। 👉4. लाल कृष्णा आडवाणी 'ब्राह्मण' ने अपनी बेटी रोशन आडवाणी की दूसरी शादी सलीम खान 'मुस्लिम' से की है। 👉5. लाल कृष्ण आडवाणी 'ब्राह्मण' ने अपनी भतीजी प्रतिभा आडवाणी की शादी अल्ताफ हुसैन 'मुस्लिम' से की है। 👉6. सुब्रमण्यम स्वामी 'ब्राह्मण' ने अपनी बेटी सुहासिनी की शादी नदीम हैदर 'मुस्लिम' से की है। 👉7. शिव सेना प्रमुख बाला साहब ठाकरे  'कायस्थ ब्राह्मण' ने अपनी पोती नेहा ठाकरे की शादी सहजाद 'मुस्लिम' से की है। 👉8. मुसलमानों के खिलाफ सबसे ज़्यादा ज़हर उगलने वाला विश्व हिन्दू परिषद् का नेता प्रवीण तोगडि़या 'ब्राह्मण' ने अपन...

भारतीय कर कायदा आणि सहकारी साखर कारखाने

भारतीय उत्पन्न कर कायदा आणि सहकारी साखर कारखाने: भारतीय उत्पन्न कर कायदा, १९६१ अनुसार कृषी उत्पन्न करमुक्त असले तरी व्यावसायिक शेती उत्पन्न करमुक्त आहे असे म्हणता येणार नाही. उत्पन्न कर कायद्यानुसार शेतकऱ्याला थेट हातात मिळणारे उत्पन्न करमुक्त असले तरी शेतकरी जर आपले उत्पादन पुन्हा  प्रक्रियेसाठी देत असेल तर त्याला मिळणाऱ्या मोबदल्यावर कर भरण्याची जबाबदारी मात्र त्या प्रक्रिया उद्योगावर टाकली आहे. म्हणजे शेतकऱ्याला या मिळणाऱ्या उत्पादनाचा करदाता (Assessee) हा तो प्रक्रिया उद्योग असतो. हाच नियम व्यक्ती आणि संस्था यांना जसा लागू आहे तसा प्रक्रिया उद्योग सहकारी क्षेत्रातील असला तरी लागू आहे.  फक्त आपले उत्पन्न किती हे ठरविण्याचा अधिकार मात्र त्या उद्योगाला आहे. पण उत्पन्न कर किती आहे हे ठरविण्याचा अधिकार मात्र कायद्याने केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या आखात्यारीत काम करणाऱ्या उत्पन्न कर निर्धारण यंत्रणेला आहे. त्यामुळे करदाता आणि उत्पन्न कर विभाग यांच्यात यावरून नेहमीच मतभेद होतात आणि कधी कधी याबाबत इतके टोकाचे वाद निर्माण होतात की प्रकरण अगदी सर्वोच्च न्यायालयात  जाऊ...